शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

ठाणे आणि पालघरमध्ये महाविकास आघाडी एकत्र निवडणुक लढणार; जितेंद्र आव्हाड यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 15:46 IST

Jitendra Awhad : उल्हासनगरमधील तब्बल २१ नगरसेवकांसह १९ माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशानंतर राष्ट्रवादीची जिल्ह्यात ताकद वाढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

ठाणे - उल्हासनगरमध्ये भाजपला खिंडार पाडल्यानंतर आता आगामी काळात ठाण्यासह पालघरमध्ये महाविकास आघाडी सर्वच निवडणुका एकत्रित लढविणार असल्याचा दावा राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तर काँग्रेसने केलेल्या दाव्याची देखील त्यांनी हवा काढली आहे.

बुधवारी उल्हासनगरमधील तब्बल २१ नगरसेवकांसह १९ माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशानंतर राष्ट्रवादीची जिल्ह्यात ताकद वाढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. परंतु दुसरीकडे आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढेल असे सांगून त्यांनी काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या स्वबळाच्या दाव्याची हवा काढली आहे. वरिष्ठ हे केवळ कार्यकर्त्यांचा उत्साह वाढावा म्हणून असा दावा करीत असतात, मात्र प्रत्यक्षात आम्ही एकत्रच निवडणूक लढवू असे त्यांनी स्पष्ट केले. नवीमुंबईत एक एक करुन आम्ही करिष्मा दाखविला आहे. 

"भिवंडीतही राष्ट्रवादीच्या बाजूने कौल त्यामुळे जिल्ह्यात येत्या काळात मोठे बदल दिसतील"

भिवंडीतही राष्ट्रवादीच्या बाजूने कौल घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात येत्या काळात मोठे बदल दिसतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. एकीकडे ठाण्यात काँग्रेसचे पदाधिकारी कोणत्याही परिस्थितीत एकत्रित निवडणूक लढणार नसल्याचा दावा करीत आहेत. तसेच काही वरिष्ठांनी देखील तसा दावा केला होता. परंतु मागील आठवडय़ात महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपला ज्या ज्या पातळीवर खाली आणायचे असेल त्या त्याठिकाणी महाविकास आघाडी एकत्र लढेल असे संकेत दिले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आव्हाड यांनी देखील तसेच संकेत दिल्याने आता आगामी काळात त्याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना ठाणेकरांनी अनुभवला

दरम्यान ठाण्यात मागील काही दिवसापासून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा लसीकरणावरुन वाद पेटल्याचे दिसून आले आहे. शिवसेनेने कळव्यात लसीकरण घेऊन राष्ट्रवादीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. तर राष्ट्रवादीने देखील कोपरी पाचपाखाडी या शिवसेनेच्या मतदारसंघात लसीकरण उत्सव साजरा करण्याची परवानगी मागितली होती. यावरुन शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना ठाणेकरांनी अनुभवला होता. परंतु आता आव्हाडांनी केलेल्या दाव्याने हा वादही तात्पुरता होता का? अशी शंका मात्र निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेpalgharपालघरUddhav Thackerayउद्धव ठाकरे