शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भूमिपुत्रांना भूमिहीन होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 22:56 IST

आगरी कोळी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

कल्याणः आगरी कोळी समाज हा भूमिपुत्रांचा समाज आहे. भूमीपुत्र आज भूमिहीन होत चालला आहे. पण आमचे सरकार त्यांना भूमिहीन होऊ देणार नाही. त्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगरी कोळी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात दिली.पश्चिमेकडील लालचौकी परिसरातील या महोत्सवात बोलताना फडणवीस पुढे म्हणाले, आगरी समाज आक्रमक असतो असे नेहमीच बोलले जाते. पण हा समाज आक्रमकच नाही तर प्रत्येक क्षेत्रात अग्रेसरदेखील आहे. कोळी समाजाची संस्कृती जगाला भुरळ पाडणारी आहे कोळ्यांचे समुद्राशी अनोखे नाते आहे. सातवाहन काळातही या आगरी कोळी समाजाने दिग्विजय नोंदविला होता. त्यामुळे या समाजाला एक इतिहास लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा आरमाराची निर्मिती केली, त्यावेळेसही या समाजाचे मोलाचे योगदान लाभले होते, असेही फडणवीस म्हणाले. महोत्सव एक व्यासपीठ आहे. प्रगतीच्या ओघात वेगवेगळ्या व्यवसायात समाजाने पदार्पण केले असले, तरी अशा महोत्सवांच्या माध्यमातून परंपरा जीवंत ठेवली असल्याचे सांगत फडणवीस यांनी आगरी कोळी समाज उत्कर्ष मंडळ यांचे विशेष कौतुक केले.

नेवाळीचा प्रश्न सामंजस्याने सोडवणारभूमिपुत्रांच्या समृद्धीनेच देशाची समृद्धी होणार आहे, हे माहीत असल्यानेच कोळीवाडयाचे सीमांकन करण्यास सुरुवात केली आहे. त्या जमिनी कोळी समाजालाच मिळाली पाहिजे, अशी आमची धारणा असून क्लस्टर आणि घरांच्या  प्रश्नावर भूमिपुत्रांना विश्वासात घेतल्याशिवाय राहणार नाही. नेवाळीचा विषय सामंजस्याने सोडवू. यात समाजबांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत निश्चित विचार केला जाईल असेही आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले. नेवाळी विषयात संरक्षण विभागाचे देखील म्हणणं ऐकून घेतले जाईल याबाबत केंद्रातही बैठका झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkalyanकल्याणBJPभाजपा