शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

शिक्षक ते शिक्षणाधिकारी... शिक्षकांमुळेच घडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 01:30 IST

नोकरी आणि संसार सांभाळत संगीता भागवतांनी मिळवले स्पर्धा परीक्षांमध्ये यश

ठाणे : माझा जन्म सर्वसामान्य कुटुंबातला. वडील शिक्षक होते. पण, तेव्हा आम्हाला स्वत:चे करिअर निवडण्याची मुभा नव्हती. दहावीनंतर लग्न झालं. लग्नानंतर वडीलधाऱ्यांनी डीएडच्या कोर्ससाठी प्रवेश घेऊन दिला आणि पुढे वडिलांचा वारसा जपत शिक्षक होण्याचे ठरवले. शिक्षक तर झाले, पण यातून पुढे आणखी कोणकोणत्या पदांवर काम करता येते, याची कल्पना नव्हती. त्यावेळी जीवन पवार आणि खोतसर यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे स्पर्धा परीक्षा देण्याचा निश्चय केला. नोकरी आणि संसार सांभाळून परीक्षा देत राहिले आणि आज शिक्षणाधिकारीपदी पोहोचले, याचे श्रेय शिक्षकांनाच, अशा शब्दांत ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी ऋण व्यक्त केले.दहावीपर्यंतचे शिक्षण छत्रपती शिवाजी हायस्कूल, पाटण, सातारा येथे झाले. वडील जवळच्याच शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे घरात अभ्यासाचे आणि शिस्तीचे वातावरण होते. दहावीनंतर मला पुढे शिकण्याची इच्छा होती. कोणत्या क्षेत्रात करिअर करावं, हे ठरवलेलं नव्हतं. मात्र, शिकायचं होतं. पण लग्नानंतर डीएडला प्रवेश झाला. त्या काळात मुलींनी सहसा डीएड, बीएड करावे, असाच आग्रह असायचा. कमला नेहरू अध्यापक विद्यालय, कराड, सातारा येथे डीएड पूर्ण केले. तेथील शिक्षकांनी आम्हाला चांगले शिक्षक होण्यासाठी शिकवण देतानाच एक चांगली व्यक्ती म्हणूनही घडवले. त्यांची शिकवण ही आयुष्यभर लक्षात ठेवण्याजोगी आहे.स्पर्धा परीक्षेसाठी शिक्षकांचे मार्गदर्शन ठरले मोलाचे...डीएड झाल्यावर मला १९९१ साली शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. माझ्यातील अभ्यासूवृत्ती आणि मेहनत करण्याची तयारी पाहून मला जीवन पवार आणि खोतसरांनी स्पर्धा परीक्षा देण्याचे सुचवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी २००१ ते २०१३ सलग १३ वर्षे विविध पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षा देत राहिले आणि यश मिळवले. पण, हेच मार्गदर्शन जर मला वेळीच मिळाले असते, तर वर्षे वाया गेली नसती.त्या १३ वर्षांत मी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था क्लास-२, गटशिक्षणाधिकारी क्लास-२, तसेच ज्येष्ठ अधिव्याख्याता आणि जिल्हा शिक्षणाधिकारी अशा चार पदांसाठी परीक्षा दिल्या आणि त्यात उत्तीर्ण झाले. पण, घरातील वडिलांचा शिक्षकीचा वारसा सांभाळण्याच्या दृष्टीने प्राथमिक शिक्षणातच रमण्याचे ठरवले आणि शिक्षणाधिकारीपदी रुजू झाले. माझ्या वडिलांकडून आलेला हा शिक्षकपदाचा वारसा माझ्या पुढच्या पिढीनेही जोपासला आहे. माझा मुलगा स्वप्नील हासुद्धा शिक्षक आहे.डीएड कोर्सदरम्यान वसतिगृहात कुटुंबीयांना भेटायलाही होती बंदी...लग्नानंतर डीएडचा कोर्स केला. त्यासाठी हॉस्टेलला राहावे लागत असे. त्यावेळी अभ्यास आणि मुलींची सुरक्षितता लक्षात घेत १५ दिवसांतून एकदा घरी जाण्याची परवानगी दिली जायची. मात्र, त्यादरम्यान जर कुटुंबातील कोणी व्यक्ती भेटायला हॉस्टेलला आली, तर त्यांची भेटही घडवली जात नव्हती. अनेकदा माझ्या कुटुंबातील माणसे येऊन न भेटताच परत जायची. तेव्हा खूप वाईट वाटायचे, पण ती गजेंद्र आईनापुरेसरांची कडक शिस्त होती. कोणालाही त्यात सवलत मिळत नसे.शिक्षकांनी चांगलं माणूस म्हणूनही घडवलं...

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनTeacherशिक्षकambernathअंबरनाथthaneठाणे