शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 16:01 IST

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद

कल्याण: राज्यात लॉक डाऊन व संचार बंदी लागू असली तरी जीवनावश्यक वस्तूमध्ये भाजीपाला व अन्नधान्य येत असल्याने पणन खात्याच्या आदेशानुसार कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सचिव श्यामकांत चौधरी यांनी दिली आहे. बाजार समिती प्रशासनाने समिती सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी होलसेल व्यापारी वर्गाकडून व्यापाऱ्यांनी स्वत:ची काळजी स्वत:च घेत स्वत:च्या जोखमीवर व्यापार सुरु ठेवावा असे आवाहन केले आहे. मात्र व्यापाऱ्यांनी पूर्ण व्यापार बंद करु नये असे आवाहन समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे.नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आली आहे. त्यामुळे त्याठिकाणी रिकामी करण्यात येणाऱ्या शेतमालाच्या गाड्यांनी त्यांचा मोर्चा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत वळविला आहे. त्यामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत मालाची आवाक नियमित आहे. त्यात घट झालेली नाही असे सचिव चौधरी यांनी सांगितले. बाजार समितीत जवळपास दररोज आठ हजार क्वींटल माल येत आहे. त्यामुळे मालाचा तुटवडा नाही. बाजार समितीत शेतमाल व अन्नधान्य हे अत्यावश्यक असल्याने बाजार समिती बंद करु नये असे पणन खात्याकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान बाजार समितीमधील फूल बाजार व जनावरांचा बाजार 20 जानेवारीपासून बंद करण्यात आले आहे. फूल बाजारात दिवसाला एक कोटी रुपयांची उलाढाल होते. तर जनावरांच्या बाजारात दिवसाला 25 लाख रुपयांची उलाढाल होते. ही उलाढाल शुक्रवारपासून बंद आहे. त्याचा फटका जनावरांच्या मार्केटमधील व्यापारी व विक्रेत्यांना बसला आहे. बाजार समितीतील माथाडी कामगारांनी काम बंद करण्यासंदर्भात समिती प्रशासनाला कोणत्याही स्वरुपाचे पत्र दिलेले नाही. बाजार समितीत कोरोनामुळे मनुष्यबळ कमी आहे ही वस्तूस्थिती आहे. बाजार समितीचा सरकारी कर्मचारी वर्ग कमी प्रमाणात कामावर हजर आहे.होलसेल मार्केट व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व बाजार समितीचे संचालक बाबाजी पोखरकर यांनी सांगितले की, नवी मुंबई बाजार समिती बंद असल्याने त्याठिकाणचा माल याठिकाणी आला आहे. मात्र बाहेरच ग्राहक जास्त प्रमाणात दिसून येत आहे. कोरोनाच्या भितीपोटी बाहेरच्या ग्राहकाला रोखणे व्यापाऱ्यांना शक्य नाही. बाजारात त्यामुळे गर्दी वाढली आहे. होलसेल मालाला उठाव नाही. आवाक चांगली असली तरी उठाव नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाला त्यांच्या जोखीमेवर त्यांनी व्यापार करावा. त्यांची काळजी घ्यावी. दुकानावर गर्दी झाल्यास ती टाळण्याकरीता दुकान बंद ठेवणे उचित होईल. बरेचसे माथाडी कामगार हे गावाला निघून गेले आहे. त्यामुळे शेतमाल टेम्पो व ट्रकमधून खाली कोण करणार असा प्रश्न आहे.दरम्यान बाजार समितीचे सभापती कपील थळे यांनी सांगितले की, भाजीपाला व अन्नधान्य ही अत्यावश्यक बाब आहे. पणन खात्याच्या आदेशानुसार बाजार समिती सुरुच राहणार आहे. त्यामुळे भाजीपाला व अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल या भितीपोटी ग्राहकांनी गर्दी न करता खरेदी विक्री करावी असे आवाहन केले आहे. 

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती