शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

लॉकडाऊनमुळे व्यापारी व कामगारांची होणार उपासमार, उल्हासनगरात व्यापाऱ्यात असंतोष 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 3:03 PM

महापालिका कर्मचारी व पोलिसांनी सोमवारी रात्री ८ नंतर अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद राहणार असल्याची घोषणा केल्यानंतर व्यापारी व पोलीस आमने-सामने आले होते.

- सदानंद नाईक उल्हासनगर - आठवड्यातील ५ दिवस कडक निर्बंध तर शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन असे गाजर दाखवून, ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन केल्याचा आरोप व्यापारी संघटनेनी केला. सरकारने व्यापाऱ्यांची फसवणूक केली असून दुकाने बंदमुळे हजारो कामगाराचा रोजगार गेला असून भाजपानेही विरोध करीत निदर्शने केली.  (Lockdown will lead to starvation of traders and workers, dissatisfaction among traders in Ulhasnagar)

देशात औधोगिक शहर म्हणून उल्हासनगरचे नावलौकिक असून शहरात निर्माण होणाऱ्या जीन्स पॅन्टला देशात मागणी आहे. तर जपानी व गजानन मार्केट कपड्यासाठी प्रसिद्ध असून फर्निचर, बॅग, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल वस्तूला मोठी मागणी आहे. अश्या औधोगिक शहरातील दुकाने बंद राहिल्यास दुकानदारासह दुकाना मध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ राज्य शासनाने घेतलेल्या लॉकडाऊन निर्णयामुळे येणार असल्याचा आरोप युटीए व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती, कार्याध्यक्ष दीपक छतलानी, भाजप व्यापारी मंडळचे अध्यक्ष नरेश दुर्गानी, व्यापारी संघटनेचे परमानंद गिरेजा आदींनी केली. तसेच भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी, मनोज लासी, प्रकाश माखिजा आदींनी शासनाच्या निर्णयाचा विरोध केला आहे.

 महापालिका कर्मचारी व पोलिसांनी सोमवारी रात्री ८ नंतर अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद राहणार असल्याची घोषणा केल्यानंतर व्यापारी व पोलीस आमने-सामने आले होते. अखेर पोलीस प्रशासन व महापालिका अधिकाऱ्यांनी व्यापारी नेत्या सोबत चर्चा करून शासनाचा निर्णय अंतिम असल्याचे सांगून सहकार्य करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवड्यातील ५ दिवस कडक निर्बंध तर शनिवार-रविवारी असे दोन दिवस कडक लॉकडाऊन करणार, असे व्यापाऱ्यांनी गृहीत धरले होते. प्रत्यक्षात ३० एप्रिल पर्यंत कडक लोकडाऊन जारी केला असून व्यापारी व दुकानात काम करणाऱ्या हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ येणार असल्याची टीका व्यापारी संघटने कडून केली. आठवड्यातून ५ दिवस लॉकडाऊन काळात दुकानांना उघडण्यास मुभा देण्याची मागणी होत आहे. असे न झाल्यास शहरातील दुकानदार देशोधडीला लागण्याची शक्यता सुमित चक्रवर्ती यांनी व्यक्त केली आहे. 

व्यापारी संघटना मुख्यमंत्री यांना साकडेउल्हासनगर औघोगिक शहर असून लॉकडाऊन मुळे ही ओळख मिटण्याची शक्यता आहे. आठवड्यातून काही दिवस दुकाने सुरू ठेवण्याला मान्यता देण्यासाठी व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री यांची भेट घेऊन साकडे घालणार असल्याची प्रतिक्रिया व्यापारी संघटनेने दिलीं. दरम्यान भाजपचे आमदार कुमार आयलानी यांच्यासह शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांना भेटून शहरातील समस्या बाबत माहिती दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसulhasnagarउल्हासनगर