शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

कल्याणच्या स्वागतयात्रेत एकोप्याचा अभाव, जाहिरातबाजीला जास्त प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 04:11 IST

गुढीपाडव्यानिमित्त ऐतिहासिक कल्याण शहरात कल्याण संस्कृती मंचाच्या पुढाकाराने नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येते. मात्र, या यात्रेत एकोपा राहिलेला नाही.

- जान्हवी मोर्येडोंबिवली - गुढीपाडव्यानिमित्त ऐतिहासिक कल्याण शहरात कल्याण संस्कृती मंचाच्या पुढाकाराने नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येते. मात्र, या यात्रेत एकोपा राहिलेला नाही. तसेच ही यात्रा सामाजिक उद्देशापासून दुरावली असल्याची नाराजी स्वागतयात्रेचे संस्थापकीय सदस्य भिकू बारस्कर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या यात्रेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.बारस्कर यांनी सांगितले की, डोंबिवलीच्या धर्तीवर कल्याणमध्ये २००१ पासून नववर्ष स्वागतयात्रेला सुरुवात झाली. त्यावेळी प्रफुल्ल गवळी हे यात्रेचे अध्यक्ष, तर त्यांच्या सोबतीला सुरेश एकलहरे, राजीव जोशी, प्रा. उदय सामंत व बारस्कर होते. या मंडळींना या उपक्रमात माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या मंडळींची साथ मिळाली. या मंडळींच्या कारकिर्दीत दरवर्षी यात्रेत विविध मान्यवर सहभागी होत होते. त्यात एकावेळेस ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, अभिनेत्री निर्मिती सामंत आणि आदेश बांदेकर यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे यात्रेला एक वेगळे वलय प्राप्त झाले होेते.मात्र, कालांतराने हा उत्साह मावळत गेला. त्यातील सामाजिक उद्देश मागे पडला. तसेच एकोपाही राहिला नाही. एकदा तर कल्याणमधील सफाई कामगार असलेल्या रुखी समाजाला गुढी उभारण्याचा मान दिला गेला होता. सर्व समाजांना यात्रेत सहभागी करून घेताना ही यात्रा सर्वांना आपली वाटावी, असा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तो नंतरच्या काळात झालेला दिसला नाही. या यात्रेत विविध संस्थांचे प्रबोधनात्मक चित्ररथ सहभागी होत होते. त्यानंतर, विविध व्यापारी व खाजगी क्लासेसचे चित्ररथ सहभागी झाले. त्यातून त्यांची स्वत:चीच जाहिरात सुरू झाली. यात्रा हे जाहिरातबाजीचे साधन झाले. या सगळ्या गोष्टी व बदलते स्वरूप पाहून त्यातून सामाजिक प्रबोधनाचा उद्देश मागे पडत चालल्याचे पाहून बारस्कर व जोशी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यानच्या काळात गवळी यांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता.दरम्यान, ही यात्रा सुरू राहावी, त्यासाठी निधी गोळा केला जातो. या देणगीच्या रकमेतून यात्रेचा खर्च भागवला जावा, असा त्यामागचा उदात्त हेतू होता. मात्र, यात्रेत माणुसकीच हरवल्याने आम्ही दूर झालो, असे सांगत यात्रेच्या आयोजनाविषयी नाराजीचा सूर बारस्कर यांनी व्यक्त केला आहे.‘मतभेद बाजूला ठेवून संवाद साधायला हवा’यासंदर्भात कल्याण संस्कृती मंचाचे सरचिटणीस श्रीराम देशपांडे म्हणाले, बारस्कर हे संस्थापकीय सदस्य आहेत. मतभेद बाजूला ठेवून त्यांनी आमच्याशी बोलले पाहिजे. ते आम्हाला हवे आहेत. मंचातील ज्येष्ठ सदस्यांनी हे वाद मिटवणे गरजेचे होते. बारस्कर यांनी यात्रेत एकोपा राहिला नाही, असे वक्तव्य केले असेल, तर एकोपा नसल्याशिवाय इतकी वर्षे यात्रा निघते का, असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.त्याचबरोबर समाजप्रबोधनाऐवजी जाहिरातबाजी केली जात असल्याचा आरोपही चुकीचा आहे. त्याचे कारण आम्ही विविध संस्थांकडून चित्ररथाचे विषय मागवत असतो. त्यामुळे त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्याला आयोजक जबाबदार आहे, असे म्हणता येणार नाही. नव्या संकल्पना राबवण्यास व सांगण्यास कोणाचाही नकार नाही. बारस्कर यांनी पुन्हा यावे, काम करावे, हेच मंचातील सगळ्यांचे मत आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :kalyanकल्याणgudhi padwaगुढी पाडवा