शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

विरार-अलिबाग महामार्गासाठी होणार भूसंपादन , ७० हेक्टर शेतजमीन ताब्यात घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 6:18 AM

विरार-अलिबाग या महामार्गासाठी ठाणे जिल्ह्यातील भिवंडीसह कल्याण, अंबरनाथ तालुक्यांतील शेतकºयांच्या जमिनी खाजगी वाटाघाटीद्वारे खरेदी पद्धतीने संपादित केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील सुमारे ७० हेक्टर शेतजमीन संपादन केली जाणार आहे. यापैकी अंबरनाथ तालुक्यातील पाली

- सुरेश लोखंडेठाणे : विरार-अलिबाग या महामार्गासाठी ठाणे जिल्ह्यातील भिवंडीसह कल्याण, अंबरनाथ तालुक्यांतील शेतकºयांच्या जमिनी खाजगी वाटाघाटीद्वारे खरेदी पद्धतीने संपादित केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील सुमारे ७० हेक्टर शेतजमीन संपादन केली जाणार आहे. यापैकी अंबरनाथ तालुक्यातील पाली, ना-हेण आणि कारवली गावातील शेतकºयांच्या सुमारे चार लाख ६४ हजार ६१६.५९ चौरस मीटर म्हणजेच सुमारे ४६.४६१६६ हेक्टर शेतजमिनीच्या भूसंपादनासाठी संमतीपत्रे घेण्याचे काम सुरू झाले आहे.चोहोबाजूने खाडीने वेढलेल्या ठाणे जिल्ह्यास लोहमार्गासह आता महामार्गांनीदेखील मगरमिठी मारायला घेतली आहे. समृद्धी महामार्गासह गुजरात बडोदरा-जेएनपीटी महामार्ग आणि आता विरार-अलिबाग सुमारे १२१ किमीचा महामार्ग टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.संपादित होणाºया या शेतजमिनीपैकी सुमारे ४६.४६१६६ हेक्टर शेतजमिनीच्या संपादनासाठी पाली, नाºहेण व कारवले येथील शेतकºयांची संमतीपत्रे घेतली जात आहेत. यामध्ये पाली येथील शेतकºयांच्या सुमारे ६.६५८४०१ हेक्टर शेतजमिनीसह नाºहेणच्या शेतकºयांची सुमारे २१.७२६०.३७ हेक्टर आणि कारवले येथील १८.०७७२२२ हेक्टर शेतजमीन जात आहे. सुमारे १२१ किमी लांबीचा हा मिनी महामार्ग बहुउद्देशीय मार्गिका म्हणजेच कॉरिडॉर महामार्गासाठी वापरला जाणार आहे. थेट अलिबाग बंदराला जोडलेला हा महामार्ग आहे. या महामार्गामुळे सुमारे साडेचार तासांचा प्रवास अवघ्या एक ते दीड तासाच्या कालावधीत पार करता येणार आहे. जेएनपीटी कॉरिडॉरच्या आधी हा महामार्ग तयार होत आहे. या शेतजमिनी खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने एमएमआरडीए संपादन करत आहे. जिल्हास्तरीय समितीमार्फत भूसंपादन कायद्याच्या तरतुदीस अनुसरून एमएमआरडीएच्या नावे या जमिनीची खरेदी होत आहे.‘विरार-अलिबाग महामार्ग जमिनीसाठी बाजारबोली’अलिबाग समुद्रातील बंदरास जोडण्यासाठी एमएमआरडीएद्वारे विरार-अलिबाग ही बहुउद्देशीय मार्गिका (महामार्ग) तयार करण्यात येत आहे. याबाबत ‘विरार-अलिबाग महामार्ग जमिनीसाठी बाजारबोली’ या मथळ्याखाली लोकमतने २२ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध करून संबंधित हालचाली उघड केल्या होत्या. यानुसार, प्रथम अंबरनाथ तालुक्यातील पाली, नाºहेण आणि कारवली या तीन गावांमधील शेतकºयांकडून त्यांच्या शेतजमिनी संपादनासाठी नोटीस देऊन संमतीपत्रे भरून घेण्याचे काम उल्हासनगर उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग