शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोकण मराठी साहित्य परिषद आणि अनघा प्रकाशन आयोजित ठाण्यात रंगणार अनघोत्सव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 16:44 IST

कोकण मराठी साहित्य परिषद आणि अनघा प्रकाशनतर्फे ठाण्यात अनघोत्सव रंगणार आहे. 

ठळक मुद्देठाण्यात रंगणार अनघोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष पदमश्री वामन केंद्रे विशेष अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ भारतकुमार राऊत

ठाणे :  ४० व्या वर्धापन दिना निमित्त कोकण मराठी साहित्य परिषद आणि अनघा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १४ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता सहयोग मंदिर,ठाणे (प) येथे अनघोत्सव आयोजित करीत आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदमश्री वामन केंद्रे असून विशेष अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ भारतकुमार राऊत उपस्थित राहणार आहेत अशी माहिती प्रकाशक अमोल नाले यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

     डॉ विलास खोले आणि प्रा.अनंत देशमुख प्रमुख व्यक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी मधु मंगेश कर्णिक यांची तीन तर डॉ महेश केळुसकर यांची चार पुस्तके प्रकाशित होणार आहेत. यानिमित्ताने मधु मंगेश कर्णिक यांच्या समग्र साहित्याचे संक्षिप्त रूपच महाराष्ट्राच्या जनतेला मिळणार आहेच तर डॉ महेश केळुसकर यांच्या दशावतार, लळीत, चित्रकथी या पुस्तकांमुळे कोकणातल्या लोककलेचा आस्वाद तमाम मराठी माणसाला मिळेल यात शंका नाही तर माझा आवाज या केळुस्करांच्या पुस्तकाने नवोदित वृत्तनिवेदक, शिक्षक आणि प्राध्यापकांना एक उत्तम असे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच अनघा प्रकाशनाच्या पुसकांच्या परिक्षणाबरोबरच अनघाच्या लेखकांचा परिचय लोकांना व्हावा या उद्देशाने 'अनघावार्ता' या अनियतकालिकाचे प्रकाशन देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. अनघा प्रकाशनाला यावर्षी ४० वर्षे होत आहेत. कै माधव गडकरी, कै अरुण साधू, कै. अशोक जैन, कै पं यशवंत देव, कै.वसंत भालेकर, कै.इसाक मुजावर,कै. गो.आ. भट, कै. परेन जांभळे, कै.रमेश उदारे यांसारख्या नामवंत लेखकांची तर पुस्तके अनघा प्रकाशनाने प्रकाशित केलीच पण पदमश्री मधु मंगेश कर्णिक, सुलोचनादीदी, डॉ महेश केळुसकर, डॉ भारतकुमार राऊत, डॉ विलास खोले, डॉ मोहिनी वर्दे, माधवी घारपुरे, जोसेफ तुस्कानो, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, चंद्रकांत भोंजाळ, डॉ.प्रदीप कर्णिक, डॉ.विजय पांढरीपांडे, डॉ.नीता पांढरीपांडे, डॉ.सिसिलिया आणि अनेक जुने नविन लेखक आजही हक्काने अनघा कडे लिहीत आहेत.आणि म्हणूनच असं वाटत की अनघाच्या आणि तिच्या संलग्न संस्था म्हणजेच मोनिका प्रकाशन(नाशिक),वेदांत पब्लिशिंग हाऊस(पुणे) आणि अमोल वितरण यांच्या माध्यमातून ही साहित्यरूपी पालखी साहित्याची सेवा करत आहे. अनेक अडचणी आणि अडथळ्यांना पार करत आजवरचा ४0 वर्षाचा प्रवास रात्री झोपतांना शांत झोप देऊन जातो, कारण सर्व नामांकित लेखकांच्या प्रेमाने आणि त्यांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासावरच हे शक्य झाले आणि म्हणूनच मधु मंगेश कर्णिक यांच्या आशीर्वादाने आम्ही उत्तर महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद स्थापन करू शकलो आणि त्या माध्यमातून तीन साहित्य संमेलने घेऊ शकलो अशी माहिती अमोल नाले यांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक