शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

Maharashtra Government: ठाणे जिल्ह्यातील भाजप आमदार निश्चिंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 01:31 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपापले आमदार एक प्रकारे नजरकैदेत ठेवले असताना, जिल्ह्यातील भाजपचे आमदार मात्र आपापल्या मतदारसंघात कार्यरत आहेत.

- अनिकेत घमंडीडोंबिवली : सत्ता स्थापनेसाठी राज्यात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा धसका घेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपापले आमदार एक प्रकारे नजरकैदेत ठेवले असताना, जिल्ह्यातील भाजपचे आमदार मात्र आपापल्या मतदारसंघात कार्यरत आहेत. पक्षाच्या वेळोवेळी सुरु असलेल्या बैठकांसाठी आम्हाला मुंबईला जावे लागत आहे. मात्र, उर्वरित वेळ आम्ही मतदारसंघासाठी देत असल्याचे जिल्ह्यातील भाजप आमदारांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारला ३० नोव्हेंबर रोजी बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. बहुमताचे धनुष्य पक्ष सहज पेलेल, असा विश्वास ठाणे जिल्ह्यातील भाजप आमदारांनी व्यक्त केला. मात्र, ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिले, त्यांच्यासाठी काम करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी आम्हाला मतदारसंघातच राहायला सांगून, आवश्यकता असेल तेव्हा मुंबईत येण्याच्या सूचना केल्या आहेत.सत्तास्थापनेच्या गोंधळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मात्र जिल्ह्यातून गायब झाले आहेत. शिवसेना नेते आ. एकनाथ शिंदे यांच्यासह या पक्षाचे ठाणे जिल्ह्यातील आ. प्रताप सरनाईक, विश्वनाथ भोईर, बालाजी किणीकर, शांताराम मोरे यांच्यासह पालघर जिल्ह्यातील सुनील भुसारा आणि श्रीनिवास वणगा हेदेखील पक्षनेत्यांच्या आदेशानुसार मुंबईतच तळ ठोकून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्ह्यात दोन आमदार आहेत. त्यापैकी आ. जितेंद्र आव्हाड हे राज्यस्तरावरील महत्त्वाच्या घडामोडींमध्ये अग्रस्थानी दिसत असून, शहापूरचे आ. दौलत दरोडा हे अजित पवारांसोबत गेल्याने चर्चेत आले. मात्र, आपण शरद पवारांसोबतच असल्याचा व्हिडीओ त्यांनी रविवारी सोशल मीडियावर पोस्ट केला.भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसला नक्कीच बहुमत मिळेल. त्यानुसार, रणनीती आखण्यात आली आहे. भाजपचे सर्व आमदार आमच्यासोबत असून प्रत्येकाला जी जबाबदारी दिली आहे, त्यानुसार काम सुरू आहे. सर्व घडामोडींवर दिल्ली ते गल्लीपर्यंत पक्षश्रेष्ठींचे बारीक लक्ष आहे.- आ. रवींद्र चव्हाण,माजी राज्यमंत्री, भाजपभाजपचे सरकार येईल, यात शंका नाही. आम्हाला मतदारसंघामध्येच कार्यरत राहण्याचे पक्षाचे आदेश आहेत. गरजेनुसार दोन तासांत मुंबईला यावे, असेही सूचित करण्यात आले आहे. आमच्या पक्षश्रेष्ठींचा आमच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे यावरून स्पष्ट होते. यातून काम करण्यासाठी ऊर्जा मिळते.- आ. गणपत गायकवाड, कल्याण पूर्वआम्हाला बंदिस्त ठेवण्याची पक्षाला गरजच नाही. आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांसमवेत मी काम केलेले आहे. त्यांच्यासारखे नेतृत्व राज्याला लाभल्याने विकासकामे झपाट्याने होतील. मी आजपर्यंत विकासाच्या राजकारणाला साथ दिली आहे. यावेळीही पक्षाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडणार आहे.- आ. किसन कथोरे,मुरबाड मतदारसंघउल्हासनगरच्या लाखो मतदारांनी सरकारच्या विकासरथाला बघून मतदान केले आहे. त्यामुळे मतदारांसाठी आम्ही सगळे मतदारसंघातच असून कुठेही गेलेलो नाही. पक्षश्रेष्ठींच्या अहोरात्र संपर्कात आहोत.- कुमार आयलानी, उल्हासनगरशेवटी काय तर हिस्से, वाटे यासाठीच सारे काही आहे. हेच राजकारण संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघत असून, लाखो मतदारांची ही शोकांतिका आहे. मी स्वत: या परिस्थितीवर फारसे बोलू शकत नाही. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाची वाट मी बघत आहे. मात्र, मतदारसंघात माझे काम सुरू आहे. हे राजकारण फार काळ टिकणार नाही, असे दिसते.- आ. प्रमोद (राजू) पाटील, मनसे नेते, कल्याण ग्रामीण मतदारसंघ

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारthaneठाणे