शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 16:01 IST

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद

कल्याण: राज्यात लॉक डाऊन व संचार बंदी लागू असली तरी जीवनावश्यक वस्तूमध्ये भाजीपाला व अन्नधान्य येत असल्याने पणन खात्याच्या आदेशानुसार कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सचिव श्यामकांत चौधरी यांनी दिली आहे. बाजार समिती प्रशासनाने समिती सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी होलसेल व्यापारी वर्गाकडून व्यापाऱ्यांनी स्वत:ची काळजी स्वत:च घेत स्वत:च्या जोखमीवर व्यापार सुरु ठेवावा असे आवाहन केले आहे. मात्र व्यापाऱ्यांनी पूर्ण व्यापार बंद करु नये असे आवाहन समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे.नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आली आहे. त्यामुळे त्याठिकाणी रिकामी करण्यात येणाऱ्या शेतमालाच्या गाड्यांनी त्यांचा मोर्चा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत वळविला आहे. त्यामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत मालाची आवाक नियमित आहे. त्यात घट झालेली नाही असे सचिव चौधरी यांनी सांगितले. बाजार समितीत जवळपास दररोज आठ हजार क्वींटल माल येत आहे. त्यामुळे मालाचा तुटवडा नाही. बाजार समितीत शेतमाल व अन्नधान्य हे अत्यावश्यक असल्याने बाजार समिती बंद करु नये असे पणन खात्याकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान बाजार समितीमधील फूल बाजार व जनावरांचा बाजार 20 जानेवारीपासून बंद करण्यात आले आहे. फूल बाजारात दिवसाला एक कोटी रुपयांची उलाढाल होते. तर जनावरांच्या बाजारात दिवसाला 25 लाख रुपयांची उलाढाल होते. ही उलाढाल शुक्रवारपासून बंद आहे. त्याचा फटका जनावरांच्या मार्केटमधील व्यापारी व विक्रेत्यांना बसला आहे. बाजार समितीतील माथाडी कामगारांनी काम बंद करण्यासंदर्भात समिती प्रशासनाला कोणत्याही स्वरुपाचे पत्र दिलेले नाही. बाजार समितीत कोरोनामुळे मनुष्यबळ कमी आहे ही वस्तूस्थिती आहे. बाजार समितीचा सरकारी कर्मचारी वर्ग कमी प्रमाणात कामावर हजर आहे.होलसेल मार्केट व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व बाजार समितीचे संचालक बाबाजी पोखरकर यांनी सांगितले की, नवी मुंबई बाजार समिती बंद असल्याने त्याठिकाणचा माल याठिकाणी आला आहे. मात्र बाहेरच ग्राहक जास्त प्रमाणात दिसून येत आहे. कोरोनाच्या भितीपोटी बाहेरच्या ग्राहकाला रोखणे व्यापाऱ्यांना शक्य नाही. बाजारात त्यामुळे गर्दी वाढली आहे. होलसेल मालाला उठाव नाही. आवाक चांगली असली तरी उठाव नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाला त्यांच्या जोखीमेवर त्यांनी व्यापार करावा. त्यांची काळजी घ्यावी. दुकानावर गर्दी झाल्यास ती टाळण्याकरीता दुकान बंद ठेवणे उचित होईल. बरेचसे माथाडी कामगार हे गावाला निघून गेले आहे. त्यामुळे शेतमाल टेम्पो व ट्रकमधून खाली कोण करणार असा प्रश्न आहे.दरम्यान बाजार समितीचे सभापती कपील थळे यांनी सांगितले की, भाजीपाला व अन्नधान्य ही अत्यावश्यक बाब आहे. पणन खात्याच्या आदेशानुसार बाजार समिती सुरुच राहणार आहे. त्यामुळे भाजीपाला व अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल या भितीपोटी ग्राहकांनी गर्दी न करता खरेदी विक्री करावी असे आवाहन केले आहे. 

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती