शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

लोकसभा निवडणूक: सर्वच राजकीय पक्ष अखेर ‘जाती’वर उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 02:32 IST

आगरी फॅक्टरबाबत दावे-प्रतिदावे; ठाणे, कल्याणमध्ये पत्रकार परिषदांचे आयोजन

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघांतील सर्वच उमेदवारांनी प्रारंभी विकासाची भाषा केली असली, तरी आता सर्वच राजकीय पक्ष ‘जाती’वर गेले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने आगरी फॅक्टर चर्चेत आणल्यामुळे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्यासह काही आगरी समाजातील नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन १९७७ पासून आगरी समाजाने युतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याचा दावा केला, तर ठाण्यात आगरीसेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांनीही पत्रकार परिषद घेऊन शिवसेना-भाजप महायुतीला पाठिंबा जाहीर केला.शिवसेना आमदार सुभाष भोईर, माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, कल्याण तालुकाप्रमुख एकनाथ पाटील, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, ठाणे महापालिकेचे उपमहापौर रमाकांत मढवी, कल्याण शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे आदींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील हे आगरी उमेदवार असून आगरी समाजाची ताकद दाखवून देण्याची शेवटची वेळ आहे, असे आवाहन त्यांनी केले आहे. मात्र, आगरी समाज कोणत्याही एका पक्षाच्या मागे नाही. १९७७ पासून दोनवेळा रामभाऊ म्हाळगी, त्यानंतर जगन्नाथ पाटील, दोनवेळा राम कापसे, चारवेळा प्रकाश परांजपे, दोनवेळा आनंद परांजपे आणि एकवेळा श्रीकांत शिंदे हे खासदार म्हणून निवडून आलेले आहे. केवळ शांताराम घोलप यांचा कार्यकाळ वगळता आगरी समाज युतीच्या बाजूने राहिला आहे, असे पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी २७ गावे वगळण्याचा शब्द पाळला नाही, म्हणून संघर्ष समिती बाबाजी पाटील यांच्या बाजूने उभी ठाकली आहे, याकडे जगन्नाथ पाटील यांचे लक्ष वेधले असता, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द नक्कीच पाळतील. हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने त्यांच्याकडून निर्णय घेण्यात आलेला नाही, असे ते म्हणाले. नेवाळी आंदोलनानंतरही शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न सुटला नाही, असे विचारले असता हा प्रश्न नक्कीच सोडवला जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, आगरी समाजाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे.भाजप-शिवसेना महायुतीला पाठिंबा देत असल्याचे आगरीसेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत जाहीर केले. युवा आगरीसेनेचे प्रमुख राहुल साळवी, आगरीसेनेचे उपाध्यक्ष कैलास पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे