शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
4
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
5
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
6
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
7
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
8
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
9
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
10
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
11
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
12
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
13
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
14
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
15
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
16
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
17
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
18
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
19
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
20
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान

‘खेलो इंडिया’मुळे मैदानी खेळांचे महत्त्व वाढले - देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:36 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘खेलो इंडिया’ या संकल्पनेमुळे मैदानी खेळांचे महत्त्व वाढले असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘खेलो इंडिया’ या संकल्पनेमुळे मैदानी खेळांचे महत्त्व वाढले असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.शहराच्या पूर्व भागातील दादासाहेब गायकवाड मैदानात महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने कै. अनिल कर्पे स्मृतिप्रीत्यर्थ भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पुढाकाराने हे आयोजन करण्यात आले आहे. नव तरुण मंडळ या स्पर्धेचे आयोजक आहे. या मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून कबड्डी स्पर्धेला विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी भेट दिली. याप्रसंगी फडणवीस यांनी उपरोक्त प्रतिपादन केले. याप्रसंगी आमदार रवींद्र चव्हाण, माजी आमदार नरेंद्र पवार, आयुक्त गोविंद बोडके, नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, माजी नगरसेवक सचिन पोटे आदी मान्यवर उपस्थित होते. फडणवीस यांनी कबड्डीपटंूशी हस्तांदोलन केले. तसेच एका सामन्यासाठी त्यांनी नाणेफेक करून सामन्याची सुरुवात केली. काही वेळ त्यांनी सामना पाहिला. कबड्डी हा आपल्या मातीतील खेळ असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. काही संघ हरले असले तरी त्यांनी पुन्हा नव्या दमाने तयारी करावी. पुढच्या काळात त्यांना यश नक्कीच मिळणार, असे आवाहन फडणवीस यांनी सर्व क्रीडापटूंना केले. या स्पर्धेत ३३ संघ उतरले असून आयोजक आमदार गायकवाड यांच्या उत्कृष्ट आयोजनाविषयी फडणवीस यांनी गौरवोद्गार काढले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसKhelo India 2019खेलो इंडिया 2019