शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता 
2
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
3
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
4
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
5
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
6
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
7
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
8
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
9
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
10
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
11
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
12
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
13
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
14
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
15
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
16
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
17
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
18
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
19
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट

"रील्स बनवा, १० लाख कमवा"; जितेंद्र आव्हाडांचं तरुण पिढीला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 12:03 IST

मनसेने काही दिवसांपूर्वी रीलबाझ हा कार्यक्रम घेतला. त्यामध्ये, रिल्सस्टार्सच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

ठाणे/मुंबई - सोशल मीडियाचं महत्त्व आता सर्वच राजकीय नेत्यांच्या लक्षात आलं आहे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत सहज आणि अधिक प्रभावीपणे पोहोचता येते. त्यामुळेच, फेसबुक, ट्विटर व इंस्टाग्रामवर नेतेमंडळी अधिक सक्रीय बनली आहे. काही दिवसांपूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरील प्रभावी रिल्स क्रिएटर्संचा सन्मान केला. या सोहळ्यात त्यांनीही नव्या पिढीला रिल्सच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मांडण्याचं आवाहन केलं. आता, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट उत्तम रिल्स बनवणाऱ्यास १० लाख रुपयांचे बक्षीत देणार असल्याची घोषणाच केली. 

मनसेने काही दिवसांपूर्वी रीलबाझ हा कार्यक्रम घेतला. त्यामध्ये, रिल्सस्टार्सच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. आता, आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ठाण्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात रिल्स बनवण्याचं आवाहन तरुण पिढीला केलं आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा ६० वा वाढदिवस ५ ऑगस्ट रोजी झाला. या वाढदिवसाला आपण अज्ञातस्थळी जाणार असल्याचं आव्हाड यांनी एक दिवस अगोदरच जाहीर केलं होतं. मात्र, ठाण्यातील कार्यक्रमात ते दिसून आले. 

ठाण्यातील रंगायतन सभागृहात राष्ट्रवादीच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव-सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आव्हाड यांनी राज्यातील आणि देशातील परिस्थितीवर भाष्य केलं. मणीपूर जळत आहे, तर महाराष्ट्रातही दंगली घडवण्याचं काम सुरू असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं. त्यामुळे, सोशल मीडियाचा वापर तुमच्यासारख्या पिढीने करायलं हवा. तुम्ही रिल्स बनवता का? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थितांना विचारला. तसेच, नसेल बनवत तर बनवायला शिका, असेही ते म्हणाले. त्यासाठी, मी आता सर्वोत्तम रील्सची स्पर्धाच भरवणार आहे. त्यामध्ये, सर्वोत्तम रिल्ससाठी १० लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येईल, असेही आव्हाड यांनी म्हटले. 

दरम्यान, सोशल मीडिया हे राजकारणातील सर्वात प्रभावी शस्त्र बनल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपासह सर्वच राजकीय पक्ष या सोशल मीडियाच्या वापरातून आपली भूमिका, कार्यक्रम आणि विचारांचा प्रचार व प्रसार करत आहेत. तर, पत्रकारिताही याच सोशल मीडियावर व्यापून गेली आहे.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSocial Mediaसोशल मीडियाSocialसामाजिकManipur Violenceमणिपूर हिंसाचार