शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

भूमिपुत्रांना भूमिहीन होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 22:56 IST

आगरी कोळी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

कल्याणः आगरी कोळी समाज हा भूमिपुत्रांचा समाज आहे. भूमीपुत्र आज भूमिहीन होत चालला आहे. पण आमचे सरकार त्यांना भूमिहीन होऊ देणार नाही. त्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगरी कोळी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात दिली.पश्चिमेकडील लालचौकी परिसरातील या महोत्सवात बोलताना फडणवीस पुढे म्हणाले, आगरी समाज आक्रमक असतो असे नेहमीच बोलले जाते. पण हा समाज आक्रमकच नाही तर प्रत्येक क्षेत्रात अग्रेसरदेखील आहे. कोळी समाजाची संस्कृती जगाला भुरळ पाडणारी आहे कोळ्यांचे समुद्राशी अनोखे नाते आहे. सातवाहन काळातही या आगरी कोळी समाजाने दिग्विजय नोंदविला होता. त्यामुळे या समाजाला एक इतिहास लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा आरमाराची निर्मिती केली, त्यावेळेसही या समाजाचे मोलाचे योगदान लाभले होते, असेही फडणवीस म्हणाले. महोत्सव एक व्यासपीठ आहे. प्रगतीच्या ओघात वेगवेगळ्या व्यवसायात समाजाने पदार्पण केले असले, तरी अशा महोत्सवांच्या माध्यमातून परंपरा जीवंत ठेवली असल्याचे सांगत फडणवीस यांनी आगरी कोळी समाज उत्कर्ष मंडळ यांचे विशेष कौतुक केले.

नेवाळीचा प्रश्न सामंजस्याने सोडवणारभूमिपुत्रांच्या समृद्धीनेच देशाची समृद्धी होणार आहे, हे माहीत असल्यानेच कोळीवाडयाचे सीमांकन करण्यास सुरुवात केली आहे. त्या जमिनी कोळी समाजालाच मिळाली पाहिजे, अशी आमची धारणा असून क्लस्टर आणि घरांच्या  प्रश्नावर भूमिपुत्रांना विश्वासात घेतल्याशिवाय राहणार नाही. नेवाळीचा विषय सामंजस्याने सोडवू. यात समाजबांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत निश्चित विचार केला जाईल असेही आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले. नेवाळी विषयात संरक्षण विभागाचे देखील म्हणणं ऐकून घेतले जाईल याबाबत केंद्रातही बैठका झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkalyanकल्याणBJPभाजपा