शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

‘लोकमत’चा दणका; अखेर ‘त्या’ तीन विद्यार्थ्यांना शाळेचा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 01:55 IST

निम्मी फी स्वीकारून दिले दाखले; दहावीची परीक्षा देणे शक्य

अंबरनाथ : अंबरनाथ गुरुकुल ग्रॅन्ड युनियन शाळेत फी भरण्याच्या वादात शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये समेट होत नसल्याने तीन विद्यार्थ्यांना १०वीच्या परीक्षेला मुकण्याची वेळ आली होती. या संदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त येताच काँग्रेस आणि मनसेच्या शिष्टमंडळाने शाळा प्रशासनासोबत चर्चा करुन त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली होती. दोन तास चाललेल्या चर्चेनंतर विद्यार्थ्यांना त्यांचे शाळेचे दाखले देण्यावर सहमती झाली. पालकांनी निम्मी फी भरल्यावर दाखले देण्याबाबत शाळेनी सकारात्कमता दाखवल्याने तीन विद्यार्थ्यांचे १०वीचे वर्ष वाचवण्यात यश आले आहे.

अंबरनाथ गुरुकुल ग्रॅन्ड युनियन शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून पालक आणि शाळा प्रशासन यांच्यात वाद सुरु होते. पालकांनी आरटीई अंतर्गत अर्ज भरल्याने त्यांना फी माफी हवी होती तर आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांचे अर्ज शासनाने फेटाळल्याने पालकांनी त्या विद्यार्थ्यांची शाळेची फी भरण्यासाठी नोटीस बजावली होती.

त्यामुळे शाळा आणि पालक यांच्यात वाद सुरु होता. या वादावर तोडगा निघत नसल्याने तीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याच्या मार्गावर होते. दहावीसाठी बाहेरुन अर्ज (१७ नंबर फॉर्म) भरण्याची मंगळवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सायंकाळी चारच्या आत शाळा सोडल्याचा दाखला मिळणे गरजेचे होते.

शाळा प्रशासन फी भरण्याच्या मुद्यावर ठाम असल्याने त्यावर तोडगा निघत नव्हता. अखेर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील, नगरसेवक उमेश पाटील, मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर, मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष धनंजय गुरव, सामाजिक कार्यकर्ते आनिल कांबळे, महेश चिकणे, तुषार गांगुर्डे यांच्या पुढाकाराने मार्ग काढण्यात आला. शाळा प्रशासनासोबत चर्चा केल्यावर शाळेने पालकांना निम्मी फी भरुन शाळेचे दाखले देण्यावर सहमती दर्शवली. यावर पालकांनीही सकारात्मक भूमिका घेत शक्य तेवढी फी भरुन शाळा सोडल्याचा दाखला मिळवण्यासाठी अर्ज केले. अ

खेर दुपारी तीन वाजता या तिन्ही विद्यार्थ्यांचे दाखले त्यांच्या पालकांच्या हातात मिळाले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असल्याने त्यांनी आता बाहेरुन दहावीची परीक्षा देण्यासाठी बोर्डाकडे अर्ज केला.शाळा प्रशासनाला सुरुवातीपासुनच आम्ही तडजोडीच्या मार्गाने प्रकरण सोडवण्याची विनंती केली होती. शाळेने वेळेवर निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचवण्यात यश आले आहे. इतर पालकांच्या ज्या समस्या आहेत त्या तडजोडीच्या मार्गाने सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल.- प्रदीप पाटील, अध्यक्ष, ब्लॉक काँग्रेस

पालक आणि शाळा यांच्यात अनेक वर्षांपासून हा वाद आहे. तो वाद या तीन विद्यार्थ्यांच्या निमित्ताने सोडवण्यात यश आले आहे. आता इतर ज्या ११ ते १२ विद्यार्थ्यांच्या समस्या राहिल्या आहेत त्यावरही यशस्वी तोडगा काढण्याचा प्रयत्न राहील. शाळा प्रशासन आणि पालकांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने हे शक्य झाले आहे.- कुणाल भोईर, शहराध्यक्ष, अंबरनाथ मनसे

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी