शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

दुर्गंधीमुळे क्षणभरही उभे राहणे मुश्कील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 2:23 AM

अस्वच्छ कल्याण स्थानक : अडीच लाख प्रवाशांकरिता केवळ तीन स्वच्छतागृहे

डोंबिवली : कल्याण रेल्वेस्थानकात पाऊल ठेवताच रेल्वेमार्गातील विष्ठा, कचरा यामुळे येणाऱ्या दुर्गंधीमुळे प्रवाशांना तेथे क्षणभरही उभे राहावेसे वाटत नाही. मोठमोठ्या घुशी रेल्वेमार्ग, फलाटावर वावरत असतात. कोपरे, भिंती यावर पान, तंबाखू खाऊन पिचकाºया मारलेल्या असतात. लांब पल्ल्यांच्या दररोज अडीचशे गाड्यांची होणारी वाहतूक, तर कर्जत-कसाºयाकडे जाणाºया उपनगरीय लोकलच्या ८०० फेºया यामुळे दिवसभर या स्थानकात कमालीची गर्दी असते. रात्रीच्यावेळी या स्थानकाचा ताबा भिकारी, गर्दुल्ले, भटके कुत्रे घेतात. त्यामुळे देशभरातील सर्वाधिक घाणेरड्या रेल्वेस्थानकांच्या यादीत कल्याणचा लागलेला तिसरा क्रमांक ही आश्चर्याची नव्हे तर खेदाचीच बाब आहे.कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक ४ ते ६ या ठिकाणी मुख्यत्वे बाहेरगावाकडे जाणाºया व येणाºया गाड्या थांबतात. या फलाटांवर प्रचंड गर्दी व घाण असल्याने दुर्गंधी येते. त्या तुलनेत अन्य तीन फलाटांची स्थिती बरी आहे. स्थानकात सर्वत्र माश्या घोंघावत असतात. त्यामुळे येथील फलाटांवरील खाद्यपदार्थ सोडाच, पण पाणीदेखील प्यावेसे वाटत नाही. दिवसाकाठी किमान अडीच लाख प्रवाशांचा वावर या स्थानकात असतो. बाहेरगावच्या गाड्यांंमधून लाखोंच्या संख्येने येणारे लोंढे कल्याणमध्ये उतरतात व येथूनच एकतर अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, टिटवाळा वगैरे स्थानकांच्या दिशेने किंवा दिवा-मुंब्रा स्थानकांकडे जातात. बाहेरगावाकडील गाड्या उशिरा येतात किंवा सुटतात. त्यामुळे बºयाचदा अन्य ठिकाणांहून आलेली कुटुंबे येथेच आपल्यासोबत आणलेले अन्न खातात. उरलेले तेथेच फेकून देतात. लहान मुलांना स्थानकावरच नैसर्गिक विधीकरिता बसवतात. स्थानकातच पथारी पसरून झोपतात.प्रवाशांसाठी एसी डॉरमेटरीची सुविधा असली, तरी त्यात अवघे ५० ते ७० प्रवासीच थांबू शकतात. लांब पल्ल्यांच्या गाड्या फलाट क्र. ४ ते ६ वरून सुटतात. पण, ही डॉरमेटरीची सुविधा फलाट १ वर असल्याने प्रवासी येथवर येणे टाळतात.स्थानकात सकाळी, सायंकाळी पाऊल ठेवायला जागा नसते, तर सफाई काय करणार? केवळ तीन स्वच्छतागृहे असून अडीच लाख प्रवाशांसाठी ती अपुरी आहेत. या शौचालयांमध्ये सुविधांची बोंबाबोंब आहे. तेथे नैसर्गिक विधी करण्याकरिता पैसे घेतले जातात. मात्र, स्वच्छता ठेवली जात नाही. अनेक शौचालयांत पाण्याचीही धड सोय नाही. रात्री गर्दुल्ल्यांनी शौचालयांचा ताबा घेतलेला असल्याने प्रवासी तेथे जाण्याचे टाळतात. जागा मिळेल तेथे आडोसा पाहून नैसर्गिक विधी करतात.धक्कादायक बाब म्हणजे महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही. त्यामुळे त्यांची कुचंबणा होते. ‘प्लास्टिकमुक्त महाराष्ट्र’ अशी हाक राज्य सरकारने दिलेली असली, तरी या स्थानकात पाणी, शीतपेये यांच्या बाटल्या, वेफर्स व खाद्यपदार्थांची पाकिटे अस्ताव्यस्त पडलेली असतात. कचरावेचक मुले, महिला रेल्वेमार्गात उतरून किंवा फलाटावर फिरून ते कचरा गोळा करत असतात. स्थानकात तीन पादचारी पूल असून ते पुरेसे नाहीत. कल्याण दिशेकडील पूल अरुंद आहे, तसेच मुंबई दिशेकडील पूल जुना झाल्याने त्याला डागडुजीची गरज आहे. मधला नवा एकमेव पूल सुस्थितीत आहे. वर्षानुवर्षे स्थानकाचा विस्तार झालेला नाही. वाणिज्य विभागाच्या माहितीनुसार, या स्थानकातून दिवसाला एक लाख तिकिटांची विक्री होते. त्यातून दररोज ७० लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र, त्या तुलनेत स्थानकातील सुविधांवर रेल्वे पैसे खर्च करत नाही. त्याचा परिणाम अस्वच्छतेत दिसून येतो.ट्रॅकमध्ये टाकण्यात येणाºया खडींच्या बॅगा येथे इतस्तत: टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्थानकातील काही भागांत विनाकारण गर्दी झाली आहे.कुठेही कम्पाउंड वॉल नाही, त्यामुळे स्थानकाच्या आजूबाजूला राहणारे त्यांचा कचरा सर्रास स्थानकात टाकतात. तो नेमका उचलायचा कोणी, महापालिकेने की रेल्वेने? यावरून वाद होतात. पावसाळ्यात तर स्थानकातील परिस्थिती आणखी बिघडते. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान