शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: ठाणे जिल्ह्यातील भाजप आमदार निश्चिंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 01:31 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपापले आमदार एक प्रकारे नजरकैदेत ठेवले असताना, जिल्ह्यातील भाजपचे आमदार मात्र आपापल्या मतदारसंघात कार्यरत आहेत.

- अनिकेत घमंडीडोंबिवली : सत्ता स्थापनेसाठी राज्यात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा धसका घेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपापले आमदार एक प्रकारे नजरकैदेत ठेवले असताना, जिल्ह्यातील भाजपचे आमदार मात्र आपापल्या मतदारसंघात कार्यरत आहेत. पक्षाच्या वेळोवेळी सुरु असलेल्या बैठकांसाठी आम्हाला मुंबईला जावे लागत आहे. मात्र, उर्वरित वेळ आम्ही मतदारसंघासाठी देत असल्याचे जिल्ह्यातील भाजप आमदारांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारला ३० नोव्हेंबर रोजी बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. बहुमताचे धनुष्य पक्ष सहज पेलेल, असा विश्वास ठाणे जिल्ह्यातील भाजप आमदारांनी व्यक्त केला. मात्र, ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिले, त्यांच्यासाठी काम करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी आम्हाला मतदारसंघातच राहायला सांगून, आवश्यकता असेल तेव्हा मुंबईत येण्याच्या सूचना केल्या आहेत.सत्तास्थापनेच्या गोंधळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मात्र जिल्ह्यातून गायब झाले आहेत. शिवसेना नेते आ. एकनाथ शिंदे यांच्यासह या पक्षाचे ठाणे जिल्ह्यातील आ. प्रताप सरनाईक, विश्वनाथ भोईर, बालाजी किणीकर, शांताराम मोरे यांच्यासह पालघर जिल्ह्यातील सुनील भुसारा आणि श्रीनिवास वणगा हेदेखील पक्षनेत्यांच्या आदेशानुसार मुंबईतच तळ ठोकून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्ह्यात दोन आमदार आहेत. त्यापैकी आ. जितेंद्र आव्हाड हे राज्यस्तरावरील महत्त्वाच्या घडामोडींमध्ये अग्रस्थानी दिसत असून, शहापूरचे आ. दौलत दरोडा हे अजित पवारांसोबत गेल्याने चर्चेत आले. मात्र, आपण शरद पवारांसोबतच असल्याचा व्हिडीओ त्यांनी रविवारी सोशल मीडियावर पोस्ट केला.भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसला नक्कीच बहुमत मिळेल. त्यानुसार, रणनीती आखण्यात आली आहे. भाजपचे सर्व आमदार आमच्यासोबत असून प्रत्येकाला जी जबाबदारी दिली आहे, त्यानुसार काम सुरू आहे. सर्व घडामोडींवर दिल्ली ते गल्लीपर्यंत पक्षश्रेष्ठींचे बारीक लक्ष आहे.- आ. रवींद्र चव्हाण,माजी राज्यमंत्री, भाजपभाजपचे सरकार येईल, यात शंका नाही. आम्हाला मतदारसंघामध्येच कार्यरत राहण्याचे पक्षाचे आदेश आहेत. गरजेनुसार दोन तासांत मुंबईला यावे, असेही सूचित करण्यात आले आहे. आमच्या पक्षश्रेष्ठींचा आमच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे यावरून स्पष्ट होते. यातून काम करण्यासाठी ऊर्जा मिळते.- आ. गणपत गायकवाड, कल्याण पूर्वआम्हाला बंदिस्त ठेवण्याची पक्षाला गरजच नाही. आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांसमवेत मी काम केलेले आहे. त्यांच्यासारखे नेतृत्व राज्याला लाभल्याने विकासकामे झपाट्याने होतील. मी आजपर्यंत विकासाच्या राजकारणाला साथ दिली आहे. यावेळीही पक्षाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडणार आहे.- आ. किसन कथोरे,मुरबाड मतदारसंघउल्हासनगरच्या लाखो मतदारांनी सरकारच्या विकासरथाला बघून मतदान केले आहे. त्यामुळे मतदारांसाठी आम्ही सगळे मतदारसंघातच असून कुठेही गेलेलो नाही. पक्षश्रेष्ठींच्या अहोरात्र संपर्कात आहोत.- कुमार आयलानी, उल्हासनगरशेवटी काय तर हिस्से, वाटे यासाठीच सारे काही आहे. हेच राजकारण संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघत असून, लाखो मतदारांची ही शोकांतिका आहे. मी स्वत: या परिस्थितीवर फारसे बोलू शकत नाही. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाची वाट मी बघत आहे. मात्र, मतदारसंघात माझे काम सुरू आहे. हे राजकारण फार काळ टिकणार नाही, असे दिसते.- आ. प्रमोद (राजू) पाटील, मनसे नेते, कल्याण ग्रामीण मतदारसंघ

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारthaneठाणे