शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
4
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
5
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
6
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
7
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
8
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
9
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
10
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
11
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
12
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
13
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
14
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
15
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
16
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
17
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
18
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
19
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
20
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?

Maharashtra Government: ठाणे जिल्ह्यातील भाजप आमदार निश्चिंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 01:31 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपापले आमदार एक प्रकारे नजरकैदेत ठेवले असताना, जिल्ह्यातील भाजपचे आमदार मात्र आपापल्या मतदारसंघात कार्यरत आहेत.

- अनिकेत घमंडीडोंबिवली : सत्ता स्थापनेसाठी राज्यात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा धसका घेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपापले आमदार एक प्रकारे नजरकैदेत ठेवले असताना, जिल्ह्यातील भाजपचे आमदार मात्र आपापल्या मतदारसंघात कार्यरत आहेत. पक्षाच्या वेळोवेळी सुरु असलेल्या बैठकांसाठी आम्हाला मुंबईला जावे लागत आहे. मात्र, उर्वरित वेळ आम्ही मतदारसंघासाठी देत असल्याचे जिल्ह्यातील भाजप आमदारांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारला ३० नोव्हेंबर रोजी बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. बहुमताचे धनुष्य पक्ष सहज पेलेल, असा विश्वास ठाणे जिल्ह्यातील भाजप आमदारांनी व्यक्त केला. मात्र, ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिले, त्यांच्यासाठी काम करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी आम्हाला मतदारसंघातच राहायला सांगून, आवश्यकता असेल तेव्हा मुंबईत येण्याच्या सूचना केल्या आहेत.सत्तास्थापनेच्या गोंधळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मात्र जिल्ह्यातून गायब झाले आहेत. शिवसेना नेते आ. एकनाथ शिंदे यांच्यासह या पक्षाचे ठाणे जिल्ह्यातील आ. प्रताप सरनाईक, विश्वनाथ भोईर, बालाजी किणीकर, शांताराम मोरे यांच्यासह पालघर जिल्ह्यातील सुनील भुसारा आणि श्रीनिवास वणगा हेदेखील पक्षनेत्यांच्या आदेशानुसार मुंबईतच तळ ठोकून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्ह्यात दोन आमदार आहेत. त्यापैकी आ. जितेंद्र आव्हाड हे राज्यस्तरावरील महत्त्वाच्या घडामोडींमध्ये अग्रस्थानी दिसत असून, शहापूरचे आ. दौलत दरोडा हे अजित पवारांसोबत गेल्याने चर्चेत आले. मात्र, आपण शरद पवारांसोबतच असल्याचा व्हिडीओ त्यांनी रविवारी सोशल मीडियावर पोस्ट केला.भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसला नक्कीच बहुमत मिळेल. त्यानुसार, रणनीती आखण्यात आली आहे. भाजपचे सर्व आमदार आमच्यासोबत असून प्रत्येकाला जी जबाबदारी दिली आहे, त्यानुसार काम सुरू आहे. सर्व घडामोडींवर दिल्ली ते गल्लीपर्यंत पक्षश्रेष्ठींचे बारीक लक्ष आहे.- आ. रवींद्र चव्हाण,माजी राज्यमंत्री, भाजपभाजपचे सरकार येईल, यात शंका नाही. आम्हाला मतदारसंघामध्येच कार्यरत राहण्याचे पक्षाचे आदेश आहेत. गरजेनुसार दोन तासांत मुंबईला यावे, असेही सूचित करण्यात आले आहे. आमच्या पक्षश्रेष्ठींचा आमच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे यावरून स्पष्ट होते. यातून काम करण्यासाठी ऊर्जा मिळते.- आ. गणपत गायकवाड, कल्याण पूर्वआम्हाला बंदिस्त ठेवण्याची पक्षाला गरजच नाही. आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांसमवेत मी काम केलेले आहे. त्यांच्यासारखे नेतृत्व राज्याला लाभल्याने विकासकामे झपाट्याने होतील. मी आजपर्यंत विकासाच्या राजकारणाला साथ दिली आहे. यावेळीही पक्षाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडणार आहे.- आ. किसन कथोरे,मुरबाड मतदारसंघउल्हासनगरच्या लाखो मतदारांनी सरकारच्या विकासरथाला बघून मतदान केले आहे. त्यामुळे मतदारांसाठी आम्ही सगळे मतदारसंघातच असून कुठेही गेलेलो नाही. पक्षश्रेष्ठींच्या अहोरात्र संपर्कात आहोत.- कुमार आयलानी, उल्हासनगरशेवटी काय तर हिस्से, वाटे यासाठीच सारे काही आहे. हेच राजकारण संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघत असून, लाखो मतदारांची ही शोकांतिका आहे. मी स्वत: या परिस्थितीवर फारसे बोलू शकत नाही. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाची वाट मी बघत आहे. मात्र, मतदारसंघात माझे काम सुरू आहे. हे राजकारण फार काळ टिकणार नाही, असे दिसते.- आ. प्रमोद (राजू) पाटील, मनसे नेते, कल्याण ग्रामीण मतदारसंघ

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारthaneठाणे