शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

वर्तकनगर, नौपाड्यात घरांत चिखल, नालेसफाईत नियोजनाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:17 AM

पहिल्याच पावसात १३ ठिकाणी तुंबले पाणी : नालेसफाईत नियोजनाचा अभाव

ठाणे : सोमवारी रात्री एक तासाच्या पावसाने ठाणेकरांची पुरती दैना उडाली. दुसरीकडे पालिकेने केलेल्या कामांची पोलखोलही यावेळी झाली. पहिल्या पावसाताच वर्तकनगर येथील म्हाडा वसाहतीमध्ये नाल्याचे घाण पाणी आणि गाळ घरात घुसल्याने नागरिकांना रात्रभर हा गाळ उपसावा लागला. मंगळवारी सकाळी म्हाडा वसाहतीच्या बाहेर रस्त्यावर तो तसाच पडून होता. चिखलवाडी परिसरातही

नालेसफाईमध्ये बाहेर काढलेला गाळ घरात शिरला. शहरात तब्बल १३ ठिकाणी एका तासाच्या पावसामुळे गुडघाभर पाणी साचले होते.वर्तकनगर येथील जुन्या आणि नव्या म्हाडा वसाहतीमध्ये अक्षरश: नाल्याचे घाण पाणी शिरले होते. ऐन रात्रीमध्ये हा सर्व प्रकार घडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. संपूर्ण रस्त्यावर अक्षरश: गाळाचे आणि घाण पाणी साचले होते. नागरिकांच्या तक्र ारी नंतर रात्री उशिरा पालिका कर्मचाऱ्यांनी गाळ काढण्याचे काम सुरू केले. स्वत: सहाय्यक आयुक्त चारुशीला पंडित यादेखील घटनास्थळी दाखल झाल्या. येथील नाल्याची सफाई अजूनही झाली नसून कचरा अजूनही नाल्यात पडून आहे. तर नाल्याच्या एका बाजूला नाल्यातच गाळ साठवून ठेवल्याने पाण्याचा प्रवाह अडून पाणीघरात शिरले, असा आरोप नागरिकांनी केला. या परिसरातील संतोष निकम यांच्या म्हणण्यानुसार नाल्यात तीन ठिकाणी एकाच वेळी कल्व्हर्ट काम सुरू केले आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार झाला. याशिवाय नाल्यातील गाळदेखील काढला नसल्याने हे सर्व पाणी नागरिकांच्या घरात शिरले. वर्तकनगरच्या विकासासाठी मोठ्या पॅकेजची घोषणा केली जाते. मात्र, नालेसफाईमध्येच सर्व कारभाराचा बोजवारा उडाला आहे. पंडित यांनी सर्व यंत्रणांना स्वच्छता करण्याचे आदेश दिले आहेत. नाल्यात जेसीबी घुसवण्यासाठी मातीचा रॅम्प तयार केला होता. तो गाळ नव्हता. त्यामुळेदेखील पाणी अडून ते पाणी रस्त्यावर आले असल्याचे त्यांनी सांगितले.चिखलवाडीत ५0 घरांत पाणीदुसरीकडे नौपाडा भागातील चिखलवाडी परिसरातही नाल्याचे घाण पाणी सुमारे ५० हून अधिक नागरिकांच्या घरात शिरले.त्यामुळे या परिसरात संपूर्ण दुर्गंधी पसरली आहे.त्यामुळे नागरिकांच्या सामानाचेदेखील नुकसान झाले. प्रत्येक पावसात या ठिकाणी पाणी साचते. मात्र, सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे मोठ्याप्रमाणात पाणी रस्त्यावर आणि घरात शिरले.झोपपडट्टीचा भाग असल्याने पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना प्रादुर्भाव होण्याची चिन्हे आहेत.अधिकाऱ्यांची कार्यालयात दांडीपावसात प्रत्येक अधिकाºयाने प्रभाग समितीमध्ये राहण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मान्सूनपूर्व बैठकीमध्ये दिले होते. मात्र, आयुक्तांची पाठ फिरताच फारच कमी अधिकारी सोमवारी रात्री प्रभाग समिती कार्यालयात उपस्थित होते. केवळ अधिकाºयांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर माहितीची देवाणघेवाण सुरू होती. आयुक्त स्वत: व्हॉट्सअपवर परिस्थितीचा आढावा घेत होते. जे अधिकारी प्रत्यक्ष प्रभाग समितीमध्ये उपस्थित नव्हते त्यांची नावे आयुक्तांना कळवण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयानेस्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका