शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

विद्यार्थी संख्येअभावी २८ प्राथमिक शाळांना कायमचे कुलूप; शासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 00:16 IST

जि.प.ची कार्यवाही, इमारतींच्या देखभालीवर सोसावा लागतो आर्थिक भुर्दंड

- सुरेश लोखंडेठाणे : पुरेशा प्रमाणात विद्यार्थी संख्या नसतानाही ठाणे जिल्ह्यात सुमारे ४४ शाळा बिनधास्त सुरू आहेत. त्यावरील शिक्षकांचे वेतनासह शाळा इमारतींच्या देखभाल दुरुस्तीवर शासनाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. यास आळा घालण्यासाठी कोणत्याही निकषांमध्ये बसत नसलेल्या त्यातील २८ प्राथमिक शाळांना आता कायमचे कुलूप लागणार आहे. तर उर्वरित १६ शाळांसाठी विविध स्वरूपाचे निकष लावून त्यांचा बचाव केला आहे.हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. त्यात कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा आगामी दोन महिन्यात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी शिक्षण विभागांव्दारे सुरू झाली. त्यानुसार सर्वप्रथम अशा शाळांची यादी जिल्हा परिषदेव्दारे तयार करण्यात आली. त्यामध्ये २० पेक्षा कमी म्हणजे १९ किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा प्राधान्याने बंद करण्यात येत आहेत. या शैक्षणिक एकही शाळा कमी विद्यार्थी संख्येची नसल्याचा दावा केला जात आहे. यामुळे मागील वर्षी विद्यार्थी संख्या नोंदवलेल्या आणि या वर्षीदेखील त्यांना पटसंख्या वाढवता आली नाही, अशा २८ शाळांची यादी तयार झाली असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी लोकमतला सांगितले.कायमच्या बंद करण्यात येत असलेल्या शाळांमध्ये सर्वाधिक मुरबाड तालुक्यातील आदिवासी गावपाड्यातील १५ प्राथमिक शाळांचा समावेश आहे. या खालोखाल भिवंडी तालुक्यातील चार, कल्याणमधील चार, अंबरनाथ तालुक्यातील दोन, शहापूरमधील दोन आणि उल्हासनगर येथील एका शाळेचा समावेश आहे. कमी पटसंख्येच्या ४४ पैकी २८ शाळांना आता लवकाच कायमचे कुलूप लागणार आहे. त्यातील विद्यार्थी जवळच्या शाळेत दाखल करून शिक्षकांचेदेखील अन्य शाळांमध्ये आता समायोजन होणार आहे.विविध प्रकारच्या निकषांमुळे दहा शाळांवरील गंडांतर टळलेकमी विद्यार्थी संख्या असूनही बचावलेल्या या शाळांमध्ये भिवंडी तालुक्यातील तीन शाळांचा समावेश आहे. या शाळांच्या सुमारे तीन किमी. अंतरावर शाळा नाही. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय आळण्यासाठी या शाळांवरील गंडांतर टळले. याप्र्रमाणेच मुरबाड तालुक्यातीलदेखील दोन शाळांचा बचाव झाला आहे.तर अंबरनाथमधील एक उर्दू शाळा या कारवाईतून बचावली आहे. या शाळेच्या जवळपास एकही उर्दू शाळा अस्तित्त्वात नाही. या शाळेतील उर्दूभाषिक विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी ही शाळा सुरू ठेवणे भाग पडले आहे. याप्रमाणेच शहापूरमधीलदेखील काही शाळांचा बचाव झालेला आहे.सुमारे दहा शाळांचे गंडांतर या विविध निकषांमुळे टळले आहे. याप्रमाणेच उर्वरित सहा शाळांमधील पटसंख्या वाढवता आल्यामुळे त्यांच्यावरील बंद होण्याचे संकट टळल्याचे प्राप्त अहवालावरून दिसूनयेत आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षणthaneठाणे