शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

महाविकास आघाडी सरकारमध्ये ठाण्याला मिळणार मोठा वाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 00:40 IST

तीन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्याला अखेर मंगळवारी पूर्णविराम मिळाला.

ठाणे - तीन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्याला अखेर मंगळवारी पूर्णविराम मिळाला. महाविकास आघाडीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून, त्यामुळे आपले सरकार तरेल आणि आपल्याला मंत्रिमंडळात संधी मिळेल, या आशेवर असलेल्या जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांचे अवसान आता पार गळाले आहे.महाविकास आघाडी सत्तारुढ होण्याची वेळ जवळ येताच ठाणे जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आता सत्तेत आपलं गणित कुठे आणि कसं जुळेल, याची गणितं बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना महत्वाची खाती मिळणार असल्याचे बोलले जात आहे. आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक यांचीही नावे आता आघाडीवर आली आहेत. यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच होण्याची शक्यताही आहे.राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना हाताशी धरुन भाजपने स्थापन केलेल्या सरकारचे आयुष्य अवघे तीन दिवसांचे ठरले. सुरुवातीला भाजपची सत्तेची समीकरणे जुळत असल्याचे दिसत असल्याने भाजपचे जिल्ह्यातील नेते मंत्रीपद मिळणार म्हणून आशावादी झाले होते. यामध्ये रवींद्र चव्हाण, किसन कथोरे, गणेश नाईक, संजय केळकर यांची नावे आघाडीवर होती. मात्र सत्तास्थापनेचे स्वप्न अवघ्या तीनच दिवसात भंगल्याने या सर्वांचाच हिरमोड झाला.अवघ्या महाराष्ट्राने गेल्या काही दिवसांमध्ये अनुभवलेल्या राजकीय घडामोडींमध्ये ठाण्याचे विशेष महत्त्व होते. शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड या ठाण्यातील नेत्यांनी या राजकीय घडामोडींमध्ये मोठी खिंड लढवली. फुटलेल्या आमदारांना परत आणणे, त्यांना सुरक्षित ठेवणे, त्यांची बडदास्त राखण्याचे महत्त्वाचे काम शिंदे आणि आव्हाड यांनी केले. एकनाथ शिंदे यांच्याकडे युती सरकारमध्येही महत्त्वाचे खाते आहे. आता शिवसेनेच्या सरकारमध्ये त्यांना यापेक्षाही चांगली जबाबदारी मिळू शकते. एकनाथ शिंदे हे पुन्हा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आणि कॅबीनेटमध्येही महत्वाचे पद त्यांना पुन्हा मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यांना गृहखाते, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य किंवा अन्य महत्त्वाचे खाते मिळण्याची चिन्हे आहेत. त्याचप्रमाणे आव्हाडांना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता असून, त्याचबरोबर कॅबीनेटमध्ये शालेय खाते किंवा वैद्यकीय खाते त्यांना मिळण्याची शक्यता आहे. रविंद्र फाटक यांनाही राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता असून, सरनाईकांच्या वाट्याला काय येणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.मनसे आमदाराचे राष्ट्रवादीच्या कोट्यातून भलेमागील कित्येक वर्षांपासून महत्वाच्या पदांसाठी डावलले गेलेले शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांना येत्या काही महिन्यांत नव्या समीकरणामुळे बढती मिळण्याची चिन्हे आहे.पक्षाकडून त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. ठाण्याचे विद्यमान महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांचीही नावे विधानपरिषदेसाठी पुढे आले आहे.विशेष म्हणजे मनसेचे राज्यातील एकमेव आमदार राजू पाटील यांच्या वाट्यालाही राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यमंत्री पद येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच राज्याच्या सत्तासमीकरणात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या ठाणे जिल्ह्याला मंत्रिमंडळातही मानाचे स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसthaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड