शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

कल्याण ग्रामीणमध्ये अटीतटीची लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 05:16 IST

Maharashtra Election 2019: बदल की पुनरावृत्ती याकडे लक्ष; वाहतूककोंडी, पाणीप्रश्न समस्या

- मुरलीधर भवार कल्याण : ग्रामीण मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्याची सांगता होण्यास अवघे काही तासच उरले आहेत. या मतदारसंघातील २७ गावे, वाहतूककोंडी, आरोग्याच्या समस्या आणि पाणीप्रश्न या मुद्द्याभोवती निवडणूक प्रचार दोन्ही उमेदवारांकडून करण्यात आला आहे. या मतदारसंघात शिवसेनेने उमेदवार बदलला आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध मनसेच्या लढाईत कोण विजयी होणार, याकडे लक्ष लागले आहे.

मतदारसंघात कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावे, नवी मुंबईतून वगळलेली १४ गावे, दिवा यांचा समावेश आहे. मतदारसंघातून केवळ दोनच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेनेतर्फे रमेश म्हात्रे व मनसेतर्फे राजू पाटील हे निवडणूक लढवत आहेत. या दोनच उमेदवारांमध्ये थेट लढत होत आहे. निवडणुकीत उमेदवारी जाहीर होताच मनसेचे उमेदवार पाटील यांनी भव्य असे निवडणुकीचे कार्यालय सुरू केले आहे. त्यांना शह देण्यासाठी शिवसेनेचे म्हात्रे यांनी त्याच धर्तीवर सागाव येथे प्रचाराचे कार्यालय सुरू केले. शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांनी पाच वर्षांत मतदारसंघात कामे केली.

मात्र, शिवसेनेच्या म्हात्रे गटाकडून भोईर यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला गेल्याने शिवसेनेने ऐनवेळी उमेदवारी बदलून ती म्हात्रे यांना दिली. शिवसेनेतील बंडाळी पक्षाने शमवल्याने बंडखोरी टळली. तसेच भोईर यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत म्हात्रे यांचे काम करण्याचे आश्वासन दिले. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाचा आदेश व शिस्त पाळा, असे बजावून शिवसेनेचे उमेदवार म्हात्रे यांच्यासाठी एकदिलाने काम करा, असे आवाहन केले. प्रचारात उमेदवारी अर्ज भरल्यानंतर म्हात्रे यांनी भेटीगाठींवर विशेष भर दिला. तसेच त्यांनी प्रचाराची जोरदार सुरुवात केली. मात्र, त्यांच्यासाठी कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एकही प्रचारसभा झाली नाही.

महायुतीतील घटकपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा परवाच एक मेळावा पार पडला. तसेच कच्छी गुजराथी समाजाने घेतलेल्या मेळाव्यात भाजपचे राज्यसभा सदस्य आले. याशिवाय, शिवसेनेचे स्टार प्रचारक आदेश बांदेकर यांनी प्रचार केला. प्रचाराची सगळी सूत्रे ही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाहिली. म्हात्रे हे २५ वर्षे नगरसेवक आहेत. चार वेळा स्थायी समिती सभापती होते. त्यांचा २००९ च्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून पराभव झाला होता. तेव्हाच्या चुका त्यांनी आता सुधारल्या आहेत.

दुसरीकडे मनसेचे उमेदवार पाटील यांनी ग्रामीण भाग पिंजून काढला. प्रत्येक गावात जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच कार्यकर्ता मेळावा आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकांवर जास्त जोर दिला. पाटील हे २००९ मध्ये जि.प.वर बिनविरोध निवडून आले होते.२०१४ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजनही त्यांनी चांगल्या प्रकारे केले आहे. त्यांच्या प्रचारार्थ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डीएनसी ग्राउंडवर प्रचारसभा घेतली. त्यात रस्ते, वाहतूककोंडी या मुद्द्यांवर प्रहार केला.

तसेच रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण या प्रमुख सोयीसुविधा देऊ शकत नाहीत. त्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार नाही, याकडे लक्ष वेधले. त्यामुळे मतदारसंघातील समस्यांवर मनसे निवडणूक लढवत आहे. तर, म्हात्रे हे मतदारसंघात भोईर यांच्या माध्यमातून केलेली विकासकामे आणि मतदारसंघातील प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आश्वासन देण्याच्या जोरावर निवडणूक रिंगणात आहे. त्यांच्या पाठीशी सत्तेतील शिवसेना-भाजप हे पक्ष आहेत. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यावर २००९ मध्ये कल्याण ग्रामीण मतदारसंघात प्रथम निवडणूक पार पडली. त्यावेळी पाटील यांचे बंधू रमेश पाटील हे मनसेतर्फे निवडून आले होते. पाच वर्षे हा मतदारसंघ मनसेच्या ताब्यात होता. त्यानंतर, २०१४ मध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचे सुभाष भोईर निवडून आले. या मतदारसंघात मतदारांनी बदल घडवला आहे. बदलाची पुनरावृत्ती होणार की, शिवसेना विजयाची परंपरा कायम राखणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

२७ गावांचा विकास, नगरपालिकेचे आश्वासन

म्हात्रे यांच्या जाहीरनाम्यात २७ गावे विकसित करण्याचा मुद्दा समाविष्ट आहे. तर, पाटील यांच्या जाहीरनाम्यात २७ गावांची वेगळी नगरपालिका हा मुद्दा आहे. तसेच दोघांनीही दिवा डम्पिंग ग्राउंड हटवण्याचे सामायिक आश्वासन दिले आहे. मतदार कोणाला झुकते माप देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :MNSमनसेShiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kalyan-rural-acकल्याण ग्रामीण