शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक २०१९: ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाच्या मतदानात घट; कोणाला बसणार फटका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 18:14 IST

Thane Vidhan Sabha Election : दुसरीकडे राष्ट्रवादीने मनसेला टाळी दिली असली तरी राष्ट्रवादीला मानणारा मतदार मतदानासाठी कमी संख्येने उतरला असावा अशी चर्चा आहे

ठाणे : ठाणे शहर मतदारसंघातील पाच उमेदवारांचा फैसला सोमवारी मतपेटीत बंद झाला. मागील वेळेच्या तुलनेत यंदा ४.०९ टक्क्यांनी मतदानात घट झाली आहे. याची आता वेगवेगळी कारणे पुढे येत असली पर्याय असतानाही शिवसेनेच्या या बालेकिल्यात मतदानाच्या टक्केवारीत घट का झाली याची चर्चा मात्र सुरु झाली आहे. या ठिकाणच्या समस्या सुटलेल्या नाहीत, की विद्यमान आमदाराकडून मतदारांची निराशा झाली, आदींसह इतरही कारणे आता चर्चेला आली आहेत. परंतु, या घटलेल्या टक्केवारीचा नेमका फायदा कोणाला होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ठाणे शहर मतदारसंघात ५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. परंतु, खरी लढत ही भाजप विरुद्ध मनसे अशीच झाली आहे. मागील वेळेस युती व आघाडी न झाल्याने भाजप विरुद्ध शिवसेना तर काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी चौरंगी लढत या मतदारसंघात होती. परंतु, आताच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाल्याने भाजप येथून लढली. मात्र, आघाडीकडून राष्ट्रवादीने अंतिम क्षणी माघार घेऊन मनसेला पाठिंबा दिला. यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी या मतदारसंघाची निवडणूक ही शेवटच्या क्षणी चुरशीची झाल्याचे चित्र पाहावायस मिळाले. मनसेला राष्ट्रवादीने थेट टाळी दिली, तर काँग्रेसने अखेरच्या क्षणी छुपा पाठिंबा दिला. त्यामुळे खऱ्या अर्थाने या निवडणुकीची समीकरणे काहीशी बदलतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीतही वाढ होईल, असेही बोलले जात होते. मात्र, प्रत्यक्षात मतदानाची टक्केवारी घटल्याचे दिसून आले. त्यामुळे आता कोणत्या बुथमधून टक्केवारीत घट झाली, याचा उहापोह शिवसेना आणि भाजपच्या गोटातून सुरू झाला आहे. त्यामुळे बुथनिहाय आकडेवारी गोळा करण्यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेताना दिसले. येथे खरी लढत ही भाजपचे संजय केळकर विरुद्ध मनसेचे अविनाश जाधव यांच्यात आहे.२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत येथे ५६.५६ टक्के मतदानाची नोंद झाली होती. २०१४ मध्ये एकूण ३ लाख २२ हजार १६८ मतदारांपैकी १ लाख ८२ हजार २३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ८२ हजार ८०६ पुरुष आणि ९९ हजार ४२७ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विशेष म्हणजे पुरुष मतदात्यांच्या तुलनेत १६ हजार ६२१ अधिक महिलांनी मतदान केले आहे. यंदा या मतदारांची संख्या ३ लाख ३७ हजार ९०९ एवढी होती. मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदारांची संख्यादेखील वाढली असतानाही मतदानाची टक्केवारी घटल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, या निवडणुकीत यंदा ५२.४७ टक्के मतदान झाले असून मागील निवडणुकीच्या तुलनेत ४.०९ टक्के मतदानात घट झाली आहे. यावेळी एकूण मतदारांपैकी ९७ हजार ७०० पुरुष तर ७९ हजार ५०० महिलांनी अशा एकूण १ लाख ७७ हजार २२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

एकूणच मागील निवडणुकीपेक्षा कमी झालेल्या टक्केवारीची अनेक कारणे आता पुढे आली आहेत. एकतर हा मतदारसंघ सुशिक्षित, संस्कृत मतदारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. असे असतानाही या मतदारसंघात कमी मतदान झाले. याचाच अर्थ या ठिकाणी विद्यमान आमदार मतदारांच्या पंसतीस न उतरल्याने किंवा त्याच्याकडून कामे झाली नसल्याने किंवा या मतदारसंघातील वाहतूककोंडी, जुन्या इमारतींचा प्रश्न, अरुंद रस्ते, रस्त्यावरील खड्डे आदींच्या समस्या सुटलेल्या नसाव्यात म्हणूनच कदाचित मतदार राजा कमी प्रमाणात उतरल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु, दुसरीकडे सक्षम पर्याय म्हणूनही अविनाश जाधव यांना कदाचित पसंती नसल्याचे कारण पुढे आले असून विद्यमान आणि पर्याय हे दोघेही अयोग्य वाटत असल्याने कदाचित मतदानाची टक्केवारी घटली असावी असाही आता कयास लावला जात आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीने मनसेला टाळी दिली असली तरी राष्ट्रवादीला मानणारा मतदार मतदानासाठी कमी संख्येने उतरला असावा अशी चर्चा आहे. तर काँग्रेस एक वेळेस राष्ट्रवादीला मतदान करू शकते. मात्र ऐन वेळेस श्रेष्ठींनी मनसेला आतून टाळी दिली आणि अचानकपणे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना इंजिनाला मतदान करा, अशा सूचना दिल्या होत्या. परंतु, पंजाच या निवडणुकीत नसल्याने इंजिनाला मतदान कसे करायचे असा पेच अनेक सर्वसामान्य मतदारांना सतावला होता. त्यामुळेच याचाही फटका बसून टक्केवारी घसरली असावी, असेही आता बोलले जात आहे. एकूणच आता घटलेल्या टक्केवारीचा फायदा कोणाला होणार, केळकर विधानसभेचा सेंकड पार्ट लिहणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Avinash Jadhavअविनाश जाधवBJPभाजपाthane-acठाणे शहरMNSमनसेVotingमतदानMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019