शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup 2026 Schedule Announced : टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाक एकाच गटात
2
“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द
3
बिहार फत्ते; आता 'या' दोना राज्यात NDA चे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा मोठा दावा...
4
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
5
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
6
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
7
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
8
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
9
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
10
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
11
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
12
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
13
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
14
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
15
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
16
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
17
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
18
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
19
'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
20
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : ठाणे शहर मतदारसंघ, मनसे देणार का भाजपला टक्कर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 01:11 IST

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा संजय केळकर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.

ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा संजय केळकर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अद्यापही या मतदारसंघात उमेदवाराची घोषणा केलेली नाही. तर, काँग्रेसनेही हा मतदारसंघ सोडण्याची तयारी केलेली नाही. त्यामुळे या दोघांपैकी कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. असे असले तरी मागील विधानसभा आणि त्यापाठोपाठ नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही या मतदारसंघातून आघाडीला फारशी मते मिळालेली नाहीत. त्यामुळे सध्या या मतदारसंघात भाजप विरुद्ध मनसे अशीच फाइट दिसत असून मनसे कितपत टक्कर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात सध्या शिवसेना व भाजपचे वर्चस्व आहे. परंतु, हा मतदारसंघ मिळावा, यासाठी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून हालचाली सुरू होत्या. मात्र, या मतदारसंघाची मागणीच करण्यात आली नसल्याची माहिती उघड झाली आहे. दुसरीकडे भाजपच्या विद्यमान आमदाराविरोधात त्यांच्याच पक्षातील अनेक इच्छुकांनी आव्हान दिले आहे. मात्र, पक्षाने केळकर यांच्या उमेदवारीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. दुसरीकडे मीरा-भार्इंदरच्या बदल्यात ठाणे असे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे समीकरण निश्चित झाले होते. त्यानुसार, काँग्रेसच्या श्रेष्ठींनी शब्द पाळत मीरा-भार्इंदरचा आपला उमेदवारही जाहीर केला आहे. परंतु, ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने आपल्या उमेदवाराचे नाव अद्यापही गुलदस्त्यात ठेवले आहे. त्यात काँग्रेसने या मतदारसंघावरील दावा अद्यापही कायम ठेवला आहे. त्यामुळेच कदाचित उमेदवारी अद्यापही निश्चित झाली नसल्याचे बोलले जात आहे. परंतु, मनसेकडून अविनाश जाधव यांचे नाव अंतिम झाले आहे.आता मनसे या निवडणुकीत काय चमत्कार दाखवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात ब्राह्मण, गुजराती आणि उच्चभ्रू मतदारांची संख्या जास्तीची आहे. त्यामुळे याचा फायदा हा मागील कित्येक वर्षे शिवसेना आणि भाजपच्याच उमेदवाराला झालेला दिसून आला आहे. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना ५१०१० मते मिळाली होती, तर मनसेचे राजन राजे यांना ४८५६९ मते मिळाली होती. काँग्रेसच्या सुभाष कानडे यांना ३६२८८ मते मिळाली होती. तर, आघाडीशी बंड करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाºया राष्टÑवादीच्या देवराम भोईर यांनीसुद्धा येथून १७२४४ मते मिळवली होती.२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर यांनी शिवसेनेचे रवींद्र फाटक यांचा दारुण पराभव केला होता. शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांना ५८२९६ मते मिळाली होती. तर, भाजपचे संजय केळकर यांना ७० हजार ८८४ मते मिळाली होती. मनसेचे निलेश चव्हाण यांना अवघी आठ हजार ३३८ मते मिळाली होती. आता ते भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत.२००९ च्या तुलनेत २०१४ मध्ये मनसेच्या मतांमध्ये तब्बल २७ टक्कयांची घट झाल्याचे दिसून आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मनसेने आपला उमेदवार उभा केला नसल्याने या मतदारसंघातून किती मते मिळणार, याचा अंदाज अद्यापही मनसेलासुद्धा बांधता आलेला नाही. त्यात महापालिकेत मनसेचा एकही नगरसेवक नाही. परंतु, मागील दीड ते दोन वर्षांत मनसेच्या माध्यमातून झालेल्या विविध आंदोलनांच्या मराठी विरुद्ध गुजराथी अशा रंगलेल्या वादात मनसेने घेतलेली उडी या सर्वांचा किती फायदा होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MNSमनसेBJPभाजपा