शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

डोळखांबजवळील धरण परिसरात डोंगरावर भूस्खलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:15 IST

तिवरे दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

- वसंत पानसरेकिन्हवली : शहापूर तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. दुथडी भरून वाहत असलेल्या नद्यांनी रौद्ररूप धारण करत शेकडो कुटुंबे रस्त्यावर आणली आहेत. त्यातच मागील काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने डोळखांब धरणापासून अवघ्या ४०० ते ५०० मीटर अंतरावर असलेल्या टेकडीवर जमिनीला भेगा पडून भूस्खलन झाल्याने परिसरातील नागरिक भयग्रस्त झाले आहेत.भूस्खलनामुळे जमीन खचत राहिल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. रत्नागिरीतील तिवरे धरण फुटून मोठी दुर्घटना घडली होती. डोळखांब धरणाच्या बाबतीत या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यादृष्टीने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. वाहतूक होत असलेल्या रस्त्याची बाजू ८ ते १० फूट जमिनीत दबली गेली आहे. तरीही, या धोकादायक रस्त्यावरून वाहतूक सुरूच आहे. येथील एक महाकाय जुना वृक्ष कोलमडून पडला आहे. धरणाच्या पिचिंगला, भिंतींना झाडांनी वेढल्याने या भूस्खलनाने धरणासह नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर आली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहापूर लघुपाटबंधारेच्या अखत्यारीत येत असलेल्या ४.४४ दलघमी पाणीसाठा क्षमता असलेल्या डोळखांब धरणाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ३० जुलै २०१९ रोजी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. परंतु, या धरणाच्या बंधाऱ्याला, पिचिंगला झाडांनी वेढल्याने हे धरण कमकुवत झाले आहे. त्यामुळे हे भूस्खलन तिवरे धरणफुटी तर दर्शवत नाही ना, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.गावपाड्यांना धोकाडोळखांब धरणापासून आणि भूस्खलन झालेल्या स्थानापासून काही अंतरावर आदिवासीवाडी आहे. आजूबाजूला डोळखांब शहर, रानविहीर, मधलीवाडी या मुख्य गावांसह इतर काही पाडे असल्याने येथील लोकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. या अगोदर कधीही अशी घटना घडली नसल्याने प्रशासनाने याचे कारण शोधून काढणे गरजेचे आहे.भूस्खलन असेच होत राहिले, तर धरणाला धोका निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे महसूल आणि जलसंपदा विभागाने या घटनेकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.दुभंगलेल्या जमिनीच्या बाजूनेच वाहतूकभूस्खलनाने मोठ्या प्रमाणात जमीन खचली असून मोठे तडे गेले आहेत. जमीन अशीच खचत राहिली तर, डोंगर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यायी रस्ता नसल्याने प्रवासी वाहतुकीसाठी दुचाकी, जीप आदी वाहनांची वर्दळ सुरूच असून, रात्रीअपरात्री रस्ता पुन्हा खचल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे वाहतुकीस पोलीस यंत्रणेने प्रतिबंध करून पर्यायी व्यवस्था करणेही गरजेचे आहे.मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी भूस्खलन का आणि कसे झाले, याची चौकशी करून अहवाल तयार करण्यात येईल. यावर आवश्यक उपाययोजनाही करण्यात येईल. - रवींद्र बाविस्कर, तहसीलदार, शहापूरया धरणावर झाडे वाढली आहेत. ती काढण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली की, तत्काळ टेंडर काढून ती मोकळी करण्यात येतील. भूस्खलनाची कर्मचारी पाहणी करून अहवाल देणार आहेत. -नवनाथ गोराड, उपअभियंता, लघुपाटबंधारेडोळखांब धरणाकडे शासकीय यंत्रणेचे लक्ष नसून, या धरणाची सुरक्षा धोक्यात आहे. इथे कोणतीही जीवितहानी झाल्यास त्याला लघुपाटबंधारे विभाग जबाबदार राहील.- सागर देशमुख, उपसरपंच, ग्रामपंचायत डोळखांब