शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

भूमिपुत्रांना भूमिहीन होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 22:56 IST

आगरी कोळी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

कल्याणः आगरी कोळी समाज हा भूमिपुत्रांचा समाज आहे. भूमीपुत्र आज भूमिहीन होत चालला आहे. पण आमचे सरकार त्यांना भूमिहीन होऊ देणार नाही. त्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगरी कोळी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात दिली.पश्चिमेकडील लालचौकी परिसरातील या महोत्सवात बोलताना फडणवीस पुढे म्हणाले, आगरी समाज आक्रमक असतो असे नेहमीच बोलले जाते. पण हा समाज आक्रमकच नाही तर प्रत्येक क्षेत्रात अग्रेसरदेखील आहे. कोळी समाजाची संस्कृती जगाला भुरळ पाडणारी आहे कोळ्यांचे समुद्राशी अनोखे नाते आहे. सातवाहन काळातही या आगरी कोळी समाजाने दिग्विजय नोंदविला होता. त्यामुळे या समाजाला एक इतिहास लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा आरमाराची निर्मिती केली, त्यावेळेसही या समाजाचे मोलाचे योगदान लाभले होते, असेही फडणवीस म्हणाले. महोत्सव एक व्यासपीठ आहे. प्रगतीच्या ओघात वेगवेगळ्या व्यवसायात समाजाने पदार्पण केले असले, तरी अशा महोत्सवांच्या माध्यमातून परंपरा जीवंत ठेवली असल्याचे सांगत फडणवीस यांनी आगरी कोळी समाज उत्कर्ष मंडळ यांचे विशेष कौतुक केले.

नेवाळीचा प्रश्न सामंजस्याने सोडवणारभूमिपुत्रांच्या समृद्धीनेच देशाची समृद्धी होणार आहे, हे माहीत असल्यानेच कोळीवाडयाचे सीमांकन करण्यास सुरुवात केली आहे. त्या जमिनी कोळी समाजालाच मिळाली पाहिजे, अशी आमची धारणा असून क्लस्टर आणि घरांच्या  प्रश्नावर भूमिपुत्रांना विश्वासात घेतल्याशिवाय राहणार नाही. नेवाळीचा विषय सामंजस्याने सोडवू. यात समाजबांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत निश्चित विचार केला जाईल असेही आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले. नेवाळी विषयात संरक्षण विभागाचे देखील म्हणणं ऐकून घेतले जाईल याबाबत केंद्रातही बैठका झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkalyanकल्याणBJPभाजपा