शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महाविकास आघाडी सरकारमध्ये ठाण्याला मिळणार मोठा वाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 00:40 IST

तीन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्याला अखेर मंगळवारी पूर्णविराम मिळाला.

ठाणे - तीन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्याला अखेर मंगळवारी पूर्णविराम मिळाला. महाविकास आघाडीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून, त्यामुळे आपले सरकार तरेल आणि आपल्याला मंत्रिमंडळात संधी मिळेल, या आशेवर असलेल्या जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांचे अवसान आता पार गळाले आहे.महाविकास आघाडी सत्तारुढ होण्याची वेळ जवळ येताच ठाणे जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आता सत्तेत आपलं गणित कुठे आणि कसं जुळेल, याची गणितं बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना महत्वाची खाती मिळणार असल्याचे बोलले जात आहे. आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक यांचीही नावे आता आघाडीवर आली आहेत. यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच होण्याची शक्यताही आहे.राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना हाताशी धरुन भाजपने स्थापन केलेल्या सरकारचे आयुष्य अवघे तीन दिवसांचे ठरले. सुरुवातीला भाजपची सत्तेची समीकरणे जुळत असल्याचे दिसत असल्याने भाजपचे जिल्ह्यातील नेते मंत्रीपद मिळणार म्हणून आशावादी झाले होते. यामध्ये रवींद्र चव्हाण, किसन कथोरे, गणेश नाईक, संजय केळकर यांची नावे आघाडीवर होती. मात्र सत्तास्थापनेचे स्वप्न अवघ्या तीनच दिवसात भंगल्याने या सर्वांचाच हिरमोड झाला.अवघ्या महाराष्ट्राने गेल्या काही दिवसांमध्ये अनुभवलेल्या राजकीय घडामोडींमध्ये ठाण्याचे विशेष महत्त्व होते. शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड या ठाण्यातील नेत्यांनी या राजकीय घडामोडींमध्ये मोठी खिंड लढवली. फुटलेल्या आमदारांना परत आणणे, त्यांना सुरक्षित ठेवणे, त्यांची बडदास्त राखण्याचे महत्त्वाचे काम शिंदे आणि आव्हाड यांनी केले. एकनाथ शिंदे यांच्याकडे युती सरकारमध्येही महत्त्वाचे खाते आहे. आता शिवसेनेच्या सरकारमध्ये त्यांना यापेक्षाही चांगली जबाबदारी मिळू शकते. एकनाथ शिंदे हे पुन्हा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आणि कॅबीनेटमध्येही महत्वाचे पद त्यांना पुन्हा मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यांना गृहखाते, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य किंवा अन्य महत्त्वाचे खाते मिळण्याची चिन्हे आहेत. त्याचप्रमाणे आव्हाडांना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता असून, त्याचबरोबर कॅबीनेटमध्ये शालेय खाते किंवा वैद्यकीय खाते त्यांना मिळण्याची शक्यता आहे. रविंद्र फाटक यांनाही राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता असून, सरनाईकांच्या वाट्याला काय येणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.मनसे आमदाराचे राष्ट्रवादीच्या कोट्यातून भलेमागील कित्येक वर्षांपासून महत्वाच्या पदांसाठी डावलले गेलेले शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांना येत्या काही महिन्यांत नव्या समीकरणामुळे बढती मिळण्याची चिन्हे आहे.पक्षाकडून त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. ठाण्याचे विद्यमान महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांचीही नावे विधानपरिषदेसाठी पुढे आले आहे.विशेष म्हणजे मनसेचे राज्यातील एकमेव आमदार राजू पाटील यांच्या वाट्यालाही राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यमंत्री पद येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच राज्याच्या सत्तासमीकरणात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या ठाणे जिल्ह्याला मंत्रिमंडळातही मानाचे स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसthaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड