शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 16:28 IST

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Jitendra Awhad ( Marathi News ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार येथील जाहीर सभेतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "मला नरेंद्र मोदी यांचे दोन शब्द सर्वाधिक खटकले. ते म्हणाले की शरद पवार हताश आणि निराश झाले आहेत. ८४ वर्षांचा योद्धा हताश आणि निराश होऊ शकत नाही. आजही ज्या उत्साहाने ते अग्रेसर भूमिका घेऊन पुढे जात आहेत आणि  त्यांनी जे काही दौरे केले आहेत, त्यामध्ये शरद पवार हताश आहेत असं म्हणणे म्हणजे तुम्ही शरद पवार यांना ओळखलंच नाही," असं आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एनडीएसोबत येण्याचीही ऑफर दिली. मोदींच्या या ऑफरवर पलटवार करताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, "शरद पवार यांचे त्यांच्या विचारधारेवर प्रेम आहे. काँग्रेस ही एक गांधी आणि नेहरूंची विचारधारा आहे. ज्या विचारधारेसाठी त्यांनी स्वतःचं घर तुटताना पाहिलं, त्यांना यायचं असतं तर कधीच आले असते. त्यांना अजितदादांची काय गरज? ते थेट तुमच्याकडे आले असते," अशा शब्दांत आव्हाड यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

"नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि पक्षा-पक्षांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी केलं आहे. तुम्ही तुमच्या जेष्ठ नेत्यांचा सन्मान कसा करतात हे संपूर्ण भारताने पाहिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी देखील देशातील सर्वात ज्येष्ठ नेता असा उल्लेख शरद पवारांचा केला आहे. या पक्षाचे मालकच शरद पवार आहेत जो पक्ष यांनी चोरून आणि पळवून नेलेला आहे," असा हल्लाबोलही जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

रवींद्र वायकरांच्या वक्तव्याचाही समाचार

माझ्याकडे तुरुंगात जाणे किंवा पक्षांतर करणे, असे दोनच पर्याय होते, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे लोकसभा उमेदवार रवींद्र वायकर यांनी केला आहे. यावर बोलताना आव्हाड म्हणाले की, "रवींद्र वायकर यांनी केलेलं वक्तव्य अतिशय बोलकं आणि सर्वांना सावध करणारं आहे. मी रवींद्र वायकर यांचं अभिनंदन करतो की त्यांनी महाराष्ट्राला सत्य परिस्थिती सांगितली, जी इतर कोणी सांगितली नाही. सगळेजण पक्ष सोडून गेले ते याच कारणासाठी, पण रवींद्र वायकर यांनी सत्य सांगून टाकलं ," असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४