शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

जोशी - बेडेकरचा 'क्रिसलिस ' ( chrysalis ) २०१९ या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 17:25 IST

जोशी - बेडेकर आयोजित आंतरमहाविद्यालयीन महोत्सवात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

ठळक मुद्देख्रिसलीस २०१९ या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे उद्घाटनEven if you win the rat race, You're still a Rat : शुभ्रअरविंद बिराबरविज्ञान,  वाणिज्य व प्रबंधन क्षेत्रात नैतिक मूल्यांची आत्यंतिक गरज : डॉ सुचित्रा नाईक

ठाणे : विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात ख्रिसलीस २०१९ या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे उद्घाटन झाले. ख्रिसलीस म्हणजे कोशात असलेला सुरवंट ज्याचं फुलपाखरात रूपांतर होते. साध्या किड्यापासून फुलपाखरात संक्रमणाचा हा उपयुक्त कालखंड. या महोत्सवात मुंबई व ठाण्यातील बहुसंख्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यासक शुभ्रअरविंद बिराबर उपस्थित होते. 

      व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक, ख्रिसलीस समन्वयक डॉ संगीता दास, उप समन्वयक तृप्ती कौतिकवार उपस्थित होत्या. या वर्षीचा ख्रिसलीस महोत्सव शाश्वत विकास (sustainable development) या विषयावर समायोजित करण्यात आला. डॉ संगीता दास यांनी ख्रिसलीस महोत्सवाची एकूणच संकल्पना विशद केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक आपल्या भाषणात म्हणाल्या की, शाश्वत विकास हा मानवी संवेदनांचा व भावनांचा एकात्मिक परिपाक असतो. व्यक्तीला विकासाच्या वाटेवर मानवी मूल्यांची अत्यंत गरज आहे.  जो स्वतःच्या व्यक्तीमत्वात समतोल राखतो तोच चांगला व्यवस्थापक (Manager) होऊ शकतो. विज्ञान,  वाणिज्य व प्रबंधन क्षेत्रात नैतिक मूल्यांची आत्यंतिक गरज आहे असं डॉ नाईक म्हणाल्या. अतिथी  शुभ्रअरविंद बिराबर म्हणाले कि आपण सर्वजण प्राणांतिक स्पर्धेच्या युगात वावरत आहोत. ते म्हणाले की, " Even if you win the rat race, You're still a Rat". स्पर्धा व यशाच्या मागे लागलेल्या आपणा सर्वांना आनंद व सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. हॅपिनेस इंडेक्स मध्ये भारत पाकिस्तान व भूतान या देशांच्याही खाली आहे. ज्या प्रमाणे एखादं फुल उमलत तेंव्हा त्याचा सुगंध आपसूकच यायला लागतो, फुलाला आपल्या सुगंधाची जाहिरात करावी लागत नाही. त्याप्रमाणे यशस्वी व्यक्ती होण्यासाठी स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणावा लागेल तेंव्हाच त्याच्या कीर्तीचा सुगंध येईल.  व्यक्तीच्या विकासात त्याचा अध्यात्मिक विकास होणे फार महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन शुभ्र अरविंद यांनी केले. क्रिसलिस २०१९ ची  "शाश्वत" (SHASHWAT ) ही संकल्पना घेऊन प्रथम १९ ऑगस्ट २०१९ रोजी सामुदायिक स्वच्छता मोहिमेने,त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी स्टार्टअप इव्हेंट आणि युटूबर्स चर्चासत्र आणि २२ ऑगस्ट रोजी डॉ.संजय मंगला गोपाळ यांचे व्याख्यान यांनी सुरुवात झाली. सुभ्ररा बिंदा बिरारर,संधू लोगीपार्क ग्रुप चे सीईओ यांच्या हस्ते २३ ऑगस्ट २०१९ रोजी औपचारिक उद्घाटन करण्यात आले. प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक मॅडम यांचे शुभाशिर्वाद या कार्यक्रमाला मिळाले. उद्घाटनानंतर विविध क्षेत्रातील नामवंत वक्त्यांच्या उपस्थितीत "शाश्वततेचे विविध आधारस्तंभ" या विषयावर  पॅनेल चर्चा करण्यात आली. त्यानंतर व्यवस्थापन व मीडिया विभागाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या. एकूण ४५ महाविद्यालयांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला व प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक आणि उपप्राचार्या प्रा.प्रियंवदा टोकेकर यांच्या हस्ते शेवटी सी.एच.एम महाविद्यालयाला फिरता चषक प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम सर्व प्रशासकीय कर्मचार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यापन, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला. संपूर्ण कार्यक्रम, समन्वयक डॉ.संगिता एस मोहंती आणि सह-समन्वयक तृप्ती कौतिकवार यांच्या सह्कार्याखाली संपन्न झाला. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcollegeमहाविद्यालय