शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

महावितरणचं काम, मीटरसाठी ११ महिने थांब; ठाणेकरांना होतोय नाहक त्रास

By अजित मांडके | Published: March 26, 2024 3:44 PM

महावितरणच्या भोगंळ कारभाराचा ठाणेकर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठाणे : महावितरणच्या भोगंळ कारभाराचा ठाणेकर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नवीन मीटर लावण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करुनही महावितरणकडे मीटर नसल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे महावितरणकडे मीटर नसतांना खाजगी दुकानदाराकडे मात्र मीटर असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. त्यामुळे ग्राहकांना खिशाला कात्री मारुन हे मीटर विकत घ्यावे लागत आहेत. परंतु जे ग्राहक थांबतात, त्यांना नवीन मीटरसाठी तब्बल ११ महिन्याहून अधिकचा कालावधी जात असल्याचे दिसत आहे.

महावितरणकडून येणाऱ्या वाढीव बिलामुळे आधीच ठाणेकर ग्राहक हैराण झाले आहेत. त्यात आता नवीन मीटरसाठी सहा सहा महिने थांबावे लागत असल्यानेही त्याचा नाहक भुर्दंड ठाण्यातील ग्राहकांना सहन करावा लागत आहे. ठाण्यातील असंख्य ग्राहकांना  महावितरणच्या या गलथान कारभाराचा फटका बसला आहे. काहींचे मीटर मागील काही महिन्यापासून बंद आहेत, ते मीटर बदलून मिळावे यासाठी ते वारंवार महावितरणच्या कार्यालयाचे खेटे घालत आहेत. परंतु त्यांना नवीन मीटर बसवून मिळत नाही. या उलट फॉल्टी मीटर दाखवून त्यांना सरासरी वाढीव बिल महावितरणकडून दिले जात आहे. ते कमी करण्यासाठी पुन्हा महावितरणच्या खेटा घालाव्या लागत आहेत. त्यासाठी कामाचे खाडे करावे लागत आहेत. परंतु महावितरणकडून उडवा उडवीची उत्तरे मिळत आहेत.

त्यात एखाद्या ग्राहकाने मीटरसाठी तगादा लावलाच तर त्याला ठाण्यातील एका खाजगी दुकादाराचा पत्ता दिला जात असून त्याच्याकडून मीटर घ्या असे सांगितले जात आहे. परंतु त्याचा नाहक भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे महावितरणकडे मीटर नसतांना खाजगी दुकानदाराकडे मीटर कसे असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यातही तुमच्याकडे मीटर नाही का? असे विचारल्यास वरीष्ठ पातळीवरुनच आम्हाला मीटर प्राप्त होत नसल्याचे उत्तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दिले जात आहे.

त्यामुळे बहुसंख्य ग्राहकांना सहा महिने ते ११ महिन्यापासून नवीन मीटरच उपलब्ध होऊ शकले नसल्याची बाब दिसून आली आहे. दुसरीकडे आता नव्याने डीजीटल मीटरचे स्वप्न ग्राहकांना दाखविले जात आहे. ते मीटर आल्यावरच तुम्हाला मीटर बदलून मिळतील असेही सांगितले जात आहे. त्यामुळे महावितरणाचा कारभार, मीटरसाठी ११ महिने थांब अशीच म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे.

टॅग्स :thaneठाणेmahavitaranमहावितरण