शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेसोबत युती होईल; भाजपा आमदाराचं भाकीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 11:07 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. यावेळी भाजपा-शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढविल्या होत्या.

कल्याण - मागील दोन महिन्यापासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षानंतर शिवसेना-भाजपा एकमेकांपासून दुरावले आहेत. तर भाजपा-मनसेची जवळीक वाढत असल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपा-मनसे युती होऊ शकते असं भाकीत कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी वर्तवलं आहे. 

याबाबत बोलताना गणपत गायकवाड म्हणाले की, एकमेकांना शिव्या देऊन जर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते तर आम्ही हिंदुत्ववादी लोकांच्या हितासाठी एकत्र येऊ शकतो असा टोला गणपत गायकवाड यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. टीव्ही ९ शी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. 

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. यावेळी भाजपा-शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढविल्या होत्या. या निवडणुकीत शिवसेनेला ५३, भाजपला ४३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, मनसे ९, बसपा १, एमआयएम १ आणि अपक्ष ९ असे नगरसेवक निवडून आले. मात्र, निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपाने युती करून सत्ता स्थापन केली. शिवसेनेला अपक्षांचा पाठिंबा असल्याने त्यांचे संख्याबळ ५७ आहे. मात्र राज्यातील सत्तास्थापनेनंतर अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरील राजकीय गणित बदललं आहे. 

दरम्यान, मुंबईत झालेल्या मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरेंनी प्रखर हिंदुत्ववादाची भूमिका घेतल्याने भाजपाकडून त्यांचे स्वागत करण्यात आलं, सीएए समर्थनासाठी राज ठाकरेंकडून येत्या ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंची बदलेली भूमिका भाजपाच्या फायद्याची ठरत असल्याने भविष्यात मनसे-भाजपा एकत्र येऊ शकतात अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. 

काय म्हणाले होते राज ठाकरे?देशाशी प्रामाणिक मुस्लिम आहेत ते आमचेच आहेत. एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर ह्यांना नाकारता येणार नाही असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केले होते. तसेच धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला? आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो व त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नसल्याचे सांगितले होते. तसेच समझोता एक्स्प्रेस बंद करण्याची मागणी देखील राज ठाकरेंनी यावेळी केली होती. देशात उभे राहिलेले मोहल्ल्यांचे उदाहरण देत उद्या जर युद्ध झाले तर सैन्याला बाहेरच्या नाही तर देशातल्या शत्रूंशीच लढावं लागेल असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले होते.

टॅग्स :MNSमनसेBJPभाजपाkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाHindutvaहिंदुत्वRaj Thackerayराज ठाकरे