शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांची अग्निशमन विभागाच्या नोटीसला केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 16:23 IST

ठाणे - मुंबईत घडलेल्या घटनेनंतर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलामार्फत एनओसी नसलेल्या शहरातील सुमारे ४०० हॉटेल्स, पबला सहा महिन्यात पुन्हा दुसऱ्यांदा नोटीसा बजावल्या आहेत. आधी देखील एकाही हॉटेल्स अथवा पबवाल्यांनी कागदपत्रांची पुर्तता केली नव्हती. आता देखील तिच परिस्थिती असून एकाही हॉटेलवाल्याने कागदपत्रांची पुर्तता केली नसल्याची माहिती समोर आली आहे. परंतु आता ...

ठळक मुद्दे३१ डिसेंबर पर्यंतची दिली होती मुदतएकाही हॉटेलवाल्याने सादर केले नाहीत कागदपत्रे

ठाणे - मुंबईत घडलेल्या घटनेनंतर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलामार्फत एनओसी नसलेल्या शहरातील सुमारे ४०० हॉटेल्स, पबला सहा महिन्यात पुन्हा दुसऱ्यांदा नोटीसा बजावल्या आहेत. आधी देखील एकाही हॉटेल्स अथवा पबवाल्यांनी कागदपत्रांची पुर्तता केली नव्हती. आता देखील तिच परिस्थिती असून एकाही हॉटेलवाल्याने कागदपत्रांची पुर्तता केली नसल्याची माहिती समोर आली आहे. परंतु आता पालिका अशा    हॉटेलवाल्यांच्या विरोधात कारवाईचे हत्यार उगारणार की आपली तलवार म्यान करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.                       ठाणे शहरातील ज्या हॉटेल व्यावसायिंकाकडे फायरची एनओसी नसेल त्या सर्व व्यावसायिकांना महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक कायदा, २००६ तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ५३ मधील तरतूदीनुसार ७१ तासांच्या अवधीची नोटीस बजावली गेली आहे. परंतु ७२ तास उलटून गेल्यानंतरही अग्निशमन दलामार्फत नोटीसा बजावण्याचे काम सुरु आहे. बुधवार पर्यंत नोटीसा बजावल्या जाणार असून त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरविली जाईल, असे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे. मुबंईत कमला मिल येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने अग्नी सुरक्षा यंत्रणांची पूर्तता न करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांच्या बाबतीत कडक भूमिका अवलंबली आहे. सहा ते सात महिन्यांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत एनओसी नसलेल्या हॉटेल, पब आणि तळघरातील हॉटेलचा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यानंतर अग्निशमन विभागाने अशा हॉटेलवाल्यांना नोटीसा बजावल्या होत्या. परंतु तेव्हा या सर्वांकडून शुन्य प्रतिसाद मिळाला होता. आता पुन्हा मुंबईत घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागामार्फत नोटीसा बजावण्याचे काम सुरु झाले आहे. मुंबईत घडलेल्या घटनेनंतर आता ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत हॉटेलांना कागदपत्रे सादर करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली असून आजही ती कारवाई सुरुच आहे. मात्र महापालिकेच्या या आदेशाला हॉटेल मालकांनी गांभीर्याने घेतले नसून दोन दिवस उलटूनही एकाही हॉटेल वाल्याने कागदपत्रांची पुर्तता केलेली नाही.या संदर्भात अग्निशमन विभागाचे प्रमुख शशीकांत काळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की अद्यापही नोटीस बजावण्याची कारवाई सुरु आहे. बुधवार पर्यंत हॉटेलवाल्यांना वेळ देण्यात आला आहे. परंतु त्यानंतर नियमानुसार कारवाई केली जाईल असे संकेत त्यांनी दिले आहेत.मुंबईतील कमला मिल मध्ये घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने ठाण्यातील एनओसी नसलेल्या सुमारे ४०० हॉटेल्स आणि पबवाल्यांना कागदपत्रे सादर करण्याच्या नोटीस बजावल्या आहेत. परंतु अद्यापही एकानेही त्याला प्रतिसाद दिलेला नाही. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाfireआग