शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

लोकसभेत गणेश नाईक राष्ट्रवादीचे ‘ठाणे’दार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 2:41 AM

ठाणे शहर राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहाला अखेर बुधवारी झालेल्या एका गुप्त बैठकीत तिलांजली देण्याच्या आणाभाका सर्व गटांनी घेतल्या. त्यानुसार, ठाणे लोकसभा निवडणुकीत ठाण्याचा राष्ट्रवादीचाच खासदार असेल, असा विश्वास सर्वच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

ठाणे : ठाणे शहर राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहाला अखेर बुधवारी झालेल्या एका गुप्त बैठकीत तिलांजली देण्याच्या आणाभाका सर्व गटांनी घेतल्या. त्यानुसार, ठाणे लोकसभा निवडणुकीत ठाण्याचा राष्ट्रवादीचाच खासदार असेल, असा विश्वास सर्वच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पक्षाचा खासदार झाल्यास त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीसह २०२२ मध्ये होणाºया ठाणे महापालिका निवडणुकीत होईल, असा कयासही लावण्यात आला. त्यानुसार, माजी मंत्री गणेश नाईक हे लोकसभेच्या रिंगणात उतरण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवारी ठाण्यातील एका हॉटेलमध्ये ही बैठक पार पडल्याची माहिती आहे. तिला माजी मंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, शहराध्यक्ष आनंद परांजपे, ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला हे उपस्थित होते. या बैठकीत आव्हाडांविरोधात कारस्थान करू पाहणाºयांनी एकदिलाने काम करण्याची हमी दिली. मागील वेळी राष्टÑवादीच्या उमेदवाराचा का पराभव झाला, त्याची कारणे काय होती, आता कशा पद्धतीने काम करणे अपेक्षित आहे, यावर भर देण्यात आला. त्यानुसार, येत्या काळात बैठकीला उपस्थित असणाºया प्रत्येकावर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. उमेदवार कोणीही असो, आम्ही एकदिलाने, जोमाने काम करू आणि मागील निवडणुकीपेक्षा जास्त मते; किंबहुना राष्टÑवादीचा उमेदवार कसा निवडून येईल, यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास प्रत्येकाने दिला.काही महिन्यांपासून आमदार जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे असा अंतर्गत कलह निर्माण झाला होता. त्याचे परिणाम आगामी निवडणुकीत राष्टÑवादीला सहन करावे लागतील, असे चित्र होते. परंतु, या बैठकीत या सर्वांनीच एकतेचा नारा देऊन एकत्रितपणे काम करण्याची हमी दिली.कल्याणामधून जितेंद्र आव्हाडकाही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या बैठकीत पक्षश्रेष्ठी शरद पवार यांनी गणेश नाईक यांनी ठाणे लोकसभा आणि जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण लोकसभा लढवावी, असे संकेत दिले होते. त्यानुसार, बुधवारी झालेल्या चर्चेत गणेश नाईक यांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्याची माहिती राष्टÑवादीच्या सूत्रांनी दिली. जितेंद्र आव्हाड यांना कल्याणमधून लढण्याची गळ घालण्यात आली असली, तरी त्याबाबत आजही संभ्रम कायम आहे.

टॅग्स :thaneठाणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९