शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

Maharashtra Election 2019: विरोधकांचा भर केवळ घोटाळे करण्यावरच- योगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 06:46 IST

Maharashtra Election 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीकडे विकासाची दूरदृष्टी नाही. त्यांच्या सत्तेत केवळ घोटाळे करण्यावरच भर राहिला.

कल्याण : काँग्रेस, राष्ट्रवादीकडे विकासाची दूरदृष्टी नाही. त्यांच्या सत्तेत केवळ घोटाळे करण्यावरच भर राहिला. त्यांनी दहशतवादाला थारा देत देशाची सुरक्षा धोक्यात आणल्याचा आरोप करताना, देशाला लुटणाऱ्यांना मतदान करू नका, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी केले.

भाजपचे कल्याण पूर्वेतील उमेदवार गणपत गायकवाड आणि उल्हासनगरचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारार्थ कल्याण पूर्वेत झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी भिवंडीचे खासदार कपिल पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, शिवाजी आव्हाड आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आदित्यनाथ म्हणाले की, काश्मीरला कलम ३७०चा विशेष दर्जा काँग्रेसने दिला होता. त्यास बाबासाहेब आंबेडकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा विरोध होता. मात्र, तरीही काँग्रेसने हे कलम कायम ठेवून दहशतवादाला खतपाणी घातले, परंतु सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलम रद्द करून दहशतवाद हद्दपार केला.

भारतात दहशतवादाला थारा नाही, असा संदेश मोदींनी याद्वारे जगाला दिला असल्याचे सांगून, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील प्रमुख आरोपी असलेल्या दाऊदच्या सहकाºयांशी असलेले संबंध पुढे आल्याचा आरोप त्यांनी केला.काँग्रेसच्या काळात रोज नवीन घोटाळे बाहेर येत होते. समाजहित आणि राष्ट्रहितापेक्षा त्यांच्या नेत्यांनी स्वहिताला महत्त्व दिले. टुजी आणि कॉमनवेल्थ घोटाळा ही त्याची प्रमुख उदाहरणे आहेत. महाराष्ट्रातील सत्ताकाळातही त्यांनी मोठे घोटाळे केले, परंतु देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात एकही घोटाळा झाला नसल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले. विकासाला प्राधान्य देणाºया महायुतीला पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेस