शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

अवघ्या तीन महिन्यांतच विजय सिंघल यांची उचलबांगडी, राजकीय षडयंत्राचे बळी?

By अजित मांडके | Published: June 25, 2020 12:18 AM

राजकीय मंडळींचे न ऐकल्याने आणि प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी आणि महापालिकेतील प्रस्थापित अधिकारी यांच्यात असलेल्या वादामुळेच त्यांची उचलबांगडी झाल्याची माहिती समोर आली आहे.

- अजित मांडकेठाणे : एकीकडे संजीव जयस्वाल यांनी ठाणे महापालिकेत तब्बल ५ वर्षे आयुक्तपदाची धुरा सांभाळली असताना दुसरीकडे त्यांच्यानंतर आलेले विजय सिंघल यांची अवघ्या तीन महिने, तीन दिवसांत उचलबांगडी करण्यात आली. कोरोना रोखण्यात अपयश आल्याने त्यांची उचलबांगडी झाल्याच्या चर्चा आता शहरात जोर धरूलागल्या आहेत. परंतु, दुसरीकडे राजकीय मंडळींचे न ऐकल्याने आणि प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी आणि महापालिकेतील प्रस्थापित अधिकारी यांच्यात असलेल्या वादामुळेच त्यांची उचलबांगडी झाल्याची माहिती समोर आली आहे.ठाणे शहरात कोरोनाची सुरुवात झाली आणि विजय सिंघल यांची ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली. आल्या आल्या त्यांना पालिकेची आर्थिक घडी सावरण्याचे काम करावे लागणार होते. तर कोरोनाच्या मुकाबल्यासाठी त्यांना सिंघम व्हावे लागणार होते. त्यानुसार त्यांनी काही कठोर निर्णय घेण्याचा प्रयत्नही केला. आरोग्य विभागात महागड्या दरात सुरू असलेल्या साहित्य खरेदीला चपराक लावून महागडे प्रस्ताव आणण्यासही नकार दिला. तसेच आरोग्य विभागातील साहित्यांची खरेदी नव्याने करावी असेही सांगितले. यातूनच प्रस्थापित अधिकारी आणि प्रतिनियुक्तीवरील आयुक्तांमध्ये वादाची ठिणगी पडली. तर शहरातील काही बड्या राजकीय पुढाऱ्यांकडून आलेल्या वादग्रस्त प्रस्तावही त्यांनी रोखले होते. परंतु, दबाव आल्याने अखेर ते वादग्रस्त प्रस्ताव मंजूर करण्याची नामुष्कीही त्यांच्यावर ओढावली होती. आयुक्त विश्वासात घेत नाहीत, मनमानी कारभार करतात, ते काही कामाचे नाहीत, असे अनेक ठपके त्यांच्यावर जाता जात ठेवले आहेत.असे प्रकार सुरूअसतांनाही त्यांनी आपली साखळी तयार करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. यासाठी प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना हाताशी घेतले. तसेच आपल्या मर्जीतील एका अधिकाºयालादेखील वरिष्ठ पातळीवर दबाव टाकून ठाण्यात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आणले होते, अशीही चर्चा होती. तसेच इतर बड्या अधिकाºयांनादेखील आणून त्यांनी ठाण्यात बैठक घेऊन येथील प्रस्थापित अधिकाºयांना धक्का देण्याचा प्रयत्न केल्याचेही बोलले जात होते. यातूनच प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकारी आणि महापालिकेतील प्रस्थापित अधिकारी यांच्यात रोजच्या रोज काही ना काही तू तू मैं मैं सुरूहोती. त्यामुळे काही प्रस्थापित अधिकाºयांनी सिंघल यांच्या विरोधात मोर्चा उघडला होता. आधीच राजकीय मंडळींचे ऐकत नसल्याने ते अडचणीत होते, त्यात प्रतिनियुक्तवर आलेल्या अधिकाºयांना हाताशी घेऊन त्यांनी आपली साखळी तयार केली होती. त्यामुळेदेखील ते नावडते झाले होते. यामुळे राजकीय मंडळी आणि काही प्रस्थापित अधिकाºयांनी एकत्र येऊन त्यांची विकेट काढल्याचे बोलले जात आहे.>ठाणे समजून घेण्याआधीच विकेटनवनियुक्त आयुक्ताला महापालिकेची गणिते आणि आर्थिक परिस्थिती समजून घेण्यास दोन तीन महिन्यांचा कालावधी हा लागतोच. सिंघल यांची नियुक्ती झाली त्या वेळेस कोरोना वाढत होता, तसेच महापालिकेची विस्कटलेली घडी बसविण्यासाठीदेखील त्यांना प्रयत्न करायचे होते. शिवाय येथील राजकीय मंडळी कशी आहेत, त्यांच्याशी कसे मिळवून घ्यायचे यासाठीही कालावधी जाणार होता. परंतु, हे समजून घेण्याआधीच त्यांची विकेट पडली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे