शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

Maharashtra Election 2019 : युतीत ठिणगी तर राष्ट्रवादीला ‘मनसे’ टाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 06:33 IST

शिवसेना-भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहर मतदारसंघासह कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, मुंब्रा-कळवा आणि मुरबाड मतदारसंघात राष्ट्रवादी आणि मनसेने एकमेकांना टाळी दिल्याची चर्चा आहे.

- नारायण जाधवठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ मतदारसंघांतील लढतींचे चित्र माघारीनंतर सोमवारी स्पष्ट झाले असून यात चार मतदारसंघांत युतीत ठिणगी पडली आहे. तर, पाच मतदारसंघांत मनसे आणि राष्ट्रवादीने एकमेकांना टाळी दिली असून अंबरनाथमध्ये काँगे्रस अन् राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी झाली आहे.शिवसेना-भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहर मतदारसंघासह कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, मुंब्रा-कळवा आणि मुरबाड मतदारसंघात राष्ट्रवादी आणि मनसेने एकमेकांना टाळी दिल्याची चर्चा आहे.तर, युतीच्या स्थानिक नेत्यांनी मातोश्रीवरून आलेला उद्धव ठाकरेंचा आदेश आणि ‘वर्षा’वरून आलेला देवेंद्र फडणवीस यांचा संदेश अव्हेरून चार मतदारसंघांत बंडाचे निशाण फडकावून एकमेकांविरुद्ध बिगुल वाजवला आहे.ऐरोलीच्या बदल्यात कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला. या मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांना तिकीट नाकारले. यामुळे नाराज पवार यांनी बंड करून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ भोईर यांना आव्हान दिले आहे. ‘वर्षा’वरून आलेला संदेशही त्यांनी अव्हेरला की, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा पवार यांच्या बंडाला छुपा पाठिंबा आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी दाखल करणारे विश्वनाथ भोईर यांच्या उमेदवारीला ठाण्यातील शिवसेना नेत्यांचा फारसा पाठिंबा नसल्याची चर्चा आहे. कल्याण पश्चिममधून प्रकाश पाटील यांना उमेदवारी मिळावी, याकरिता प्रयत्न सुरू होते. मात्र, स्थानिक शिवसैनिकांनी एकमत करून भोईर यांचे नाव उमेदवारीकरिता थेट मातोश्रीकडे दिले. त्यामुळे नाराज सेना नेतृत्वाची तर पवार यांच्या बंडाला फूस नाही ना, अशी शंका भाजपच्या वर्तुळातून व्यक्त होत आहे. पवार यांच्या उमेदवारीचा बदला म्हणून भाजपचे कल्याण पूर्वेतील उमेदवार गणपत गायकवाड यांच्याविरोधात उल्हासनगरचे शिवसेना नेते धनंजय बोडारे यांनी बंडाचा झेंडा फडकाविला आहे. बोडारे यांचे बंड शमवण्याकरिता शिवसेनेतून फारसे प्रयत्न झाले नाहीत, असे बोलले जाते. त्यामुळे पवार हे आपला अर्ज मागे घेण्याकरिता गेले असताना बोडारे यांचे बंड कायम असल्याची खबर मिळाल्याने त्यांनी अर्ज मागे न घेताच माघार घेतली. नवी मुंबईच्या बेलापूरमध्येही भाजपच्या मंदा म्हात्रेंविरोधात शिवसेनेचे विजय माने यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरून स्थानिक श्रेष्ठींच्या आदेशानुसार बंड कायम ठेवल्याची चर्चा आहे.गीता जैन यांना श्रेष्ठींचे बळमीरा-भार्इंदरमध्ये भाजपचे दबंग आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षाच्या माजी महापौर गीता जैन यांनी शक्तिप्रदर्शन करून अर्ज भरल्यानंतरही श्रेष्ठींकडून त्यांना माघारीचा कोणताही संदेश न आल्याने त्यांनी आपली बंडखोरी कायम ठेवून मेहतांची डोकेदुखी वाढवली आहे. त्यामुळे गीता जैन यांचा भाजपमधील बोलविता धनी कोण, अशी चर्चा सुरू झाली आहे.अशी आहे मनसे खेळीयुतीचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुहास देसाई यांनी माघार घेऊन मनसेच्या अविनाश जाधव यांना टाळी दिल्याची चर्चा आहे. त्यातच मनसेने मुंब्रा-कळव्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्यासह मुरबाडमधील प्रमोद हिंदुराव आणि कल्याण पूर्वेत प्रकाश तरे यांच्याविरोधात उमेदवारच उभे केलेले नाहीत. अशाच प्रकारे राष्ट्रवादीनेही कल्याण ग्रामीणमध्ये राजू ऊर्फ प्रमोद पाटील यांच्याविरोधात उमेदवार दिलेला नाही. येथे राजू पाटील यांच्यामागे लोकसभेला केलेल्या सहकार्यामुळे ठाण्यातील नेत्यांचे पुत्रप्रेमही कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत असून त्यामुळेच सुभाष भोईर यांच्यावर एबी फार्म भरूनही माघार घेण्याची पाळी आल्याची शिवसैनिकांत चर्चा आहे.राष्ट्रवादी आणि मनसेने एकमेकांना दिलेल्या या टाळीमागे पक्षाचे नेते अजित पवार आणि राज ठाकरे यांच्यातील समझोता असल्याचे ऐकायला मिळत आहे.मात्र, अंबरनाथमध्ये काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी झाली असून काँग्रेसचे रोहित साळवे यांच्याविरोधात प्रमोद हिंदुराव यांचे समर्थक असलेल्या प्रवीण खरात यांनी बंड पुकारले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kalyan-east-acकल्याण पूर्वkalyan-rural-acकल्याण ग्रामीणkalyan-west-acकल्याण पश्चिमkalyanकल्याणmumbra-kalwa-acमुंब्रा कळवाmurbad-acमुरबाड