शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

कोपरी नाक्यावर मोठी कोंडी; वाहनांच्या लागल्या लांबलचक रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 00:31 IST

नाकाबंदीमुळे पेणकरपाडा, एमआयडीसी व काशिमीरा नाका येथून मुंबईकडे जाणारे रस्ते वाहतूककोंडीने जॅम झाले होते.

ठाणे : नियमांचे उल्लंघन करुन विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी सोमवारी कारवाईचा बडगा उगारला. कोपरी चेकनाक्यावर नवघर पोलिसांनी सकाळपासूनच सुरु केलेल्या कारवाईमुळे तब्बल दोन, अडिच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुचाकीवर डबलसिट प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कारमध्ये केवळ तीन लोकांनाच प्रवास करण्याची अनुमती आहे. मात्र अडिच महिन्यांच्या लॉकडाऊनमधून बाहेर पडलेले नागरिक आता बाहेर सर्वकाही आलबेल असल्यासारखेच वागत आहेत. अशा वाहनधारकांवर सकाळपासूनच कारवाईला सुरुवात करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनधारकांचे फोटो घेऊन, वाहतूक पोलीस त्यांचा तपशील नोंदवून घेत होते. या सर्वांवर रितसर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमुळे काही वाहनधारक पोलिसांशी वाद घालत होते. त्यामुळे अनेकांची वाहने पोलिसांनी जप्त केली.

पोलिसांच्या कारवाईमुळे प्रचंड वाहतूककोंडी होऊन, रुग्णवाहिकाही अडकून पडल्या. याशिवाय, सर्व नियमांचे पालन करून खरोखर महत्त्वाच्या कामासाठी निघालेल्या नागरिकांचाही यामुळे खोळंबा झाला. मात्र सर्व कागदपत्रे असलेल्या नागरिकांना, रुग्णांना, गरोदर महिला तसेच अन्य गरजुंना पोलिसांनी लगेचच जाऊ दिले. सोमवारी सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरुच होती. नवघर पोलिसांच्या कारवाईमुळे ठाणे पोलिसांनाही दुपारी जाग आली. त्यानंतर कोपरी पोलिसांनी ठाण्याच्या हद्दीत कारवाईला सुरुवात केली.दहिसर ते वरसावे नाका ‘जॅम’मीरा रोड : मुंबई पोलिसांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सोमवारी सकाळपासून दहिसर चेकनाका येथे मुंबईत प्रवेश करणाºया वाहनांबाबत काटेकोर तपासणीचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे चेकनाका ते वरसावे नाक्यापर्यंत वाहनांची लांबलचक रांग लागून वाहतूककोंडी झाली होती. रस्त्यावर असलेल्या वाहनांची संख्या पाहून कोरोनाची भीती किंवा लॉकडाऊ न नक्की आहे का, असा प्रश्न पडला.

शासनाने काही बंधने आणि अटीशर्ती ठेवून १ जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. यामध्ये दुचाकीवर एकच, तर चारचाकी वाहनात तीन जणांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. अनावश्यक कारणासाठी बाहेर फिरण्यास मनाई कायम आहे. मात्र, १ जूनपासून मुंबईत जाणाºया वाहनांची संख्या प्रचंड वाढली असून नियमांचेही सर्रास उल्लंघन होत आहे. त्यामुळे या बेशिस्त आणि बेजबाबदार लोकांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी पुन्हा कंबर कसली असून मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या दहिसर येथे सोमवारी सकाळपासूनच मुंबई पोलिसांनी नाकाबंदी करून तपासणी सुरू केली. परवानगीपेक्षा जास्त प्रवासी असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली.नाकाबंदीमुळे पेणकरपाडा, एमआयडीसी व काशिमीरा नाका येथून मुंबईकडे जाणारे रस्ते वाहतूककोंडीने जॅम झाले होते. तपासणीनंतरच वाहन पुढे सरकत असल्यामुळे काही तास लोक अडकून पडले होते. सोशल मीडियावरही दहिसर नाका जॅम झाला असून पोलीस कारवाई करत असल्याने तिकडे जाऊ नका, असे संदेश फिरत होते. पोलीस तपासणीच्या धास्तीने अनेक वाहनचालकांनी पळ काढला. 

टॅग्स :PoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस