शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

लॉकडाऊनमुळे बदलले ठाण्याच्या खाडीचे रुपडे, पाणी झाले नितळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 00:03 IST

पक्ष्यांसह मासे, कीटकांच्या संख्येत झाली वाढ, कचरा टाकण्याचे प्रमाण झाले कमी

ठाणे : ठाण्याचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे खाडीने लॉकडाऊनच्या काळात अविघटनशील घटकांतून मोकळा श्वास घेतल्याचे निरीक्षण पर्यावरण अभ्यासकांनी नोंदविले. लॉकडाऊनच्या चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत माणसे बाहेर पडली नसल्याने खाडीत प्लास्टीकच्या पिशव्यांत टाकण्यात येणाºया निर्माल्यांचे प्रमाण, देवी-देवतांच्या प्रतिमा व इतर अविघटनशील पदार्थ खाडीत सोडण्याचे प्रमाण कमी झाले. खाडीत अविघटनशील पदार्थ खूप कमी प्रमाणात गेल्याने पक्ष्यांबरोबर मासे आणि कीटकांच्या संख्येतही वाढ झाल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.

खाडी संवर्धनाबाबत अनेक पर्यावरण अभ्यासकांकडून जनजागृती केली जाते. तरीही १०० टक्के खाडी ही प्रदूषणविरहित झालेली नाही. त्यात प्लास्टीकच्या निर्माल्यासह इतर अविघटनशील घटकदेखील सर्रास टाकले जातात. खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टीकसह निर्माल्य खाडीत टाकण्याचे प्रमाण आता कमी होत असले तरी लॉकडाऊनमध्ये याचा परिणाम अधिक जाणवला. लॉकडाऊनआधी निर्माल्य, प्लास्टीक आणि इतर कचरा टाकला जात होता. पिशवीतून निर्माल्य टाकले जात असल्याने प्लास्टीकचा भस्मासूर निर्माल्याबरोबर यायचा. परंतु, लॉकडाऊनमध्ये खाडीने बºयापैकी मोकळा श्वास घेतला. त्याचबरोबर नैसर्गिक सजीव या लॉकडाऊनच्या काळात वाढू लागले, असे निरीक्षण पर्यावरण दक्षता मंडळाचे ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रसाद कर्णिक यांनी नोंदविले. मासे आणि कीटकांचे प्रमाणही वाढायला लागले.

खाडीकिनारी कीटकांची संख्या वाढल्याने पक्ष्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली. मांसाहाराचे खरकटे आणि न शिजविलेले अन्न प्लास्टीकच्या पिशव्यांतून गटारीत सोडत असल्याने हा कचरा खाडीत येत होता. तेही कमी झाल्याचे ते म्हणाले.खाडीकाठी आणि प्रवाहात असलेले खारफुटीचे जंगल हे एकेकाळचे ठाणे शहराचे वैभव होते. आज ते रसातळास गेले आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उंचावलेले राहणीमान, औद्योगिकीकरण, प्लास्टीकचा वाढता वापर यांमुळे तयार होणाºया कचºयाचे प्रमाण व प्रकार वाढत जातात; आणि वेगवेगळ्या समस्या निर्माण होताना दिसतात.

गेल्या पाच महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मात्र या समस्या काही प्रमाणात कमी झालेल्या दिसत आहेत. पर्यावरणाबाबत जरी काही प्रमाणात जनजागृती निर्माण झाली असली तरी अजूनही कित्येक लोक निर्माल्य प्लास्टीकसकट खाडीमध्ये टाकत असल्याचे दिसून येते. परंतु, लॉकडाऊनमध्ये फुल मार्केट पूर्णपणे बंद असल्यामुळे पूजेमध्ये फुले वापरण्याचे प्रमाण बºयापैकी कमी झाले.

प्लास्टीकसह निर्माल्य खाडीमध्ये टाकले गेले नसल्यामुळे ठाणे खाडीमध्ये निर्माल्यामुळे होणारे प्रदूषण काही प्रमाणात कमी झालेले दिसून आले आहे. रोहित पक्षी व विविध पक्ष्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे, असे मत ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रमोद साळसकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणे