शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

Maharashtra Election 2019 : शिवरायांना अभ्यासक्रमातून हद्दपार करणारे सरकार जातीयवादी- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 15:21 IST

शिवरायांचे चरित्र वाचले तर नवीन पिढी जातीयवाद उखडून फेकेल अन् या जातीयवादी सरकारला ते नको आहे.

ठाणे- शिवरायांचे चरित्र वाचले तर नवीन पिढी जातीयवाद उखडून फेकेल अन् या जातीयवादी सरकारला ते नको आहे. म्हणून या सरकारने शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रमच हद्दपार करण्याचा चंग बांधला आहे. मात्र, या जातीयवादी सरकारला आता महाराष्ट्रातील जनता हद्दपार करेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचे चरित्र हद्दपार करण्याचा डाव रचण्यात आला आहे. त्याचा आ. आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की,  एकीकडे शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करायचे; त्यांच्या नावावर मते मागायची आणि ज्या बालवयामध्ये शिवाजी महाराजांचे आचार-विचार मनावर बिंबवून या बालकांच्या मनावर शिवरायाचे संस्कार घडवायचे असतात. त्याच बालवयात शिकवल्या जाणार्‍या पुस्तकातूनच शिवराय हद्दपार करायचे. यामध्ये सरकारची ठरलेली नीती आहे. शिवाजी महाराज यांना खुपतात; शिवाजी महाराज यांना काट्याप्रमाणे आहेत, हे यांच्या मानसिकतेमध्ये आहे. म्हणून आंतराराष्ट्रीय उपक्रम, शैक्षणिक क्रम असे कायतरी शोधून काढले अन् चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजच गायब केले. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अणुरेणूत आहेत.आमच्या रक्तवाहिन्यांमध्ये आहेत. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी शिवाजी महाराज महाराष्ट्रातून हद्दपार तुम्ही करु शकत नाहीत. हद्दपार करण्याचा विचार पुस्तकाच्या माध्यमातून करणार्‍या या सरकारची पातळी आता महाराष्ट्राने ओळखली आहे. हे जातीयवादी सरकार आहे, शिवरायांच्या विरोधातील सरकार आहे. आणि म्हणून शिवराय यांना पुस्तकातही नकोत; कारण शिवरायांचे संस्कार झालेली पिढी जातीयवाद उखडून फेकेल, याची जाणीव असल्याने हे जातीयवादी सरकारने रचलेला कट महाराष्ट्रातील जनता उधळून लावेल.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019