शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

डोळखांबजवळील धरण परिसरात डोंगरावर भूस्खलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:15 IST

तिवरे दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

- वसंत पानसरेकिन्हवली : शहापूर तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. दुथडी भरून वाहत असलेल्या नद्यांनी रौद्ररूप धारण करत शेकडो कुटुंबे रस्त्यावर आणली आहेत. त्यातच मागील काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने डोळखांब धरणापासून अवघ्या ४०० ते ५०० मीटर अंतरावर असलेल्या टेकडीवर जमिनीला भेगा पडून भूस्खलन झाल्याने परिसरातील नागरिक भयग्रस्त झाले आहेत.भूस्खलनामुळे जमीन खचत राहिल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. रत्नागिरीतील तिवरे धरण फुटून मोठी दुर्घटना घडली होती. डोळखांब धरणाच्या बाबतीत या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यादृष्टीने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. वाहतूक होत असलेल्या रस्त्याची बाजू ८ ते १० फूट जमिनीत दबली गेली आहे. तरीही, या धोकादायक रस्त्यावरून वाहतूक सुरूच आहे. येथील एक महाकाय जुना वृक्ष कोलमडून पडला आहे. धरणाच्या पिचिंगला, भिंतींना झाडांनी वेढल्याने या भूस्खलनाने धरणासह नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर आली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहापूर लघुपाटबंधारेच्या अखत्यारीत येत असलेल्या ४.४४ दलघमी पाणीसाठा क्षमता असलेल्या डोळखांब धरणाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ३० जुलै २०१९ रोजी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. परंतु, या धरणाच्या बंधाऱ्याला, पिचिंगला झाडांनी वेढल्याने हे धरण कमकुवत झाले आहे. त्यामुळे हे भूस्खलन तिवरे धरणफुटी तर दर्शवत नाही ना, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.गावपाड्यांना धोकाडोळखांब धरणापासून आणि भूस्खलन झालेल्या स्थानापासून काही अंतरावर आदिवासीवाडी आहे. आजूबाजूला डोळखांब शहर, रानविहीर, मधलीवाडी या मुख्य गावांसह इतर काही पाडे असल्याने येथील लोकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. या अगोदर कधीही अशी घटना घडली नसल्याने प्रशासनाने याचे कारण शोधून काढणे गरजेचे आहे.भूस्खलन असेच होत राहिले, तर धरणाला धोका निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे महसूल आणि जलसंपदा विभागाने या घटनेकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.दुभंगलेल्या जमिनीच्या बाजूनेच वाहतूकभूस्खलनाने मोठ्या प्रमाणात जमीन खचली असून मोठे तडे गेले आहेत. जमीन अशीच खचत राहिली तर, डोंगर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यायी रस्ता नसल्याने प्रवासी वाहतुकीसाठी दुचाकी, जीप आदी वाहनांची वर्दळ सुरूच असून, रात्रीअपरात्री रस्ता पुन्हा खचल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे वाहतुकीस पोलीस यंत्रणेने प्रतिबंध करून पर्यायी व्यवस्था करणेही गरजेचे आहे.मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी भूस्खलन का आणि कसे झाले, याची चौकशी करून अहवाल तयार करण्यात येईल. यावर आवश्यक उपाययोजनाही करण्यात येईल. - रवींद्र बाविस्कर, तहसीलदार, शहापूरया धरणावर झाडे वाढली आहेत. ती काढण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली की, तत्काळ टेंडर काढून ती मोकळी करण्यात येतील. भूस्खलनाची कर्मचारी पाहणी करून अहवाल देणार आहेत. -नवनाथ गोराड, उपअभियंता, लघुपाटबंधारेडोळखांब धरणाकडे शासकीय यंत्रणेचे लक्ष नसून, या धरणाची सुरक्षा धोक्यात आहे. इथे कोणतीही जीवितहानी झाल्यास त्याला लघुपाटबंधारे विभाग जबाबदार राहील.- सागर देशमुख, उपसरपंच, ग्रामपंचायत डोळखांब