शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

विधानसभेचे पडसाद केडीएमसीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 01:31 IST

गटबाजी, दगाफटका टाळण्यासाठी करावी लागणार कसरत

कल्याण : विधानसभा निवडणुकीत मतदारसंघ आपल्याकडे राहावा, यासाठी कल्याण-डोंबिवलीत शिवसेना व भाजपमध्ये झालेली रस्सीखेच, अंतर्गत वादामुळे नाराजी तसेच बंडखोरीचे लागलेले ग्रहण यामुळे कल्याण ग्रामीणसारखा मतदारसंघ महायुतीला गमवावा लागला आहे. दुसरीकडे एकंदरीतच येथील चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांचा कौल पाहता याचे पडसाद पुढील वर्षात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत युती आणि आघाडी कायम राहते का, यावरही लढतीचे चित्र अवलंबून असणार आहे.

विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिम मतदारसंघात विश्वनाथ भोईर (शिवसेना), कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड (भाजप), कल्याण ग्रामीणमध्ये प्रमोद पाटील (मनसे) आणि डोंबिवलीत रवींद्र चव्हाण (भाजप) हे निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून युती असो अथवा आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळाली. या स्पर्धेतून शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत नाराजी कमालीची पाहायला मिळाली. मात्र, तेवढी काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये दिसली नाही. या संघर्षाचे परिणाम कल्याण पश्चिम, पूर्व आणि ग्रामीणमध्ये दिसून आले.

कल्याण पश्चिम या नव्याने पदरात पाडून घेतलेल्या मतदारसंघात शिवसेनेला भाजपच्या नरेंद्र पवार यांच्या बंडखोरीला सामोरे जावे लागले. तर, पूर्वमध्ये भाजपचे गणपत गायकवाड यांच्यापुढे बहुतांश शिवसेनेच्या नगरसेवकांनी बंडखोर म्हणून आव्हान उभे केले. बंडखोरांना थारा दिला जाणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगितले गेले. परंतु, कारवाई झाली नाही. त्यामुळे बंडखोरीला नेत्यांचीच फूस होती, हे स्पष्ट आहे.

पूर्वेत शिवसेनेचे बहुतांश नगरसेवक गायकवाड यांच्याविरोधात प्रचार करताना दिसले, तसे पश्चिमेतही भाजपचे काही नगरसेवक आणि पदाधिकारी बंडखोर अपक्ष उमेदवार पवार यांचा उघडपणे प्रचार करण्यासाठी उतरले होते. मात्र, हे दोन्ही मतदारसंघ अबाधित राखण्यात महायुतीला यश आले असून, शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांना चांगली मते मिळाली आहेत.

पूर्वमध्ये झालेली बंडखोरी पाहता कल्याण ग्रामीण भागातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेचा प्रचार केल्याची चर्चा आहे. शिवसेनेतील अंतर्गत नाराजीचा फटकाही ग्रामीणमधील शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे यांना बसल्याचे बोलले जाते. यात कल्याण ग्रामीण हा मतदारसंघ दुसºयांदा पटकाविण्यात मनसेला यश आले आहे. या मतदारसंघात मनसेची मते मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. तर, डोंबिवली मतदारसंघात पुन्हा भाजपचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी बाजी मारली असली तरी येथेही मनसेची मते वाढली आहेत, तर चव्हाण यांचे मागील मताधिक्य कमी झाले आहे.

एकूणच या निवडणुकीतील घडामोडींचे पडसाद आता केडीएमसीच्या निवडणुकीतही उमटतील, यात शंका नाही. २०१५ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ५३, भाजप ४३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, मनसे ९, बसपा १ आणि एमआयएम १ तसेच ९ अपक्ष निवडून आले होते. त्यावेळी शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात लढले होते.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत उद्भवलेले वाद आणि नाराजी पाहता हे चित्र महापालिकेच्या निवडणुकीतही कायम राहील आणि कल्याण-डोंबिवलीकरांना बिनपैशांचा तमाशा पुन्हा पाहायला मिळेल, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.

२७ गावे, नागरी समस्या मुद्दे गाजणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केडीएमसीची मागील निवडणूक कमालीची प्रतिष्ठेची केली होती. ‘सिंहाच्या जबड्यात घालूनी हात, मोजतो दात, जात ही आमची’ या गर्जनेसह कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी सहा हजार ५०० कोटींची घोषणा मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी केली होती.

परंतु, त्या कोट्यवधी रुपयांचा मुद्दा गेली पाच वर्षे चांगलाच गाजत आहे. पण, आराखडा काही पाहायला मिळाला नाही. २७ गावे महापालिकेतून वगळण्याचा मुद्दाही कागदावरच आहे. आता महापालिकेच्या पुढील निवडणुकीतही नागरी समस्यांसह हे मुद्दे चांगलेच गाजणार, यात शंका नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kdmcकल्याण डोंबिवली महापालिका