शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 16:28 IST

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Jitendra Awhad ( Marathi News ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार येथील जाहीर सभेतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "मला नरेंद्र मोदी यांचे दोन शब्द सर्वाधिक खटकले. ते म्हणाले की शरद पवार हताश आणि निराश झाले आहेत. ८४ वर्षांचा योद्धा हताश आणि निराश होऊ शकत नाही. आजही ज्या उत्साहाने ते अग्रेसर भूमिका घेऊन पुढे जात आहेत आणि  त्यांनी जे काही दौरे केले आहेत, त्यामध्ये शरद पवार हताश आहेत असं म्हणणे म्हणजे तुम्ही शरद पवार यांना ओळखलंच नाही," असं आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एनडीएसोबत येण्याचीही ऑफर दिली. मोदींच्या या ऑफरवर पलटवार करताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, "शरद पवार यांचे त्यांच्या विचारधारेवर प्रेम आहे. काँग्रेस ही एक गांधी आणि नेहरूंची विचारधारा आहे. ज्या विचारधारेसाठी त्यांनी स्वतःचं घर तुटताना पाहिलं, त्यांना यायचं असतं तर कधीच आले असते. त्यांना अजितदादांची काय गरज? ते थेट तुमच्याकडे आले असते," अशा शब्दांत आव्हाड यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

"नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि पक्षा-पक्षांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी केलं आहे. तुम्ही तुमच्या जेष्ठ नेत्यांचा सन्मान कसा करतात हे संपूर्ण भारताने पाहिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी देखील देशातील सर्वात ज्येष्ठ नेता असा उल्लेख शरद पवारांचा केला आहे. या पक्षाचे मालकच शरद पवार आहेत जो पक्ष यांनी चोरून आणि पळवून नेलेला आहे," असा हल्लाबोलही जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

रवींद्र वायकरांच्या वक्तव्याचाही समाचार

माझ्याकडे तुरुंगात जाणे किंवा पक्षांतर करणे, असे दोनच पर्याय होते, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे लोकसभा उमेदवार रवींद्र वायकर यांनी केला आहे. यावर बोलताना आव्हाड म्हणाले की, "रवींद्र वायकर यांनी केलेलं वक्तव्य अतिशय बोलकं आणि सर्वांना सावध करणारं आहे. मी रवींद्र वायकर यांचं अभिनंदन करतो की त्यांनी महाराष्ट्राला सत्य परिस्थिती सांगितली, जी इतर कोणी सांगितली नाही. सगळेजण पक्ष सोडून गेले ते याच कारणासाठी, पण रवींद्र वायकर यांनी सत्य सांगून टाकलं ," असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४