शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

‘लोकमत’चा दणका; अखेर ‘त्या’ तीन विद्यार्थ्यांना शाळेचा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 01:55 IST

निम्मी फी स्वीकारून दिले दाखले; दहावीची परीक्षा देणे शक्य

अंबरनाथ : अंबरनाथ गुरुकुल ग्रॅन्ड युनियन शाळेत फी भरण्याच्या वादात शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये समेट होत नसल्याने तीन विद्यार्थ्यांना १०वीच्या परीक्षेला मुकण्याची वेळ आली होती. या संदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त येताच काँग्रेस आणि मनसेच्या शिष्टमंडळाने शाळा प्रशासनासोबत चर्चा करुन त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली होती. दोन तास चाललेल्या चर्चेनंतर विद्यार्थ्यांना त्यांचे शाळेचे दाखले देण्यावर सहमती झाली. पालकांनी निम्मी फी भरल्यावर दाखले देण्याबाबत शाळेनी सकारात्कमता दाखवल्याने तीन विद्यार्थ्यांचे १०वीचे वर्ष वाचवण्यात यश आले आहे.

अंबरनाथ गुरुकुल ग्रॅन्ड युनियन शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून पालक आणि शाळा प्रशासन यांच्यात वाद सुरु होते. पालकांनी आरटीई अंतर्गत अर्ज भरल्याने त्यांना फी माफी हवी होती तर आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांचे अर्ज शासनाने फेटाळल्याने पालकांनी त्या विद्यार्थ्यांची शाळेची फी भरण्यासाठी नोटीस बजावली होती.

त्यामुळे शाळा आणि पालक यांच्यात वाद सुरु होता. या वादावर तोडगा निघत नसल्याने तीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याच्या मार्गावर होते. दहावीसाठी बाहेरुन अर्ज (१७ नंबर फॉर्म) भरण्याची मंगळवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सायंकाळी चारच्या आत शाळा सोडल्याचा दाखला मिळणे गरजेचे होते.

शाळा प्रशासन फी भरण्याच्या मुद्यावर ठाम असल्याने त्यावर तोडगा निघत नव्हता. अखेर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील, नगरसेवक उमेश पाटील, मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर, मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष धनंजय गुरव, सामाजिक कार्यकर्ते आनिल कांबळे, महेश चिकणे, तुषार गांगुर्डे यांच्या पुढाकाराने मार्ग काढण्यात आला. शाळा प्रशासनासोबत चर्चा केल्यावर शाळेने पालकांना निम्मी फी भरुन शाळेचे दाखले देण्यावर सहमती दर्शवली. यावर पालकांनीही सकारात्मक भूमिका घेत शक्य तेवढी फी भरुन शाळा सोडल्याचा दाखला मिळवण्यासाठी अर्ज केले. अ

खेर दुपारी तीन वाजता या तिन्ही विद्यार्थ्यांचे दाखले त्यांच्या पालकांच्या हातात मिळाले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असल्याने त्यांनी आता बाहेरुन दहावीची परीक्षा देण्यासाठी बोर्डाकडे अर्ज केला.शाळा प्रशासनाला सुरुवातीपासुनच आम्ही तडजोडीच्या मार्गाने प्रकरण सोडवण्याची विनंती केली होती. शाळेने वेळेवर निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचवण्यात यश आले आहे. इतर पालकांच्या ज्या समस्या आहेत त्या तडजोडीच्या मार्गाने सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल.- प्रदीप पाटील, अध्यक्ष, ब्लॉक काँग्रेस

पालक आणि शाळा यांच्यात अनेक वर्षांपासून हा वाद आहे. तो वाद या तीन विद्यार्थ्यांच्या निमित्ताने सोडवण्यात यश आले आहे. आता इतर ज्या ११ ते १२ विद्यार्थ्यांच्या समस्या राहिल्या आहेत त्यावरही यशस्वी तोडगा काढण्याचा प्रयत्न राहील. शाळा प्रशासन आणि पालकांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने हे शक्य झाले आहे.- कुणाल भोईर, शहराध्यक्ष, अंबरनाथ मनसे

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी