शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

महाराष्ट्र निवडणूक 2019 : देशात 70 वर्षांत काहीही बदललेलं नाही- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 12:49 IST

महाराष्ट्र निवडणूक 2019 : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे.

ठाणेः राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या बालेकिल्ल्यात जे मतदान घसरलेलं आहे, ते बरंच बोलकं आहे. शरद पवारांनी जादू केली आणि तरुणाई मतदानासाठी बाहेर पडली आहे. महाराष्ट्रात बदल निश्चित आहे, असा विश्वासही जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला आहे.

मतदान केंद्राच्या बाहेर 500 मीटरच्या अंतरावर वायफाय येताच कामा नये. वायफाय बंद झाले पाहिजेत नाही, तर आम्ही स्वतः जॅमर नेऊन लावू. मतदान केंद्रावरती कुठेही सिग्नल जाता कामा नये. मतमोजणी लगेचच करायला हवी होती, त्याला हे दोन दिवस लावत आहेत. दोन दिवसांत वायफायच्या माध्यमातून छेडछाड करण्याचा प्रयत्न असू शकतो. वायफाय ब्लॉक करावेत अशा सगळ्या उमेदवारांची मागणी आहे. 24 तारखेपर्यंत थांबा, सगळंच कळेल, असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे.मतदार याद्यांकडे इलेक्शन कमिशन कधीच गांभीर्यानं पाहत नाही. डिजिटल इंडियाच्या युगातही मतदारांना मतदार यादीत नाव नसल्याचं पाहायला मिळतंय, हे दुर्दैवी आहे. 1947साली देशाला स्वातंत्र्य मिळालं. पहिल्या निवडणुकीत यादी तपासण्याची जी पद्धत होती, तशीच पद्धत 70 वर्षं झाली तरी कायम आहे. 70 वर्षांत काहीही बदललेलं नाही. मतदार याद्यासंदर्भात निवडणूक आयोगानं गांभीर्य दाखवावं. मतदार कार्ड आधार कार्डला लिंक करावं, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019mumbra-kalwa-acमुंब्रा कळवा