शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

"रील्स बनवा, १० लाख कमवा"; जितेंद्र आव्हाडांचं तरुण पिढीला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 12:03 IST

मनसेने काही दिवसांपूर्वी रीलबाझ हा कार्यक्रम घेतला. त्यामध्ये, रिल्सस्टार्सच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

ठाणे/मुंबई - सोशल मीडियाचं महत्त्व आता सर्वच राजकीय नेत्यांच्या लक्षात आलं आहे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत सहज आणि अधिक प्रभावीपणे पोहोचता येते. त्यामुळेच, फेसबुक, ट्विटर व इंस्टाग्रामवर नेतेमंडळी अधिक सक्रीय बनली आहे. काही दिवसांपूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरील प्रभावी रिल्स क्रिएटर्संचा सन्मान केला. या सोहळ्यात त्यांनीही नव्या पिढीला रिल्सच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मांडण्याचं आवाहन केलं. आता, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट उत्तम रिल्स बनवणाऱ्यास १० लाख रुपयांचे बक्षीत देणार असल्याची घोषणाच केली. 

मनसेने काही दिवसांपूर्वी रीलबाझ हा कार्यक्रम घेतला. त्यामध्ये, रिल्सस्टार्सच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. आता, आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ठाण्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात रिल्स बनवण्याचं आवाहन तरुण पिढीला केलं आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा ६० वा वाढदिवस ५ ऑगस्ट रोजी झाला. या वाढदिवसाला आपण अज्ञातस्थळी जाणार असल्याचं आव्हाड यांनी एक दिवस अगोदरच जाहीर केलं होतं. मात्र, ठाण्यातील कार्यक्रमात ते दिसून आले. 

ठाण्यातील रंगायतन सभागृहात राष्ट्रवादीच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव-सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आव्हाड यांनी राज्यातील आणि देशातील परिस्थितीवर भाष्य केलं. मणीपूर जळत आहे, तर महाराष्ट्रातही दंगली घडवण्याचं काम सुरू असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं. त्यामुळे, सोशल मीडियाचा वापर तुमच्यासारख्या पिढीने करायलं हवा. तुम्ही रिल्स बनवता का? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थितांना विचारला. तसेच, नसेल बनवत तर बनवायला शिका, असेही ते म्हणाले. त्यासाठी, मी आता सर्वोत्तम रील्सची स्पर्धाच भरवणार आहे. त्यामध्ये, सर्वोत्तम रिल्ससाठी १० लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येईल, असेही आव्हाड यांनी म्हटले. 

दरम्यान, सोशल मीडिया हे राजकारणातील सर्वात प्रभावी शस्त्र बनल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपासह सर्वच राजकीय पक्ष या सोशल मीडियाच्या वापरातून आपली भूमिका, कार्यक्रम आणि विचारांचा प्रचार व प्रसार करत आहेत. तर, पत्रकारिताही याच सोशल मीडियावर व्यापून गेली आहे.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSocial Mediaसोशल मीडियाSocialसामाजिकManipur Violenceमणिपूर हिंसाचार