शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

लॉकडाऊनमुळे बदलले ठाण्याच्या खाडीचे रुपडे, पाणी झाले नितळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 00:03 IST

पक्ष्यांसह मासे, कीटकांच्या संख्येत झाली वाढ, कचरा टाकण्याचे प्रमाण झाले कमी

ठाणे : ठाण्याचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे खाडीने लॉकडाऊनच्या काळात अविघटनशील घटकांतून मोकळा श्वास घेतल्याचे निरीक्षण पर्यावरण अभ्यासकांनी नोंदविले. लॉकडाऊनच्या चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत माणसे बाहेर पडली नसल्याने खाडीत प्लास्टीकच्या पिशव्यांत टाकण्यात येणाºया निर्माल्यांचे प्रमाण, देवी-देवतांच्या प्रतिमा व इतर अविघटनशील पदार्थ खाडीत सोडण्याचे प्रमाण कमी झाले. खाडीत अविघटनशील पदार्थ खूप कमी प्रमाणात गेल्याने पक्ष्यांबरोबर मासे आणि कीटकांच्या संख्येतही वाढ झाल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.

खाडी संवर्धनाबाबत अनेक पर्यावरण अभ्यासकांकडून जनजागृती केली जाते. तरीही १०० टक्के खाडी ही प्रदूषणविरहित झालेली नाही. त्यात प्लास्टीकच्या निर्माल्यासह इतर अविघटनशील घटकदेखील सर्रास टाकले जातात. खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टीकसह निर्माल्य खाडीत टाकण्याचे प्रमाण आता कमी होत असले तरी लॉकडाऊनमध्ये याचा परिणाम अधिक जाणवला. लॉकडाऊनआधी निर्माल्य, प्लास्टीक आणि इतर कचरा टाकला जात होता. पिशवीतून निर्माल्य टाकले जात असल्याने प्लास्टीकचा भस्मासूर निर्माल्याबरोबर यायचा. परंतु, लॉकडाऊनमध्ये खाडीने बºयापैकी मोकळा श्वास घेतला. त्याचबरोबर नैसर्गिक सजीव या लॉकडाऊनच्या काळात वाढू लागले, असे निरीक्षण पर्यावरण दक्षता मंडळाचे ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रसाद कर्णिक यांनी नोंदविले. मासे आणि कीटकांचे प्रमाणही वाढायला लागले.

खाडीकिनारी कीटकांची संख्या वाढल्याने पक्ष्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली. मांसाहाराचे खरकटे आणि न शिजविलेले अन्न प्लास्टीकच्या पिशव्यांतून गटारीत सोडत असल्याने हा कचरा खाडीत येत होता. तेही कमी झाल्याचे ते म्हणाले.खाडीकाठी आणि प्रवाहात असलेले खारफुटीचे जंगल हे एकेकाळचे ठाणे शहराचे वैभव होते. आज ते रसातळास गेले आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उंचावलेले राहणीमान, औद्योगिकीकरण, प्लास्टीकचा वाढता वापर यांमुळे तयार होणाºया कचºयाचे प्रमाण व प्रकार वाढत जातात; आणि वेगवेगळ्या समस्या निर्माण होताना दिसतात.

गेल्या पाच महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मात्र या समस्या काही प्रमाणात कमी झालेल्या दिसत आहेत. पर्यावरणाबाबत जरी काही प्रमाणात जनजागृती निर्माण झाली असली तरी अजूनही कित्येक लोक निर्माल्य प्लास्टीकसकट खाडीमध्ये टाकत असल्याचे दिसून येते. परंतु, लॉकडाऊनमध्ये फुल मार्केट पूर्णपणे बंद असल्यामुळे पूजेमध्ये फुले वापरण्याचे प्रमाण बºयापैकी कमी झाले.

प्लास्टीकसह निर्माल्य खाडीमध्ये टाकले गेले नसल्यामुळे ठाणे खाडीमध्ये निर्माल्यामुळे होणारे प्रदूषण काही प्रमाणात कमी झालेले दिसून आले आहे. रोहित पक्षी व विविध पक्ष्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे, असे मत ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रमोद साळसकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणे