शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

वाहनांमुळे की बांधकामुळे कशामुळे वाढतेय प्रदुषण; ठाणे महापालिका गोळा करतेय मातीचे नमुने

By अजित मांडके | Updated: January 8, 2024 16:33 IST

ठाण्यात प्रदुषण नेमके कोणत्या गोष्टीमुळे होत आहे, कोणत्या भागात सर्वाधिक धुळ प्रदुषण वाढत आहे.

अजित मांडके, ठाणे : ठाण्यात प्रदुषण नेमके कोणत्या गोष्टीमुळे होत आहे, कोणत्या भागात सर्वाधिक धुळ प्रदुषण वाढत आहे, याचा अभ्यास आता ठाणे महापालिकेच्या प्रदुषण विभागाने सुरु केला आहे. उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने मागील काही दिवसापासून हे काम सुरु केले आहे. यात धुळ व हवा प्रदुषण असलेले रस्ते आणि त्या परिसरात सुरु बांधकामांच्या ठिकाणी असलेली मातीचे नमुने गोळा करत आहे. त्यातून नेमके प्रदुषण कुठुन अधिक होत आहे, याचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर समिती त्याठिकाणी कशा उपाय योजना करता येणे गरजेचे आहे. याचे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली.

ठाण्यासह एकूणच एमएमआर क्षेत्रात मागील काही महिन्यांपासून प्रदुषणात वाढ होत आहे, हे प्रदुषण रोखण्यासाठी विविध महापालिकांच्या माध्यमातून उपाय योजना केल्या जात आहे. साफसफाई करण्याबरोबर रस्ते धुलाई, बांधकामांच्या ठिकाणी काळजी आदींसह इतर उपाय केले जात आहेत. परंतु अद्यापही प्रदुषण म्हणावे तितके कमी झालेले नाही. असे असले तरी शहरातील काही रस्त्यांच्याकडेला सातत्याने धुळ जमा होत आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी तरंगत्या धुलीकणांचे प्रमाणही अधिक आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने नुकतेच हे प्रदुषण नेमके कशामुळे होते, याचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी धुळ प्रदुषित रस्त्याकडेची आणि परिसरातील बांधकामांच्या ठिकाणांची माती गोळा करण्याच्या सुचना समितीने दिल्या असून त्यानुसार पालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाच्या पथकाने सर्वाधिक हवा प्रदुषित रस्त्यांचा शोध घेऊन तेथील माती गोळा करण्याचे काम सुरु केले आहे. त्याचबरोबर तेथील हवेतील तरंगत्या धुलीकणाचे मोजमाप यंत्रणाच्या साहाय्याने केले जात असल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली.

रस्ते आणि परिसरातील बांधकामाच्या ठिकाणची माती घेऊन त्याचे परिक्षण केले जाणार आहे. त्यात बांधकाम ठिकाणची माती रस्त्याकडेला जमा होते का किंवा वाहनांच्या चाकांना लागून येणारी माती रस्त्याकडेला जमा होते का याचा शोध घेतला जाणार आहे. त्याचबरोबर हवेतील तरंगते धुळीकण वाढण्याची कारणे काय आहेत आणि त्याठिकाणी कोणत्या उपाययोजना करणे अपेक्षित आहेत, याचाही अभ्यास केला जाणार आहे. उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीमध्ये आयआयटी आणि निरी संस्थेचे प्रतिनिधी आहेत. पालिकेकडून सादर होणाºया अहवालाच्या आधारे समितीचे सदस्य पालिकेला काही उपाययोजना सुचविणार असल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेMuncipal Corporationनगर पालिका