शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कल्याणमध्ये पाटील विरुद्ध शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 01:04 IST

राष्ट्रवादी काँग्रेससमोर अनेक आव्हाने : मनसेचीही भूमिका ठरणार महत्त्वाची

- प्रशांत माने कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेसने कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून ठाणे महापालिकेचे नगरसेवक व ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि माजी अध्यक्ष बाबाजी पाटील यांच्या नावाची घोषणा गुरुवारी केली. त्यामुळे या मतदारसंघात १६ वर्षांनंतर पाटील यांच्या रूपाने स्थानिक उमेदवाराला प्राधान्य मिळाले असून, शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याने या मतदारसंघात शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान, इच्छुक सात जणांमधून उमेदवारी मिळवलेल्या बाबाजी पाटील यांच्यासमोर विरोधी पक्षाच्या उमेदवारासह स्वत:च्या पक्षांतर्गत कलह आणि गटबाजीचे आव्हान असणार आहे.शिवसेनेकडून पुन्हा डॉ. श्रीकांत शिंदे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. परंतु, त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मागील निवडणुकीतील राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार आनंद परांजपे यांनी कल्याणमधून निवडणूक लढवण्यास नापसंती दर्शवली. त्यामुळे राष्ट्रवादीतर्फे कल्याण लोकसभेसाठी कोण उमेदवार असणार, याविषयी तर्कवितर्क लढवले जात होते. तुल्यबळ उमेदवार नसल्याने राष्ट्रवादी मनसेला सहकार्य करून त्यांच्या उमेदवाराच्या पाठीशी आपली ताकद उभी करेल, अशीही चर्चा सुरू होती. अखेर, राष्ट्रवादीने पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे आता मनसेच्या भूमिकेकडे लक्ष लागले असून ते कोणता निर्णय घेतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.पाटील हे प्रारंभी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार नव्हते. कल्याण ग्रामीणमधून विधानसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा विचार होता. परंतु, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘तुम्ही लोकसभा लढा, आम्ही तुमचा विचार विधानसभेसाठीही करू’, अशी ग्वाही दिल्याने त्यांनी लोकसभा लढवण्याची तयारी दर्शवल्याचे बोलले जात आहे. मात्र, पाटील यांना अशा प्रकारचे आश्वासन मिळाल्याने विधानसभेसाठी लोकसभा लढवण्यास इच्छुक नसलेल्यांच्याही आशा पल्लवित झाल्या होत्या. या इच्छुकांमध्ये पाटील यांनी बाजी मारल्याने या मतदारसंघात राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील विरूद्ध शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.आगरी समाजात समाधानाचे वातावरणकल्याणमधील पक्षाचे कार्यकर्ते व नेत्यांशी शरद पवार यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी आगरी समाजातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती.त्यावर समाजमान्य नेतृत्व असेल आणि निवडणूक लढवण्याची इच्छा असेल, तर त्याचा विचार केला जाईल, असे आश्वासन पवारांनी दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता पाटील यांना मिळालेल्या उमेदवारीने झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.आगरी समाजाचा उमेदवार पाटील यांच्या रूपाने मिळाला असला तरी कल्याण ग्रामीण, डोंबिवली ग्रामीण तसेच पश्चिमेकडील भाग, कल्याण पूर्व आणि अंबरनाथ वगळता या समाजाचा अन्यत्र प्रभाव दिसून येत नाही. आगरी समाजासह मतदारसंघात मराठा, ब्राह्मण, मुस्लिम आणि अन्य भाषिकांची एकगठ्ठा मते पाहता याठिकाणी जातीय समीकरणांनाही तितकेच महत्त्व आहे.१६ वर्षांनंतर स्थानिक उमेदवारास प्राधान्यशिवसेना असो अथवा राष्ट्रवादी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी १६ वर्षे लोकसभा क्षेत्राबाहेरील व्यक्तीलाच उमेदवार म्हणून प्राधान्य दिले आहे. दिवंगत प्रकाश परांजपे यांच्यासह आनंद परांजपे, वसंत डावखरे, डॉ. श्रीकांत शिंदे या बाहेरील व्यक्तींनी आजवर येथून निवडणूक लढवली आहे. परंतु, हॉटेल व्यावसायिक व नगरसेवक असलेल्या बाबाजी पाटील यांच्या रूपाने राष्ट्रवादीने कल्याण लोकसभा क्षेत्रात वास्तव्याला असलेल्या व्यक्तीला उमेदवारी देऊन स्थानिकाला प्राधान्य दिले आहे.

टॅग्स :kalyan-pcकल्याणkalyanकल्याणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShrikant Shindeश्रीकांत शिंदेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस