शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

जवानाची आई संगीता नरोटे यांची एकाकी झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 02:52 IST

सीमेवर लढणारे भारतीय जवान सागर पाटील यांची आई संगीता नरोटे-पाटील यांची मागासवर्गीयांच्या भरतीमध्ये सहा वर्षांपूर्वी बालवाडी मदतनीस या पदाकरिता निवड होऊनही भ्रष्टाचारामुळे निवड झाली नाही.

भिवंडी : सीमेवर लढणारे भारतीय जवान सागर पाटील यांची आई संगीता नरोटे-पाटील यांची मागासवर्गीयांच्या भरतीमध्ये सहा वर्षांपूर्वी बालवाडी मदतनीस या पदाकरिता निवड होऊनही भ्रष्टाचारामुळे निवड झाली नाही. राज्य सरकार, लोकायुक्त यांचे दरवाजे ठोठावूनही दाद मिळत नसल्याने संगीता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे पत्राद्वारे आपली कैफियत मांडली आहे.देशाच्या सीमेचे तळहातावर शिर घेऊन रक्षण करणाऱ्या सागर पाटील या भिवंडीतील जवानाची आई संगीता नरोटे यांनी महापालिकेच्या २०१२ मधील मागासवर्गीय अनुशेष भरण्याकरिता ७४ पदांसाठी सरळसेवा भरतीमध्ये बालवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज केला होता. मात्र, या भरतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊन नरोटे यांना पात्र असूनही अधिकाºयांनी डावलले. त्यामुळे नरोटे यांनी सर्व पुराव्यांनिशी राज्याच्या लोकायुक्तांकडे तक्रार केली व भरतीमधील भ्रष्टाचार उघडकीस आणला. उपलोकायुक्तांनी या भ्रष्टाचाराच्या चौकशीकरिता केडीएमसीचे तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांची नियुक्ती केली. त्यांनी भरतीमध्ये अधिकाºयांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा अहवाल लोकायुक्तांना सादर केला. त्या अहवालाची दखल घेऊन उपलोकायुक्तांनी ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचे निर्देश शासनाला दिले.त्यानुसार, शासनाचे अवर सचिव अजित कवडे यांनी १ डिसेंबर २०१६ रोजी महापालिका आयुक्तांना या प्रकरणातील जबाबदार अधिकारी व कर्मचाºयांवर जबाबदारी निश्चित केली. त्यांची विभागीय चौकशी करावी तसेच तीन महिन्यांत कारवाई करून तसा अहवाल शासनास सादर करावा, असे लेखी आदेश आयुक्तांना दिले. त्याचप्रमाणे लोकायुक्त कार्यालयाने मागासवर्गीय कर्मचारी सरळसेवा भरतीमधील भ्रष्टाचाराची खातेनिहाय चौकशी करून भरती रद्द करण्याचे आदेश दिले. दोन्ही कार्यालयांकडून आदेश मिळाल्यानंतर तत्कालीन आयुक्त योगेश म्हसे यांनी उपायुक्त विनोद शिंगटे यांना संबंधितांवर कारवाई करण्यास सांगितले. मात्र, पालिकेतील कनिष्ठ अधिकाºयांनी या आदेशाबाबत गोपनीयतेचा भंग केल्याने कर्मचाºयांनी कोर्टात धाव घेतली. भरती रद्द न झाल्याने हे कर्मचारी नियमित पगार घेत आहेत. गेल्या सात वर्षांपासून नरोटे यांचा भ्रष्टाचाराविरोधात लढा सुरू आहे. खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवणाºयांवर फौजदारी कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.कारवाई शून्यनरोटे यांनी अलीकडेच राज्य शासनाला पत्र लिहून आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर ११ सप्टेंबर १७ रोजी शासनाचे अवर सचिव अजित कवडे यांनी मनपा आयुक्तांना नियमानुसार कारवाई करण्याच्या लेखी सूचना दिल्या. परंतु, १० महिने उलटून गेले, तरी पालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही.

टॅग्स :Soldierसैनिकnewsबातम्या