शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

कल्याण-उल्हासनगरात शिवथाळी, शिवभोजन केंद्रांची संख्या झाली १०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:22 AM

नागरिकांचा प्रतिसाद : शिवभोजन केंद्रांची संख्या झाली १०

पंकज रोडेकर

ठाणे : जिल्ह्यातील कल्याण आणि उल्हासनगर या दोन महापालिकांमधील नागरिकांनाही येत्या काही दिवसांत १० रुपयांमधील शिवथाळीचा आस्वाद चाखता येणार आहे. या दोन्ही महापालिकांतर्गत प्रत्येकी एक केंद्र सुरू करण्यासाठी संबंधित विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे. या दोन महापालिकांसह नवी मुंबई महापालिकेतील एका केंद्राला मंजुरी मिळाल्याने जिल्ह्यातील केंद्रांची संख्याही दहावर पोहोचली आहे. तसेच नव्याने सुरू होणारी केंदे्र संगणकाला जोडल्यानंतर त्या केंद्रांवर येत्या २० फेब्रुवारीपासून थाळीवाटप कार्यक्रम सुरू होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

राज्यात शिवभोजन योजनेंतर्गत प्रजासत्ताकदिनी १० रुपयांमध्ये शिवथाळीचा आस्वाद चाखण्यास सुरुवात झाली. ही थाळी प्रायोगिक तत्त्वावर महापालिका कार्यक्षेत्रात चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात एक हजार ३५० थाळ्यांपैकी ६७५ थाळ्यांसाठी कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या महापालिका सोडल्या, तर ठाणे, भिवंडी, मीरा-भार्इंदर आणि नवी मुंबई या महापालिकांतर्गत एक ूण सात केंद्रे सुरू झाली. यामध्ये ठामपांतर्गत तीन, मीरा-भार्इंदर आणि नवी मुंबई येथे प्रत्येकी एक आणि भिवंडीत दोन असा केंद्रांचा समावेश आहे. या योजनेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याने शिधावाटप विभागाने ठाणे जिल्ह्यातील काही केंद्रांवरील थाळ्यांची संख्या वाढवून दिली आहे.या केंद्रांनी अटी केल्या पूर्णउर्वरित ६७५ थाळ्या सुरू करण्यासाठी तितक्या केंद्रांची गरज असल्याची बाब डोळ्यांसमोर ठेवून शिधावाटप विभागाने शासनाच्या अटी आणि शर्तीनुसार केंद्र शोधण्यास सुरू केले होते. त्यानुसार, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली तसेच उल्हासनगर येथे प्रत्येकी एक कें द्र त्या अटीशर्ती पूर्ण करू शकले आहे. यामुळे संख्या १० वर गेली आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणshiv bhojnalayaशिवभोजनालय