शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

जोशी - बेडेकरचा 'क्रिसलिस ' ( chrysalis ) २०१९ या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 17:25 IST

जोशी - बेडेकर आयोजित आंतरमहाविद्यालयीन महोत्सवात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

ठळक मुद्देख्रिसलीस २०१९ या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे उद्घाटनEven if you win the rat race, You're still a Rat : शुभ्रअरविंद बिराबरविज्ञान,  वाणिज्य व प्रबंधन क्षेत्रात नैतिक मूल्यांची आत्यंतिक गरज : डॉ सुचित्रा नाईक

ठाणे : विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात ख्रिसलीस २०१९ या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे उद्घाटन झाले. ख्रिसलीस म्हणजे कोशात असलेला सुरवंट ज्याचं फुलपाखरात रूपांतर होते. साध्या किड्यापासून फुलपाखरात संक्रमणाचा हा उपयुक्त कालखंड. या महोत्सवात मुंबई व ठाण्यातील बहुसंख्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यासक शुभ्रअरविंद बिराबर उपस्थित होते. 

      व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक, ख्रिसलीस समन्वयक डॉ संगीता दास, उप समन्वयक तृप्ती कौतिकवार उपस्थित होत्या. या वर्षीचा ख्रिसलीस महोत्सव शाश्वत विकास (sustainable development) या विषयावर समायोजित करण्यात आला. डॉ संगीता दास यांनी ख्रिसलीस महोत्सवाची एकूणच संकल्पना विशद केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक आपल्या भाषणात म्हणाल्या की, शाश्वत विकास हा मानवी संवेदनांचा व भावनांचा एकात्मिक परिपाक असतो. व्यक्तीला विकासाच्या वाटेवर मानवी मूल्यांची अत्यंत गरज आहे.  जो स्वतःच्या व्यक्तीमत्वात समतोल राखतो तोच चांगला व्यवस्थापक (Manager) होऊ शकतो. विज्ञान,  वाणिज्य व प्रबंधन क्षेत्रात नैतिक मूल्यांची आत्यंतिक गरज आहे असं डॉ नाईक म्हणाल्या. अतिथी  शुभ्रअरविंद बिराबर म्हणाले कि आपण सर्वजण प्राणांतिक स्पर्धेच्या युगात वावरत आहोत. ते म्हणाले की, " Even if you win the rat race, You're still a Rat". स्पर्धा व यशाच्या मागे लागलेल्या आपणा सर्वांना आनंद व सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. हॅपिनेस इंडेक्स मध्ये भारत पाकिस्तान व भूतान या देशांच्याही खाली आहे. ज्या प्रमाणे एखादं फुल उमलत तेंव्हा त्याचा सुगंध आपसूकच यायला लागतो, फुलाला आपल्या सुगंधाची जाहिरात करावी लागत नाही. त्याप्रमाणे यशस्वी व्यक्ती होण्यासाठी स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणावा लागेल तेंव्हाच त्याच्या कीर्तीचा सुगंध येईल.  व्यक्तीच्या विकासात त्याचा अध्यात्मिक विकास होणे फार महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन शुभ्र अरविंद यांनी केले. क्रिसलिस २०१९ ची  "शाश्वत" (SHASHWAT ) ही संकल्पना घेऊन प्रथम १९ ऑगस्ट २०१९ रोजी सामुदायिक स्वच्छता मोहिमेने,त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी स्टार्टअप इव्हेंट आणि युटूबर्स चर्चासत्र आणि २२ ऑगस्ट रोजी डॉ.संजय मंगला गोपाळ यांचे व्याख्यान यांनी सुरुवात झाली. सुभ्ररा बिंदा बिरारर,संधू लोगीपार्क ग्रुप चे सीईओ यांच्या हस्ते २३ ऑगस्ट २०१९ रोजी औपचारिक उद्घाटन करण्यात आले. प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक मॅडम यांचे शुभाशिर्वाद या कार्यक्रमाला मिळाले. उद्घाटनानंतर विविध क्षेत्रातील नामवंत वक्त्यांच्या उपस्थितीत "शाश्वततेचे विविध आधारस्तंभ" या विषयावर  पॅनेल चर्चा करण्यात आली. त्यानंतर व्यवस्थापन व मीडिया विभागाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या. एकूण ४५ महाविद्यालयांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला व प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक आणि उपप्राचार्या प्रा.प्रियंवदा टोकेकर यांच्या हस्ते शेवटी सी.एच.एम महाविद्यालयाला फिरता चषक प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम सर्व प्रशासकीय कर्मचार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यापन, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला. संपूर्ण कार्यक्रम, समन्वयक डॉ.संगिता एस मोहंती आणि सह-समन्वयक तृप्ती कौतिकवार यांच्या सह्कार्याखाली संपन्न झाला. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcollegeमहाविद्यालय