शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

जितेंद्र आव्हाडांचे माजी अंगरक्षक कदम यांची आत्महत्या; आरोपी नसल्याचे ठेवले स्टेटस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 10:07 IST

चौकशीचा ससेमिरा पुन्हा मागे लागल्यामुळे ते तणावाखाली असल्याचे बोलले जाते.

ठाणे : आमदार जितेंद्र आव्हाड यांचे तत्कालीन अंगरक्षक पोलिस हवालदार वैभव कदम यांनी निळजे ते तळोजा दरम्यान रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ९  वाजता घडली. अभियंता अनंत करमुसे प्रकरणात ठाणे पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू होती. आता या आत्महत्या प्रकरणाचा ठाणे रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू झाला आहे. कदम यांच्या आत्महत्येमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके  कारण स्पष्ट झाले नाही. 

मुंबई पोलिसांच्या विशेष सुरक्षा दलात (एसपीयू) नेमणूक झालेले कदम यांचा आव्हाड यांच्या ठाण्यातील ‘नाद’ बंगल्यावर करमुसे यांना झालेल्या मारहाण प्रकरणात आरोपी म्हणून समावेश होता. या प्रकरणात अटकेनंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती. गेल्या काही दिवसांपासून ठाणे पोलिसांकडून पुन्हा त्यांची चौकशी करण्यात येत होती. चौकशीचा ससेमिरा पुन्हा मागे लागल्यामुळे ते तणावाखाली असल्याचे बोलले जाते.

बुधवारी सकाळी दिवा ते रोहा जाणाऱ्या मेमू  रेल्वेखाली निळजे ते तळोजादरम्यान त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांना तातडीने दिवा येथील बालाजी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्याकडे मोबाईल आणि काही पैसे आढळल्याचे ठाणे रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले. वैभव यांच्या मागे पत्नी, आई, वडील, भाऊ आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या मृतदेहाचे ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या  रायगड जिल्ह्यातील धारणा कॅम्प येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. वैभव यांच्या निधनाने चांगला कबड्डीपटू गमावल्याची भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली.

आरोपी नसल्याचे ठेवले स्टेट्स

वैभव यांनी मृत्यूपूर्वी आपल्या मोबाईलवर स्टेट्स ठेवले आहे. यामध्ये ‘मी खरंच चांगला नवरा, बाप, मुलगा आणि भाऊ होऊ शकलो नाही. साक्षी,  स्वर मला माफ कर. आई, पप्पा मला माफ करा. एका घटनेमुळे माझ्या आयुष्याची वाट लागली. पण यामध्ये कोणाचा दोष नाही. मी डिप्रेशनमुळे हा निर्णय घेत आहे.’ शेवटी ‘आपण आरोपी नाही, असे त्यांनी  पोलिस आणि मीडियाला उल्लेखून म्हटले आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडPoliceपोलिस