शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

जितेंद्र आव्हाडांचे माजी अंगरक्षक कदम यांची आत्महत्या; आरोपी नसल्याचे ठेवले स्टेटस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 10:07 IST

चौकशीचा ससेमिरा पुन्हा मागे लागल्यामुळे ते तणावाखाली असल्याचे बोलले जाते.

ठाणे : आमदार जितेंद्र आव्हाड यांचे तत्कालीन अंगरक्षक पोलिस हवालदार वैभव कदम यांनी निळजे ते तळोजा दरम्यान रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ९  वाजता घडली. अभियंता अनंत करमुसे प्रकरणात ठाणे पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू होती. आता या आत्महत्या प्रकरणाचा ठाणे रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू झाला आहे. कदम यांच्या आत्महत्येमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके  कारण स्पष्ट झाले नाही. 

मुंबई पोलिसांच्या विशेष सुरक्षा दलात (एसपीयू) नेमणूक झालेले कदम यांचा आव्हाड यांच्या ठाण्यातील ‘नाद’ बंगल्यावर करमुसे यांना झालेल्या मारहाण प्रकरणात आरोपी म्हणून समावेश होता. या प्रकरणात अटकेनंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती. गेल्या काही दिवसांपासून ठाणे पोलिसांकडून पुन्हा त्यांची चौकशी करण्यात येत होती. चौकशीचा ससेमिरा पुन्हा मागे लागल्यामुळे ते तणावाखाली असल्याचे बोलले जाते.

बुधवारी सकाळी दिवा ते रोहा जाणाऱ्या मेमू  रेल्वेखाली निळजे ते तळोजादरम्यान त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांना तातडीने दिवा येथील बालाजी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्याकडे मोबाईल आणि काही पैसे आढळल्याचे ठाणे रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले. वैभव यांच्या मागे पत्नी, आई, वडील, भाऊ आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या मृतदेहाचे ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या  रायगड जिल्ह्यातील धारणा कॅम्प येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. वैभव यांच्या निधनाने चांगला कबड्डीपटू गमावल्याची भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली.

आरोपी नसल्याचे ठेवले स्टेट्स

वैभव यांनी मृत्यूपूर्वी आपल्या मोबाईलवर स्टेट्स ठेवले आहे. यामध्ये ‘मी खरंच चांगला नवरा, बाप, मुलगा आणि भाऊ होऊ शकलो नाही. साक्षी,  स्वर मला माफ कर. आई, पप्पा मला माफ करा. एका घटनेमुळे माझ्या आयुष्याची वाट लागली. पण यामध्ये कोणाचा दोष नाही. मी डिप्रेशनमुळे हा निर्णय घेत आहे.’ शेवटी ‘आपण आरोपी नाही, असे त्यांनी  पोलिस आणि मीडियाला उल्लेखून म्हटले आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडPoliceपोलिस