शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

आमदारकीची परंपरा राखली, आता मंत्रीपदाची बारी?

By admin | Updated: February 17, 2016 01:45 IST

सत्ताधारी पक्षाचा आमदार निवडून देण्याची परंपरा पालघरवासियांनी अमित घोडा यांच्या रुपाने कायम ठेवली आहे. आता पहिल्यांदा निवडून आल्यानंतर राज्यमंत्री होण्याचा मान मनीषा

शशी करपे,  वसईसत्ताधारी पक्षाचा आमदार निवडून देण्याची परंपरा पालघरवासियांनी अमित घोडा यांच्या रुपाने कायम ठेवली आहे. आता पहिल्यांदा निवडून आल्यानंतर राज्यमंत्री होण्याचा मान मनीषा निमकर आणि राजेंद्र गावीत यांच्यानंतर घोडा यांना मिळतो की नाही ही उत्सुकता पालघरवासीयांना आहे. पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे राजेंद्र गावीत यांचा पराभव करून शिवसेना-भाजपा युतीचे अमित घोडा यांनी पालघरमध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्याची परंपरा कायम राखली आहे. १९९० पासून, मधला २००९ चा अपवाद वगळता शिवसेनेने पालघरमध्ये आपले वर्चस्व अबाधित राखले आहे. १९९० साली राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यावर शिवसेनेच्या तिकीटीवर पहिल्यांदाच निवडून आलेल्या मनीषा निमकर राणे सरकारमध्ये राज्यमंत्री बनल्या होत्या. त्यानंतर निमकर सलग तीनवेळा निवडून आल्या. २००९ साली विधानसभा मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर झालेल्या निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या मनीषा निमकर यांचा पराभव करून काँग्रेसचे राजेंद्र गावीत निवडून आले होते. गावीतांनी शिवसेनेची निवडून येण्याची परंपरा मोडीत काढली होती. यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते. गावीत पहिल्यांदाच निवडून आले आणि राज्यमंत्री बनले. राज्यमंत्रीपदाच्या शेवटच्या टप्यात पालघर जिल्हा निर्मिती झाली. या जिल्ह्याचा पहिला पालकमंत्री होण्याचे गावीतांचे स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्ण होऊ दिले नाही. नव्या पालघर जिल्ह्याचा पहिला पालकमंत्री होण्याचा मान त्यामुळे भाजपाचे विष्णू सवरा यांना मिळाला. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादीचे कृष्णा घोडा यांना उमेदवारी दिली. यानिवडणुकीत मोदी लाट होती. त्यामुळे भाजपाने उमेदवार दिला होता. तर बहुजन विकास आघाडीने शिवसेनेच्या मनीषा निमकर यांना आपल्याकडे खेचून त्यांना उमेदवारी दिली होती. मनसेचाही उमेदवार मैदानात होता. असे असतानाही घोडा यांनी सर्वांवर मात करीत गावीतांचा अवघ्या ५१५ मतांनी पराभव करीत विजय खेचून आणला होता. निवडणुकीनंतर काही महिन्यांतच घोडा यांचे निधन झाल्याने पालघरवासियांना पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागले.यावेळच्या निवडणुकीत भाजपा मैदानात नसली तरी बहुजन विकास आघाडीने मोठे आव्हान उभे करण्याचे काम केले. काँग्रेसने पुन्हा एकदा राजेंद्र गावीत यांना उमेदवारी दिली. निवडणुकीत वाढवण आणि जिंदाल बंदराचा विषय चर्चेला आणून शिवसेनेचे अमित घोडा यांना अडचणीत आणण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न झाले. बहुजन विकास आघाडीने हवा तयार केल्याने रंगत वाढली होती. एकीकडे, शिवसेनेचे ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी ही निवडणुक प्रतिष्ठेची करून ताकद पणाला लावली होती.गेल्या दोन्ही निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने गावीतांना पराभवापासून दूर नेण्याचे काम केले. पहिल्यांदा निवडून आल्यानंतर गावीतांना राज्यमंत्रीपद मिळाले. तेव्हापासून गावीतांची राजकीय इच्छाशक्ती वाढली होती. पुढे पालघर लोकसभा मतदारसंघातून खासदार होण्याचे स्वप्न पहात गावीत वसईच्या राजकारणात सक्रीय झाले होते. वसईतील मते नेहमीच निर्णाय ठरत असल्याने गावीतांनी मोर्चेबांधणी सुुरु केली होती. आपल्या बालेकिल्ल्यात गावीतांचा राजकीय धोका त्याचवेळी हितेंद्र ठाकूर यांनी ओळखला होता. तेव्हापासून ठाकूर यांनी गावीतांना रोखण्याची व्यूहरचना आखली होती. अपेक्षेप्रमाणे गावीतांनी पालघर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिल्लीहून मिळवली होती. पण, ठाकूरांनी काँग्रेसचा पाठिंबा मिळवत गावीतांना माघार घेणे भाग पाडले होते. त्यानंतर गावीतांविरोधात दोन्ही निवडणुकांमध्ये उमेदवार देऊन ठाकूरांनी त्यांच्या पराभवात हातभार लावण्याचे काम केले. गावीतांना दोन्ही वेळा राष्ट्रवादी काँग्रेसची किती साथ मिळाली याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.