शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

रखडलेली १७५ कोटींची देणी मिळवण्यासाठी मफतलालच्या कामगारांचा आता एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 7:14 PM

मफतलाल कंपनी बंद पडल्यानंतर यातील कामगार राज्यभरासह गुजरात, युपी, बिहार आदी राज्यात विखुला आहे. शेकडो कामगार देशोधडीला लागलेले आहेत. कष्ठाची व हक्काची रक्कम मिळण्याची आधा धरून असलेल्यां काहींचा मृत्यूही झाला आहे. मात्र अजूनही कंपनी व्यवस्थापनाने कामगारांची देणी दिलेली नाही.

ठळक मुद्देकळवा येथील मफतलाल कंपनी बंद होऊन ३० वर्षे लोटलीयातील कामगार राज्यभरासह गुजरात, युपी, बिहार आदी राज्यात विखुलासाडे तीन हजार कामगारांना अंदाजे १७५ कोटींची देणीअपेक्षित

सुरेश लोखंडेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कळवा येथील मफतलाल कंपनी मागील ३० वर्षापासून बंद पडली आहेत. यातील साडे तीन हजार कामगारांची सुमारे १७५ कोटींची देणी अद्यापही त्यांना मिळालेली नाही.आशा बाळगून असलेल्या एक हजार ५०० कामगारांचा मृत्यू झाला आहे. देशोधडीला लागलेला हा कामगार आता एल्गार लढा पुकारून आंदोलन तीव्र करण्याच्या प्रयत्नात आहे. याची रणनिती २६ मे रोजीच्या कामगार मेळाव्यात ऐरोली येथे आखली जाणार आहे.मफतलाल कंपनी बंद पडल्यानंतर यातील कामगार राज्यभरासह गुजरात, युपी, बिहार आदी राज्यात विखुला आहे. शेकडो कामगार देशोधडीला लागलेले आहेत. कष्ठाची व हक्काची रक्कम मिळण्याची आधा धरून असलेल्यां काहींचा मृत्यूही झाला आहे. मात्र अजूनही कंपनी व्यवस्थापनाने कामगारांची देणी दिलेली नाही. साडे तीन हजार कामगारांना अंदाजे १७५ कोटींची देणीअपेक्षित आहे. या रक्कमेसाठी कळवा येथे असलेली कंपनीची शेकडो एकर जमीन विकण्याचा घाट घातला आहे. तीन वेळा लिलाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र जमिनीचे एकरी सरकारी मूल्य ५ कोटी असताना ते ५० कोटी सांगितले जात आहे. यामुळे या जमिनीचा लिलाव तिन्ही वेळा होऊ शकला नाही. हेतुपुरस्सर जास्त रक्कम सांगितल्या जात असल्यामुळे विकासक ही जमीन घेण्यास धजावत नसल्याची खंत मफतलाल कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश पारख यांनी लोकमतला सांगितले.कामगारांना त्यांची हक्काची देणी मिळवून देण्यासाठी आता एल्गार लढा पुकारून आंदोलन तीव्र करण्यासाठी रविवारी होणाऱ्या कामगार मिळाव्यात आंदोलनाची दिशा व रणनिती सर्वांच्या साक्षिने ठरवण्यात येत असल्याचे पारख यांनी सांगितले. या मेळाव्यासाठी कामगार नेते सुरेश म्हात्रे, कृष्णा भगत यांचेही नेतृत्व लाभले असल्याचे त्यांनी निदर्शनात आणून दिले. कंपनी बंद पडल्यापासून कामगार विखुरलेला आहे. पण आता त्यांना एकित्रत करून तीव्र लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा एक भाग म्हणून येत्या रविवार ऐरोली येथे कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.कळवा येथील मफतलाल कंपनी बंद होऊन ३० वर्षे लोटली आहेत. तरी देखील या हक्काच्या देणीपासून या कंपनीतील सुमारे तीन हजार कामगार आजपर्यंत वंचित आहेत. हक्काची रक्कम आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर असतानाचा काहींचा मृत्यूही झाला आहे. या मफतलाल कंपनीच्या शेकडो एकर भूखंडावर अनेकांचा डोळा असल्याने कंपनीच्या कामगारांमध्ये वारंवार फूट पाडून त्यांना एकत्र येऊ दिले जात नाही. पण आता हा लढ तीव्र करून कामगारांची देणी मिळेपर्यंत लढण्यात येणार आहे. नऊ वर्षानंतर प्रथमच हा कामगारांचा मेळावा घेऊन लढ्याची दिशा निश्चित करणार असल्याचे पारख यांनी सांगितले. या मेळाव्यास ५०० पेक्षा अधिक कामगारांची उपस्थिती असणार असल्याचे पारख यांनी सांगितले. हा मेळावा २६ मे रोजी सकाळी ११ वाजता ऐरोली येथील कुर्ग असोसिएशन हॉल, सेक्टर ३, येथील ऐरोली बस डेपोजवळ पार पडणार आहे.

 

टॅग्स :thaneठाणेkalwaकळवा