शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

महाराष्ट्र निवडणूक 2019 : देशात 70 वर्षांत काहीही बदललेलं नाही- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 12:49 IST

महाराष्ट्र निवडणूक 2019 : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे.

ठाणेः राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या बालेकिल्ल्यात जे मतदान घसरलेलं आहे, ते बरंच बोलकं आहे. शरद पवारांनी जादू केली आणि तरुणाई मतदानासाठी बाहेर पडली आहे. महाराष्ट्रात बदल निश्चित आहे, असा विश्वासही जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला आहे.

मतदान केंद्राच्या बाहेर 500 मीटरच्या अंतरावर वायफाय येताच कामा नये. वायफाय बंद झाले पाहिजेत नाही, तर आम्ही स्वतः जॅमर नेऊन लावू. मतदान केंद्रावरती कुठेही सिग्नल जाता कामा नये. मतमोजणी लगेचच करायला हवी होती, त्याला हे दोन दिवस लावत आहेत. दोन दिवसांत वायफायच्या माध्यमातून छेडछाड करण्याचा प्रयत्न असू शकतो. वायफाय ब्लॉक करावेत अशा सगळ्या उमेदवारांची मागणी आहे. 24 तारखेपर्यंत थांबा, सगळंच कळेल, असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे.मतदार याद्यांकडे इलेक्शन कमिशन कधीच गांभीर्यानं पाहत नाही. डिजिटल इंडियाच्या युगातही मतदारांना मतदार यादीत नाव नसल्याचं पाहायला मिळतंय, हे दुर्दैवी आहे. 1947साली देशाला स्वातंत्र्य मिळालं. पहिल्या निवडणुकीत यादी तपासण्याची जी पद्धत होती, तशीच पद्धत 70 वर्षं झाली तरी कायम आहे. 70 वर्षांत काहीही बदललेलं नाही. मतदार याद्यासंदर्भात निवडणूक आयोगानं गांभीर्य दाखवावं. मतदार कार्ड आधार कार्डला लिंक करावं, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019mumbra-kalwa-acमुंब्रा कळवा