शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

"रील्स बनवा, १० लाख कमवा"; जितेंद्र आव्हाडांचं तरुण पिढीला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 12:03 IST

मनसेने काही दिवसांपूर्वी रीलबाझ हा कार्यक्रम घेतला. त्यामध्ये, रिल्सस्टार्सच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

ठाणे/मुंबई - सोशल मीडियाचं महत्त्व आता सर्वच राजकीय नेत्यांच्या लक्षात आलं आहे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत सहज आणि अधिक प्रभावीपणे पोहोचता येते. त्यामुळेच, फेसबुक, ट्विटर व इंस्टाग्रामवर नेतेमंडळी अधिक सक्रीय बनली आहे. काही दिवसांपूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरील प्रभावी रिल्स क्रिएटर्संचा सन्मान केला. या सोहळ्यात त्यांनीही नव्या पिढीला रिल्सच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मांडण्याचं आवाहन केलं. आता, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट उत्तम रिल्स बनवणाऱ्यास १० लाख रुपयांचे बक्षीत देणार असल्याची घोषणाच केली. 

मनसेने काही दिवसांपूर्वी रीलबाझ हा कार्यक्रम घेतला. त्यामध्ये, रिल्सस्टार्सच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. आता, आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ठाण्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात रिल्स बनवण्याचं आवाहन तरुण पिढीला केलं आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा ६० वा वाढदिवस ५ ऑगस्ट रोजी झाला. या वाढदिवसाला आपण अज्ञातस्थळी जाणार असल्याचं आव्हाड यांनी एक दिवस अगोदरच जाहीर केलं होतं. मात्र, ठाण्यातील कार्यक्रमात ते दिसून आले. 

ठाण्यातील रंगायतन सभागृहात राष्ट्रवादीच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव-सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आव्हाड यांनी राज्यातील आणि देशातील परिस्थितीवर भाष्य केलं. मणीपूर जळत आहे, तर महाराष्ट्रातही दंगली घडवण्याचं काम सुरू असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं. त्यामुळे, सोशल मीडियाचा वापर तुमच्यासारख्या पिढीने करायलं हवा. तुम्ही रिल्स बनवता का? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थितांना विचारला. तसेच, नसेल बनवत तर बनवायला शिका, असेही ते म्हणाले. त्यासाठी, मी आता सर्वोत्तम रील्सची स्पर्धाच भरवणार आहे. त्यामध्ये, सर्वोत्तम रिल्ससाठी १० लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येईल, असेही आव्हाड यांनी म्हटले. 

दरम्यान, सोशल मीडिया हे राजकारणातील सर्वात प्रभावी शस्त्र बनल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपासह सर्वच राजकीय पक्ष या सोशल मीडियाच्या वापरातून आपली भूमिका, कार्यक्रम आणि विचारांचा प्रचार व प्रसार करत आहेत. तर, पत्रकारिताही याच सोशल मीडियावर व्यापून गेली आहे.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSocial Mediaसोशल मीडियाSocialसामाजिकManipur Violenceमणिपूर हिंसाचार