शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
2
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
3
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टेमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
4
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
5
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
6
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
7
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
8
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
9
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
10
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
12
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
13
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
14
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार
15
'या'साठी रशियासोबत भागीदारी करण्याच्या तयारीत भारत, चीनला झटका देणार; अवलंबित्व कमी करणार
16
सणासुदीच्या दिवसांत दोन अपघात; नंदुरबारमध्ये सात भाविकांचा बळी, समृद्धीवर म्यानमारच्या नागरिकांचा अपघाती अंत
17
"मोठे नेते गैरसमजातून बोलले, पण इतकी वर्षे..."; भुजबळांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर विखे-पाटलांचे स्पष्टीकरण
18
केवळ ५ वर्षांत ३५ लाख रुपयांचा फंड; पैशांचा पाऊस पाडणारी ही पोस्टाची स्कीम कोणती? जाणून घ्या
19
Radhika Yadav Case: "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली
20
कुंडली न जुळवता लग्न केलं तर होऊ शकते हत्या; बनारस हिंदू विद्यापीठाचे धक्कादायक संशोधन, काय म्हटलंय?

Vidhan Sabha 2019: विधानसभा निवडणूक ठरणार मनसेची परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 00:03 IST

२४ मतदारसंघांतील समस्यांचा अभ्यास सुरू; ठाणे-पालघरमध्ये राज ठाकरेंच्या सभा

- अजित मांडके ठाणे : लोकसभा निवडणुकीतून माघार घेणाऱ्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने आता विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, राज्यात १०० ठिकाणी मनसेकडून उमेदवार दिले जाणार आहेत. त्यातील २४ उमेदवार हे ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील असणार आहेत. यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील मरगळ आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये त्यानिमित्ताने का होईना जोश निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे यानिमित्ताने पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आदींसह पालघरमध्ये सभा होणार आहेत. यामध्ये ते भाजपविरोधात पुन्हा डरकाळी फोडणार आहेत. याशिवाय, विधानसभेच्या या कठीण परीक्षेत किती टक्के मिळणार, याचाही अभ्यास मनसे यानिमित्ताने करणार आहे.लोकसभा निवडणुकीत एकही जागा न लढता केवळ लाव रे तो व्हिडीओमुळे राज यांची चांगलीच चर्चा झाली होती. परंतु, त्यानंतर विधानसभा निवडणूक लढणार की नाही, याबाबतही अनेक तर्कवितर्क लावले जात होते. परंतु, अखेरच्या क्षणी मनसेने १०० जागा लढविण्याचे जाहीर केले. ठाणे आणि पालघरमधील सर्वच जागांवर म्हणजेच २४ जागांवर उमेदवार देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली. त्यासाठी प्रचाराचाही अजेंडा जवळजवळ निश्चित झाला आहे. यामध्ये रस्ते, वीज, पाणी आदींसह मूलभूत सोयीसुविधांची वानवा याची पोलखोल केली जाणार आहे. ठाण्यातील चार मतदारसंघांतूनही अशाच प्रकारे प्रचार केला जाणार असून मनसे सत्तेत आल्यास विकासाची हमीही दिली जाणार आहे.या निवडणुकीच्या निमित्ताने ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि पालघर आदी भागांत राज ठाकरे यांची डरकाळी फुटणार असून मोदींची पोलखोल हा कार्यक्रम यानिमित्ताने प्रमुख अजेंडा असणार असल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली.या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनसेला मानणारा किंबहुना मराठी मतांचा टक्का किती मनसेला साथ देणार, याचाही अभ्यास या निवडणुकीत होणार आहे.लोकसभा निवडणूक न लढल्यामुळे मनसेला कुठे, किती मते मिळू शकतात, मनसेच्या मतांचा फटका कोणाला बसणार, हे चित्र स्पष्ट होऊ शकले नव्हते. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत या सर्वांचीच उत्तरे किंबहुना किती टक्के मते मिळणार, हे स्वत: मनसे आणि इतर पक्षांना समजणार आहे. याच निवडणुकीत मिळविलेल्या मतांच्या जोरावर मनसेचा महापालिकेचा फॉर्म्युलाही निश्चित होणार असल्याचे बोलले जात आहे.पालघर नगर परिषदेत मनसेचा उमेदवारच नाहीठाणे जिल्ह्यापेक्षाही पालघर जिल्ह्यात मनसेची स्थिती अवघड आहे. मागील काही वर्षांत मनसेचा या पट्ट्यात तसा कुठेच प्रभाव दिसून आलेला नाही. पालघर नगर परिषदेत तर मनसेला उमेदवारसुद्धा मिळाले नव्हते. त्यामुळे या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली होती. जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती, येथेही मनसेचे इंजीन थांबलेलेच म्हणजे त्यांना भोपळाही फोडता आलेला नाही. मागील दीड वर्षापूर्वी मात्र जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर काही आंदोलनाच्या माध्यमातून मनसे येथे आहे, हे थोड्या अंशी चित्रित झाले. एकूणच ठाण्यापेक्षाही पालघरची परीक्षा मनसेसाठी अतिशय अवघड ठरणार असून त्यांना गुणांची टक्केवारी मिळेल की नाही, याबाबतही संभ्रम आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे