शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

Maharashtra Election 2019 : ठाणे शहर मतदारसंघ, मनसे देणार का भाजपला टक्कर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 01:11 IST

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा संजय केळकर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.

ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा संजय केळकर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अद्यापही या मतदारसंघात उमेदवाराची घोषणा केलेली नाही. तर, काँग्रेसनेही हा मतदारसंघ सोडण्याची तयारी केलेली नाही. त्यामुळे या दोघांपैकी कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. असे असले तरी मागील विधानसभा आणि त्यापाठोपाठ नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही या मतदारसंघातून आघाडीला फारशी मते मिळालेली नाहीत. त्यामुळे सध्या या मतदारसंघात भाजप विरुद्ध मनसे अशीच फाइट दिसत असून मनसे कितपत टक्कर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात सध्या शिवसेना व भाजपचे वर्चस्व आहे. परंतु, हा मतदारसंघ मिळावा, यासाठी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून हालचाली सुरू होत्या. मात्र, या मतदारसंघाची मागणीच करण्यात आली नसल्याची माहिती उघड झाली आहे. दुसरीकडे भाजपच्या विद्यमान आमदाराविरोधात त्यांच्याच पक्षातील अनेक इच्छुकांनी आव्हान दिले आहे. मात्र, पक्षाने केळकर यांच्या उमेदवारीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. दुसरीकडे मीरा-भार्इंदरच्या बदल्यात ठाणे असे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे समीकरण निश्चित झाले होते. त्यानुसार, काँग्रेसच्या श्रेष्ठींनी शब्द पाळत मीरा-भार्इंदरचा आपला उमेदवारही जाहीर केला आहे. परंतु, ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने आपल्या उमेदवाराचे नाव अद्यापही गुलदस्त्यात ठेवले आहे. त्यात काँग्रेसने या मतदारसंघावरील दावा अद्यापही कायम ठेवला आहे. त्यामुळेच कदाचित उमेदवारी अद्यापही निश्चित झाली नसल्याचे बोलले जात आहे. परंतु, मनसेकडून अविनाश जाधव यांचे नाव अंतिम झाले आहे.आता मनसे या निवडणुकीत काय चमत्कार दाखवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात ब्राह्मण, गुजराती आणि उच्चभ्रू मतदारांची संख्या जास्तीची आहे. त्यामुळे याचा फायदा हा मागील कित्येक वर्षे शिवसेना आणि भाजपच्याच उमेदवाराला झालेला दिसून आला आहे. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना ५१०१० मते मिळाली होती, तर मनसेचे राजन राजे यांना ४८५६९ मते मिळाली होती. काँग्रेसच्या सुभाष कानडे यांना ३६२८८ मते मिळाली होती. तर, आघाडीशी बंड करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाºया राष्टÑवादीच्या देवराम भोईर यांनीसुद्धा येथून १७२४४ मते मिळवली होती.२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर यांनी शिवसेनेचे रवींद्र फाटक यांचा दारुण पराभव केला होता. शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांना ५८२९६ मते मिळाली होती. तर, भाजपचे संजय केळकर यांना ७० हजार ८८४ मते मिळाली होती. मनसेचे निलेश चव्हाण यांना अवघी आठ हजार ३३८ मते मिळाली होती. आता ते भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत.२००९ च्या तुलनेत २०१४ मध्ये मनसेच्या मतांमध्ये तब्बल २७ टक्कयांची घट झाल्याचे दिसून आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मनसेने आपला उमेदवार उभा केला नसल्याने या मतदारसंघातून किती मते मिळणार, याचा अंदाज अद्यापही मनसेलासुद्धा बांधता आलेला नाही. त्यात महापालिकेत मनसेचा एकही नगरसेवक नाही. परंतु, मागील दीड ते दोन वर्षांत मनसेच्या माध्यमातून झालेल्या विविध आंदोलनांच्या मराठी विरुद्ध गुजराथी अशा रंगलेल्या वादात मनसेने घेतलेली उडी या सर्वांचा किती फायदा होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MNSमनसेBJPभाजपा