शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

डोळखांबजवळील धरण परिसरात डोंगरावर भूस्खलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:15 IST

तिवरे दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

- वसंत पानसरेकिन्हवली : शहापूर तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. दुथडी भरून वाहत असलेल्या नद्यांनी रौद्ररूप धारण करत शेकडो कुटुंबे रस्त्यावर आणली आहेत. त्यातच मागील काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने डोळखांब धरणापासून अवघ्या ४०० ते ५०० मीटर अंतरावर असलेल्या टेकडीवर जमिनीला भेगा पडून भूस्खलन झाल्याने परिसरातील नागरिक भयग्रस्त झाले आहेत.भूस्खलनामुळे जमीन खचत राहिल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. रत्नागिरीतील तिवरे धरण फुटून मोठी दुर्घटना घडली होती. डोळखांब धरणाच्या बाबतीत या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यादृष्टीने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. वाहतूक होत असलेल्या रस्त्याची बाजू ८ ते १० फूट जमिनीत दबली गेली आहे. तरीही, या धोकादायक रस्त्यावरून वाहतूक सुरूच आहे. येथील एक महाकाय जुना वृक्ष कोलमडून पडला आहे. धरणाच्या पिचिंगला, भिंतींना झाडांनी वेढल्याने या भूस्खलनाने धरणासह नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर आली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहापूर लघुपाटबंधारेच्या अखत्यारीत येत असलेल्या ४.४४ दलघमी पाणीसाठा क्षमता असलेल्या डोळखांब धरणाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ३० जुलै २०१९ रोजी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. परंतु, या धरणाच्या बंधाऱ्याला, पिचिंगला झाडांनी वेढल्याने हे धरण कमकुवत झाले आहे. त्यामुळे हे भूस्खलन तिवरे धरणफुटी तर दर्शवत नाही ना, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.गावपाड्यांना धोकाडोळखांब धरणापासून आणि भूस्खलन झालेल्या स्थानापासून काही अंतरावर आदिवासीवाडी आहे. आजूबाजूला डोळखांब शहर, रानविहीर, मधलीवाडी या मुख्य गावांसह इतर काही पाडे असल्याने येथील लोकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. या अगोदर कधीही अशी घटना घडली नसल्याने प्रशासनाने याचे कारण शोधून काढणे गरजेचे आहे.भूस्खलन असेच होत राहिले, तर धरणाला धोका निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे महसूल आणि जलसंपदा विभागाने या घटनेकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.दुभंगलेल्या जमिनीच्या बाजूनेच वाहतूकभूस्खलनाने मोठ्या प्रमाणात जमीन खचली असून मोठे तडे गेले आहेत. जमीन अशीच खचत राहिली तर, डोंगर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यायी रस्ता नसल्याने प्रवासी वाहतुकीसाठी दुचाकी, जीप आदी वाहनांची वर्दळ सुरूच असून, रात्रीअपरात्री रस्ता पुन्हा खचल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे वाहतुकीस पोलीस यंत्रणेने प्रतिबंध करून पर्यायी व्यवस्था करणेही गरजेचे आहे.मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी भूस्खलन का आणि कसे झाले, याची चौकशी करून अहवाल तयार करण्यात येईल. यावर आवश्यक उपाययोजनाही करण्यात येईल. - रवींद्र बाविस्कर, तहसीलदार, शहापूरया धरणावर झाडे वाढली आहेत. ती काढण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली की, तत्काळ टेंडर काढून ती मोकळी करण्यात येतील. भूस्खलनाची कर्मचारी पाहणी करून अहवाल देणार आहेत. -नवनाथ गोराड, उपअभियंता, लघुपाटबंधारेडोळखांब धरणाकडे शासकीय यंत्रणेचे लक्ष नसून, या धरणाची सुरक्षा धोक्यात आहे. इथे कोणतीही जीवितहानी झाल्यास त्याला लघुपाटबंधारे विभाग जबाबदार राहील.- सागर देशमुख, उपसरपंच, ग्रामपंचायत डोळखांब