शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
2
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
3
“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी
4
१८ व्या वर्षी तुमचं मुल होईल कोट्यधीश! SSY, NPS आणि PPF सह 'या' ६ योजनांमध्ये आजच करा गुंतवणूक
5
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
6
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
7
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
8
Tips: कामाच्या ठिकाणी होणारे मतभेद मिटवण्यासाठी ६ सोप्या टिप्स!
9
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
10
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
11
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
12
शाळांच्या सहलीसाठी मिळणार 'एसटी'च्या नव्या बसेस; विद्यार्थ्यांना घेता येणार संस्मरणीय अनुभव
13
भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू
14
Farming: ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार ५० हजार
15
आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम
16
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
17
Bigg Boss 19: शिव ठाकरेचा 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला फूल सपोर्ट! प्रणित मोरेसाठी केली पोस्ट, म्हणाला- "भाऊ..."
18
बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
19
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
20
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी संख्येअभावी २८ प्राथमिक शाळांना कायमचे कुलूप; शासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 00:16 IST

जि.प.ची कार्यवाही, इमारतींच्या देखभालीवर सोसावा लागतो आर्थिक भुर्दंड

- सुरेश लोखंडेठाणे : पुरेशा प्रमाणात विद्यार्थी संख्या नसतानाही ठाणे जिल्ह्यात सुमारे ४४ शाळा बिनधास्त सुरू आहेत. त्यावरील शिक्षकांचे वेतनासह शाळा इमारतींच्या देखभाल दुरुस्तीवर शासनाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. यास आळा घालण्यासाठी कोणत्याही निकषांमध्ये बसत नसलेल्या त्यातील २८ प्राथमिक शाळांना आता कायमचे कुलूप लागणार आहे. तर उर्वरित १६ शाळांसाठी विविध स्वरूपाचे निकष लावून त्यांचा बचाव केला आहे.हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. त्यात कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा आगामी दोन महिन्यात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी शिक्षण विभागांव्दारे सुरू झाली. त्यानुसार सर्वप्रथम अशा शाळांची यादी जिल्हा परिषदेव्दारे तयार करण्यात आली. त्यामध्ये २० पेक्षा कमी म्हणजे १९ किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा प्राधान्याने बंद करण्यात येत आहेत. या शैक्षणिक एकही शाळा कमी विद्यार्थी संख्येची नसल्याचा दावा केला जात आहे. यामुळे मागील वर्षी विद्यार्थी संख्या नोंदवलेल्या आणि या वर्षीदेखील त्यांना पटसंख्या वाढवता आली नाही, अशा २८ शाळांची यादी तयार झाली असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी लोकमतला सांगितले.कायमच्या बंद करण्यात येत असलेल्या शाळांमध्ये सर्वाधिक मुरबाड तालुक्यातील आदिवासी गावपाड्यातील १५ प्राथमिक शाळांचा समावेश आहे. या खालोखाल भिवंडी तालुक्यातील चार, कल्याणमधील चार, अंबरनाथ तालुक्यातील दोन, शहापूरमधील दोन आणि उल्हासनगर येथील एका शाळेचा समावेश आहे. कमी पटसंख्येच्या ४४ पैकी २८ शाळांना आता लवकाच कायमचे कुलूप लागणार आहे. त्यातील विद्यार्थी जवळच्या शाळेत दाखल करून शिक्षकांचेदेखील अन्य शाळांमध्ये आता समायोजन होणार आहे.विविध प्रकारच्या निकषांमुळे दहा शाळांवरील गंडांतर टळलेकमी विद्यार्थी संख्या असूनही बचावलेल्या या शाळांमध्ये भिवंडी तालुक्यातील तीन शाळांचा समावेश आहे. या शाळांच्या सुमारे तीन किमी. अंतरावर शाळा नाही. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय आळण्यासाठी या शाळांवरील गंडांतर टळले. याप्र्रमाणेच मुरबाड तालुक्यातीलदेखील दोन शाळांचा बचाव झाला आहे.तर अंबरनाथमधील एक उर्दू शाळा या कारवाईतून बचावली आहे. या शाळेच्या जवळपास एकही उर्दू शाळा अस्तित्त्वात नाही. या शाळेतील उर्दूभाषिक विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी ही शाळा सुरू ठेवणे भाग पडले आहे. याप्रमाणेच शहापूरमधीलदेखील काही शाळांचा बचाव झालेला आहे.सुमारे दहा शाळांचे गंडांतर या विविध निकषांमुळे टळले आहे. याप्रमाणेच उर्वरित सहा शाळांमधील पटसंख्या वाढवता आल्यामुळे त्यांच्यावरील बंद होण्याचे संकट टळल्याचे प्राप्त अहवालावरून दिसूनयेत आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षणthaneठाणे