शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

Maharashtra Floods : डोंबिवलीतील विद्यार्थ्यांनी केली पुरग्रस्तांना मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 09:06 IST

पुरामुळे आणि सतत सुरू असलेल्या पावसामुळे सांगली, सातारा, कोल्हापूरसह पंढरपूर शहराच्या आजूबाजूच्या गावांत जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ठळक मुद्देपुरामुळे सांगली, सातारा, कोल्हापूरसह पंढरपूर शहराच्या आजूबाजूच्या गावांत जनजीवन विस्कळीत झाले.नागरिकांना वस्तू रुपात सहाय्य पोहचविण्याची व्यवस्था अभाविप डोंबिवलीकडून करण्यात आली होतीमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला आहे.

डोंबिवली - पुरामुळे आणि सतत सुरू असलेल्या पावसामुळे सांगली, सातारा, कोल्हापूरसह पंढरपूर शहराच्या आजूबाजूच्या गावांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील नागरिकांना वस्तू रुपात सहाय्य पोहचविण्याची व्यवस्था अभाविप डोंबिवलीकडून करण्यात आली होती. यासाठी डोंबिवलीतील नागरिकांनी मदत केली आहे. 

औषधे, धान्य (गहू, तांदूळ, डाळ इ.), सुके खाद्यपदार्थ (ready to eat), बिस्किटे, चिवडा, फरसाण, कपडे, सेनेटरी नॅपकिन, ब्लॅंकेट, टॉवेल यासारख्या वस्तूचे मोठ्या प्रमाणात संकलन अभाविप कार्यालयात झाले आहे. हे सर्व सामान 10 किलोचे एक किट याप्रमाणे 350 किट तयार झाले आहेत. ज्यात डाळ, तांदूळ, चहा पावडर, हळद, साखर, तेल, साबण यांचा समावेश आहे.

वस्तूंचे सर्व पॅकिंग आणि सॉर्टईंग करण्यासाठी कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे अभाविपने आवाहन केले होते. डोंबिवलीमधील प्रगती कॉलेज, मॉडेल कॉलेज, वंदेमातरम कॉलेज आणि मंजुनाथ कॉलेज यातील NSS युनिटचे 60 हुन अधिक विद्यार्थी या मदत कार्यात सहभागी झाले आहेत. मॉडेल कॉलेजचे प्रा. भोळे सर, प्रा. पटवारी सर, प्रा. सोणम मॅडम, वंदेमातरम कॉलेजचे प्रा. कोल्हे सर, मंजुनाथ कॉलेजचे प्रा. अडीगळ सर, प्रा. पुष्कर सर, प्रगती कॉलेजचे प्रा. पाटील सर, प्रा. इंगळे सर यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

महाविद्यालयात सुट्टी असूनही डोंबिवलीतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला आहे. आमचा सुट्टीचा दिवस चांगल्या कामासाठी सार्थकी लागला, समाजासाठी काही करू शकलो अशी सुखद भावना सर्व विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. अभाविप आणि विविध महाविद्यालयातील NSS युनिट मिळून नाविन्यपूर्ण उपक्रम समाजात घेऊन जाऊन सोबत काम करू असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. या सर्वांसाठी सुयोग मंगल कार्यालयाचे व्यवस्थापन, रा. स्व. संघ जन कल्याण समिती, रा. स्व. समिती, डोंबिवली मधील विविध सामाजिक संस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या माध्यमातून कोल्हापूर आणि सांगली येथे वस्तू पोहचवल्या जाणार आहेत.

महापूर, तसेच अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात 40 जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी 19 जण सांगली जिल्ह्यातील आहेत. सांगली, कोल्हापूर भागातील तब्बल 200 रस्ते आणि  पूल बंद असल्याने मदत पोहोचविण्यात अडचणी येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील पूरस्थितीची हवाई पाहाणी केली. पुरामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला रशिया दौरा रद्द केला आहे.

राज्यातील दहा जिल्ह्यांत पूरपरिस्थिती असून, 70 तालुके व 761 गावे बाधित झाली आहेत.  4,47,695 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मदतकार्यात एनडीआरफच्या 32, एसडीआरफच्या 3, लष्कराच्या 21, नौदलाच्या 41, तटरक्षक दलाची 16 पथके कार्यरत आहेत. 226 बोटींद्वारे बचावकार्य सुरू आहे. पुरामुळे 40 व्यक्तींचा मृत्यू झाला, तर चारजण जखमी झाले आहेत, तर 48 जनावरे मृत्युमुखी पडल्याची माहिती माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीfloodपूरKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूरSatara Floodसातारा पूर