शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

23,554 शेतकऱ्यांच्या याद्या कर्जमाफीसाठी पोर्टलवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 06:47 IST

कर्जमाफीसाठी जिव्हाळ्याची ठरलेली ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ ख-या अर्थाने शनिवारपासून विनाविलंब सुरू झाली.

सुरेश लोखंडेठाणे : कर्जमाफीसाठी जिव्हाळ्याची ठरलेली ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ ख-या अर्थाने शनिवारपासून विनाविलंब सुरू झाली. या कर्जमाफीसाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील २८ हजार ३९५ पैकी शनिवारी २३ हजार ५५४ पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य शासनाने पोर्टलवर घोषित केली. त्यानुसार ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेच्या ६९ शाखांमध्ये कामास प्रारंभ झाला. अंगठा घेतल्यानंतर कर्जमाफीची १६८ कोटी ५९ लाख १४ हजारांची रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यात जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे, असे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले.पोर्टलवर ठाणे जिल्ह्यातील १५ हजार ८११ खातेदारांपैकी १२ हजार ७६६ (८१ टक्के) लाभार्थी शेतकरी घोषित झाले. जिल्ह्यातील सर्व शेतकरी ९४ कोटी ५७ लाख २९ हजारांच्या कर्जमाफीला पात्र आहेत. तर, पालघर जिल्ह्यातील १२ हजार ५६८ पैकी १० हजार ७९० (८६ टक्के) शेतकºयांच्या याद्या पोर्टलवर आहेत. हा जिल्हा ७४ कोटी एक लाख ८४ हजारांच्या कर्जमाफीला पात्र आहे. या दोन्ही जिल्ह्यातील उर्वरित चार हजार ८१३ शेतकºयांच्या याद्यांचीदेखील लवकरच घोषणा होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावनिहाय या कर्जमाफी शेतकºयांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत. त्या लवकरच ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, शेती विकास सोसायटी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखेत शेतकºयांच्या माहितीसाठी लावल्या जाणार आहेत. बायोमेट्रिक पद्धतीने या शेतकºयांचा अंगठा घेतल्यानंतर त्यास त्वरित चारअंकी कोडनंबर मिळेल. तो लोड केल्यानंतर कर्जमाफीची रक्कम त्वरित आॅनलाइन दिसेल. त्यावरील ‘एस’ आॅप्शन टच केल्यास रक्कम बँक खात्यात जमा होईल. ‘नो’ आॅप्शन क्लिक केल्यास शेतकºयास कर्जमाफी मान्य नसल्याचे उघड होईल आणि ती तक्रार थेट जिल्हा समन्वय समितीकडे (डीएलसी) नोंद होईल. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर या समितीचे अध्यक्ष तर सदस्य सचिव जिल्हा उपनिबंधक शहाजी पाटील आहेत. समिती तक्रारीची दखल त्याच दिवशी घेऊन ती निकाली काढत आहे.> शनिवारी १२ तक्रारींची नोंदशनिवारी दुपारपर्यंत १२ तक्रारींची नोंद झाली. यातील तीन तक्रारी निकाली काढल्या. उर्वरित सात तक्रारी डीएलसीकडे तर दोन तहसीलदारांच्या पातळीवर नोंद झाल्या आहेत. शिवाय, शेतकºयांच्या बोटाचे ठसे उमटत नसल्याची समस्यादेखील जिल्ह्यात आहे. या तक्रारी तहसीलदारांकडे तर कर्जमाफी मान्य नसल्यास डीएलसीकडे तक्रारींची नोंद होत आहे.