शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

जेसलपार्क खाडीकिनारा परदेशी पाहुण्यांनी बहरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:05 IST

भार्इंदरमध्ये सीगलचे थवे : जानेवारीपर्यंत राहणार मुक्काम, पक्ष्यांना देताहेत तेलकट खाद्यपदार्थ

- धीरज परब

मीरा रोड : भार्इंदरच्या जेसलपार्क येथील वसई खाडीकिनारा सध्या परदेशी पाहुण्यांनी बहरून गेला आहे. काळ्या डोक्याचे पांढरे शुभ्र सीगल (कुरव- मराठी नाव) या परदेशी पक्ष्यांचे थवे किनाऱ्यावर किलबिलाट करताना पाहायला मिळत आहेत.

महापालिका व लोकप्रतिनिधींच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात कांदळवने, सीआरझेडमध्ये बेकायदा केलेला कचरा-मातीचा भराव आणि विविध बांधकामे करून पर्यावरणाचा ºहास केल्याने वसई खाडीचा जेसलपार्कचा किनारा वादग्रस्त ठरला आहे. पालिकेने खाडी व कांदळवनात बेकायदा सांडपाणी सोडले असून रोज विविध प्रकारचा कचरा, निर्माल्य टाकून प्रदूषणात भर पाडली जात आहे.पर्यावरणाचा ºहास केल्याबद्दल पालिका अधिकारी, ठेकेदारांवर शासनानेच गुन्हे दाखल केले असून लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करण्याच्या तक्रारी अजून प्रलंबित आहेत. जेसलपार्क येथील वसईचा हा खाडीकिनारा पर्यावरण व जलजीवसृष्टीसाठी संवेदनशील असल्याची ओरड जागरूक नागरिक सातत्याने करतात. काही दिवसांपूर्वीच जेसलपार्क येथील कोळीवाड्याजवळ सात फुटांचा डॉल्फीन खाडीत आला होता. पण, प्रदूषणामुळे त्याचा जीव गेला.

दरम्यान, जेसलपार्कचा खाडीकिनारा सध्या सीगल अर्थात कुरव या समुद्री पक्ष्यांनी गजबजून गेला आहे. काळ्या डोक्याचे हे सीगल खाडीच्या पाण्यात आपले भक्ष्य टिपण्यासाठी झेपावताना दिसतात. सीगलचा थवा पाहिला की, किनाºयावरील चिखलात जणू पिंजलेला कापूस वा पांढºया ठिपक्यांची रांगोळीच काढल्याचा भास होतो. त्यांचा किलबिलाट आणि त्यांचे सौंदर्य सर्वसामान्यांना भुरळ घालणारे आहे.

युरोपीय व आशियाई देशांतून आलेले हे पाहुणे थंडीच्या मोसमात येथे दाखल होतात. यंदा ते आॅक्टोबरच्या अखेरपासून हळूहळू येण्यास सुरुवात झाली. हे सीगल येथे मिळणारा आहार व वातावरणानुसार जानेवारीपर्यंत वा त्यानंतरसुद्धा काही काळ थांबतात.दरवर्षी येणाºया या परदेशी पाहुण्यांबद्दल स्थानिकांनासुद्धा फारशी माहिती नाही. त्यामुळे ते त्यांना गाठिया, फरसाण, शिळ्या चपात्या आदी खाण्यास टाकतात. खाडीत मासळी आधीच नगण्य झाली असून खाडीकिनारा स्वच्छ ठेवण्यासह येथील सांडपाण्याचे प्रदूषण रोखणे ही काळाची गरज बनली आहे. किनाºयावरील चिखलात न्युटी माशांची वाढ तसेच खाडीतील विविध माशांची वाढ होण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रयत्न होणे ही काळाची गरज असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.