शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

कल्याण स्थानक रात्री प्रवाशांसाठी घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 04:02 IST

गर्दुल्ले, भिकाऱ्यांना रान मोकळे, प्रवाशांची लूट, अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य

मुंबईकर बºयाचदा रात्रीच्यावेळी फिरण्यासाठी बाहेर पडतात. स्वत:च्या गाडीतून वरळी सीफेस, मरीन ड्राइव्ह येथे जातात. तिथे थंडगार हवेत गप्पांचा फड रंगतो. सोबत चणे, आइस्क्रीम किंवा वेफर्स असतात. तेथील मोकळ्या हवेत फेरफटका मारण्याचा आनंद मुंबईकर नेहमीच लुटतात. म्हणूनच, मुंबईची नाइट लाइफ ही वेगळी असते. तिचा अनुभव घेतलाच पाहिजे, असे मुंबईकर आवर्जून सांगतात. मुंबईकरांची नाइट लाइफ सुरक्षित असावी, यासाठी या भागांमध्ये कायम पोलीस बंदोबस्त असतो. हा परिसर उच्चभ्रू वर्गात मोडत असल्याने सर्वच यंत्रणांकडून तो सांभाळण्याची खबरदारी घेतली जाते. परिसरात घाण होऊ नये, म्हणून कचºयाचे डबे ठेवलेले असतात. याच्या अगदी विसंगत अनुभव कल्याणच्या नाइट लाइफमध्ये येतो. रात्रीच्यावेळी कल्याण शहरात खासकरून स्टेशन परिसरात तुम्ही आलात, तर तुमच्या नजरेस पडते ती अस्वच्छता, दुर्गंधी, गर्दुल्ले आणि भिकारी. येथील चित्र पाहिले की, क्षणभरही थांबू नये, असे वाटते.खरेतर, कल्याण जंक्शन असल्याने लांब पल्ल्यांच्या गाड्यांची, एसटी बसेसची सतत वर्दळ सुरू असते. अशावेळी या परिसराची सुरक्षितता फार महत्त्वाची आहे. मात्र, पोलिसांचे सुरक्षेकडे आणि केडीएमसीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने रात्रीचे कल्याण हे भिकारी, गर्दुल्ल्यांना आंदण दिले की काय, असा प्रश्न पडतो. थोडक्यात, या मंडळींचे कल्याण होते. सामान्यांसाठी मात्र ती डोकेदुखी ठरते.कल्याण स्थानकामध्ये सीसीटीव्ही लावले आहेत. मात्र, त्याचा उपयोग काय, हे कळत नाही. अनैतिक व्यवसाय, गर्दुल्ले, मद्यपी रेल्वेस्थानक परिसर आणि फलाटांवर ठाण मांडून बसलेले असतात. हे सगळे सीसीटीव्हीत कैद होऊनही रेल्वे पोलीस कानाडोळा करतात. त्यांच्यावर पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाकडून कारवाई केली जात नाही. उलटपक्षी, एकमेकांवर जबाबदारी ढकलून हात वर केले जातात. वास्तविक, रेल्वेस्थानक परिसरात सतत वर्दळ असते. प्रवासी सामान घेऊन येजा करत असतात. या प्रवाशांमध्ये महिला आणि मुलींसह लहान मुलांचाही समावेश असतो. अशा परिस्थितीत सुरक्षेसाठी पोलीस असणे गरजेचे आहे. मद्यपींकडून प्रवाशांना त्रास झाला, तर जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला. त्यामुळे रात्रीच्यावेळी कल्याण रेल्वेस्थानक किंवा परिसरातून जाताना कायम असुरक्षित वाटते. प्रवाशांना लुटण्याचे प्रकारही येथे झाले आहेत.रेल्वेस्थानकाच्या स्वच्छतेविषयी पाच वर्षांपूर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते. तेव्हा ६३ वा क्रमांक लागला होता. पाच वर्षांनंतर केलेल्या सर्वेक्षणात कल्याण स्थानकाची स्वच्छतेत घसरणच झाली आहे. आता ७४ वा क्रमांक आला आहे. क्वालिटी काउन्सिलच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. या अहवालावरून कल्याण रेल्वेस्थानकाच्या व्यवस्थापनाने धडा घेतलेला नाही. त्यामुळेच ही घसरण झाली आहे. याला कारणे अनेक आहेत. स्थानकाच्या स्वच्छतेवर लाखो रुपये खर्च केले जातात. त्याचे कंत्राट दिलेले आहे. या कंपनीचे कामगार नियमित स्वच्छता करत नाही. सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर झाल्यानंतर त्यादिवशी कल्याण स्थानकाची स्वच्छता करण्यात आली. दोनचार दिवसांनंतर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ या म्हणीचा प्रत्यय प्रवाशांना येतो.स्थानकात रात्रीच्यावेळी अनेक बेघर आश्रयाला येतात. मद्यपी, गर्दुल्ले आणि गुंगीच्या औषधांची नशा करणाºयांचा बाजार भरलेला असतो. विशेषत: फलाट क्रमांक-२ वर कॅन्टीनच्या बाजूलाच नशा करणाºयांचे टोळके बसलेले असते. त्यांच्याकडून प्रवाशांना त्रास दिला जातो. एखाद्या प्रवाशाने आवाज चढवला की, त्याचे बस्तान फलाट-१ वर हलवतात. ही मंडळी सकाळी आणि सायंकाळी फलाट-१ वरील सिग्नलच्या खाली बसून असतात. दारू पिणारे, भिकारी खाद्यपदार्थ तेथेच खातात. त्याचे कागद, डबे स्थानक परिसरातच फेकून देतात. काहीजण फलाटावरच घाण करतात. एका मद्यपीने फलाट-२ वरच लघुशंका केली. सीसीटीव्हीत हा सर्व प्रकार दिसला. मात्र, त्यांना हुसकावून लावण्याची गरज पोलीस किंवा सुरक्षा दलाला वाटली नाही. अनेकदा भिकाºयांची फलाटावर झोपण्यावरूनही भांडणे होतात. हे प्रकार साधारणत: रात्री १२ वाजता सुरू होतात. १२ नंतर अनेकजण फलाटाचा आसरा घेऊन ताणून देतात. त्यामुळे हे फलाट आहे की, विश्रामगृह, असा प्रश्न पडतो. 

टॅग्स :kalyanकल्याणrailwayरेल्वे