शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Vidhan sabha 2019 : कल्याणचा बालेकिल्ला राखा, अन्यथा राजीनामे द्या, उद्धव ठाकरे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 02:11 IST

भाजपकडून कल्याण पश्चिम मतदारसंघ मिळवलाय, पण यावेळी पक्षांतर्गत दुफळीमुळे उमेदवार पडला, तर सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेईन, अशी तंबी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिली.

- मुरलीधर भवारकल्याण/मुंबई : भाजपकडून कल्याण पश्चिम मतदारसंघ मिळवलाय, पण यावेळी पक्षांतर्गत दुफळीमुळे उमेदवार पडला, तर सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेईन, अशी तंबी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिली. आम्हाला ‘वरुण’ नव्हे की, ‘वरून’ही उमेदवार लादायचा नाही. उमेदवार खालूनच आला पाहिजे. पण, तो नक्की विजयी झाला पाहिजे, असे उद्गारही ठाकरे यांनी कल्याणच्या शिष्टमंडळाकडे काढले. त्यामुळे अखेर शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांना ‘ए व बी’ फॉर्म देऊन मातोश्रीने माघारी धाडल्याने येथील पेच तूर्त सुटला आहे.बेलापूर मतदारसंघावरील दावा सोडताना शिवसेनेने कल्याण पश्चिम हा भाजपच्या नरेंद्र पवार यांच्याकडील मतदारसंघ खेचून घेतला. २००९ मधील निवडणुकीत माजी महापौर राजेंद्र देवळेकर हे युती असतानाही भाजपच्या बंडखोरीमुळे पराभूत झाले होते, तर २०१४ मध्ये भाजप व शिवसेना समोरासमोर लढले आणि शिवसेनेतील धुसफुशीमुळे विजय साळवी यांचा पाडाव झाला. आपापसांतील हेव्यादाव्यांत एकतर बाहेरचा उमेदवार लादला जाऊ शकतो आणि पर्यायाने तिसऱ्यांदा मतदारसंघात पराभव झाला, तर पुन्हा भाजप त्यावर दावा करू शकतो, हे देवळेकर यांनी ओळखले. त्यांनी सर्व इच्छुकांना एकत्र करून एक पत्र तयार केले व शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी देण्याची मागणी पक्षप्रमुख ठाकरे यांच्याकडे केली. ठाकरे यांनी पत्र मिळताच बुधवारी दुपारी या सर्व शिवसैनिकांना चर्चेला बोलावले.

कल्याण पश्चिमची जागा आपण दोनवेळा गमावली. तरीही, कल्याण हा आपण शिवसेनेचा गड असल्याचा दावा करतो. तुमच्यात हेवेदावे सुरू असल्याने बाहेरून उमेदवार देण्याची चर्चा सुरू झाली. वरुण सरदेसाई याचे नाव तर मीडियाने चालवले. आमच्या मनात वरुण नव्हे की, वरूनही उमेदवार लादण्याचा विचार नव्हता व नाही. उमेदवार खालून शिवसैनिकांमधून आला पाहिजे. मात्र, आता तुम्ही एकमुखी मागणी केल्यानुसार भोईर यांना उमेदवारी दिल्यावर त्यांना विजयी करा. यावेळी पराभव झाला तर सगळ्यांचे राजीनामे मी घेईन, अशा शब्दांत उद्धव यांनी तंबी दिली.कल्याण पश्चिममध्ये भिवंडीतील प्रकाश पाटील यांना उमेदवारी देण्याकरिता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न सुरू होते. त्यातच, मंगळवारी रात्रीपासून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांचे नाव उमेदवारीकरिता चर्चेत आल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. बाहेरील उमेदवार दिल्यास प्रचार करणार नाही, असा सूर आळवला जात होता.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kalyan-west-acकल्याण पश्चिमShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे