शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

पर्यायी व्यवस्था करा,मगच घरे खाली करतील - जितेंद्र आव्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 10:24 PM

सर्वोच्च न्यायालयाने शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश दिले आहेत

ठाणे :  गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे रुळाच्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशांना रेल्वे प्रशासनाकडून घरे खाली करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. हे माणुसकीला धृब नसून आधी त्यांची पर्यायी व्यवस्था करा, मगच ते ओक घरे खाली करतील असे मत गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केले. 

सर्वोच्च न्यायालयाने शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश दिले आहेत. रेल्वेच्या देशभरात अनेक ठिकाणी जमिनी असून त्यातील काही जमिनींवर वर्षानुवर्षे अतिक्रमणे आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेने या जमिनी मोकळ्या करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार कळवा, कल्याण (पूर्व) आणि डोंबिवली येथील रहिवाशांना रेल्वेने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली असून तातडीने घरे रिकामी करण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे अचानक असे काय झाले की त्यांना घरे खाली करण्याच्या नोटीसा काढण्यात आल्या. त्यात सात दिवसाच्या आत गजरे खाली करण्यास देखील सांगण्यात येत आहेत. हे माणूसकीला धरून नाही. संपूर्ण मुंबईभर लाखो लोक गेल्या 70 वर्षांपासू  रेल्वे रुळापासुन 15-20 फुटावर राहतात.

या संपूर्ण प्रकरणात केंद्र सरकारने प्रमुख भूमिका घ्यावी लागेल. या जमिनींवर राहणारे माणसे देखील तुमचेच आहेत. त्यामुळे या माणसांना तुम्हाला वाचवावेच लागेल असे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आधी त्यांची पर्यायी व्यवस्था करा आणि त्याच्या नंतरच ते घरे खाली करतील. तसे न झाल्यास  आम्ही त्या गोर गरीब लोकांबरोबर ठामपणे उभे राहू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. तसेच या निर्णयाचा सन्मान करीत त्याला विरोध देखील आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला.