शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: विरोधकांचा भर केवळ घोटाळे करण्यावरच- योगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 06:46 IST

Maharashtra Election 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीकडे विकासाची दूरदृष्टी नाही. त्यांच्या सत्तेत केवळ घोटाळे करण्यावरच भर राहिला.

कल्याण : काँग्रेस, राष्ट्रवादीकडे विकासाची दूरदृष्टी नाही. त्यांच्या सत्तेत केवळ घोटाळे करण्यावरच भर राहिला. त्यांनी दहशतवादाला थारा देत देशाची सुरक्षा धोक्यात आणल्याचा आरोप करताना, देशाला लुटणाऱ्यांना मतदान करू नका, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी केले.

भाजपचे कल्याण पूर्वेतील उमेदवार गणपत गायकवाड आणि उल्हासनगरचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारार्थ कल्याण पूर्वेत झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी भिवंडीचे खासदार कपिल पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, शिवाजी आव्हाड आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आदित्यनाथ म्हणाले की, काश्मीरला कलम ३७०चा विशेष दर्जा काँग्रेसने दिला होता. त्यास बाबासाहेब आंबेडकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा विरोध होता. मात्र, तरीही काँग्रेसने हे कलम कायम ठेवून दहशतवादाला खतपाणी घातले, परंतु सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलम रद्द करून दहशतवाद हद्दपार केला.

भारतात दहशतवादाला थारा नाही, असा संदेश मोदींनी याद्वारे जगाला दिला असल्याचे सांगून, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील प्रमुख आरोपी असलेल्या दाऊदच्या सहकाºयांशी असलेले संबंध पुढे आल्याचा आरोप त्यांनी केला.काँग्रेसच्या काळात रोज नवीन घोटाळे बाहेर येत होते. समाजहित आणि राष्ट्रहितापेक्षा त्यांच्या नेत्यांनी स्वहिताला महत्त्व दिले. टुजी आणि कॉमनवेल्थ घोटाळा ही त्याची प्रमुख उदाहरणे आहेत. महाराष्ट्रातील सत्ताकाळातही त्यांनी मोठे घोटाळे केले, परंतु देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात एकही घोटाळा झाला नसल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले. विकासाला प्राधान्य देणाºया महायुतीला पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेस