शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ठाणे आणि पालघरमध्ये महाविकास आघाडी एकत्र निवडणुक लढणार; जितेंद्र आव्हाड यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 15:46 IST

Jitendra Awhad : उल्हासनगरमधील तब्बल २१ नगरसेवकांसह १९ माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशानंतर राष्ट्रवादीची जिल्ह्यात ताकद वाढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

ठाणे - उल्हासनगरमध्ये भाजपला खिंडार पाडल्यानंतर आता आगामी काळात ठाण्यासह पालघरमध्ये महाविकास आघाडी सर्वच निवडणुका एकत्रित लढविणार असल्याचा दावा राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तर काँग्रेसने केलेल्या दाव्याची देखील त्यांनी हवा काढली आहे.

बुधवारी उल्हासनगरमधील तब्बल २१ नगरसेवकांसह १९ माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशानंतर राष्ट्रवादीची जिल्ह्यात ताकद वाढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. परंतु दुसरीकडे आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढेल असे सांगून त्यांनी काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या स्वबळाच्या दाव्याची हवा काढली आहे. वरिष्ठ हे केवळ कार्यकर्त्यांचा उत्साह वाढावा म्हणून असा दावा करीत असतात, मात्र प्रत्यक्षात आम्ही एकत्रच निवडणूक लढवू असे त्यांनी स्पष्ट केले. नवीमुंबईत एक एक करुन आम्ही करिष्मा दाखविला आहे. 

"भिवंडीतही राष्ट्रवादीच्या बाजूने कौल त्यामुळे जिल्ह्यात येत्या काळात मोठे बदल दिसतील"

भिवंडीतही राष्ट्रवादीच्या बाजूने कौल घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात येत्या काळात मोठे बदल दिसतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. एकीकडे ठाण्यात काँग्रेसचे पदाधिकारी कोणत्याही परिस्थितीत एकत्रित निवडणूक लढणार नसल्याचा दावा करीत आहेत. तसेच काही वरिष्ठांनी देखील तसा दावा केला होता. परंतु मागील आठवडय़ात महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपला ज्या ज्या पातळीवर खाली आणायचे असेल त्या त्याठिकाणी महाविकास आघाडी एकत्र लढेल असे संकेत दिले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आव्हाड यांनी देखील तसेच संकेत दिल्याने आता आगामी काळात त्याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना ठाणेकरांनी अनुभवला

दरम्यान ठाण्यात मागील काही दिवसापासून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा लसीकरणावरुन वाद पेटल्याचे दिसून आले आहे. शिवसेनेने कळव्यात लसीकरण घेऊन राष्ट्रवादीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. तर राष्ट्रवादीने देखील कोपरी पाचपाखाडी या शिवसेनेच्या मतदारसंघात लसीकरण उत्सव साजरा करण्याची परवानगी मागितली होती. यावरुन शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना ठाणेकरांनी अनुभवला होता. परंतु आता आव्हाडांनी केलेल्या दाव्याने हा वादही तात्पुरता होता का? अशी शंका मात्र निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेpalgharपालघरUddhav Thackerayउद्धव ठाकरे