शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ताकर : ५० टक्के सवलतीचा सत्ताधाऱ्यांचा बार फुसका, नागरिकांकडून संताप व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 10:18 IST

१३ ऑगस्ट रोजी झालेल्या ऑनलाइन महासभेत नागरिकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत कर भरल्यास ५० टक्के कर माफ तर आधीची थकबाकीही भरल्यास त्यावरील व्याज पूर्णपणे १०० टक्के माफ करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला होता.

मीरा राेड :मीरा-भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मालमत्ताकरात ५० टक्के सवलत आणि थकबाकीवरील व्याजात १०० टक्के माफी देण्याचा ठराव करून दोन महिने झाले, तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने सत्ताधाऱ्यांचा बार फुसका ठरल्याची टीका नागरिकांमधून होत आहे. तर, प्रशासन २० ते २५ टक्के सवलत देण्यास तयार असतानाही एका नेत्याच्या अट्टहासामुळे तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले, अशी नाराजी भाजपतील काही मंडळी बोलून दाखवत आहेत. 

१३ ऑगस्ट रोजी झालेल्या ऑनलाइन महासभेत नागरिकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत कर भरल्यास ५० टक्के कर माफ तर आधीची थकबाकीही भरल्यास त्यावरील व्याज पूर्णपणे १०० टक्के माफ करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला होता. काँग्रेस व शिवसेनेने मात्र मालमत्ताकरात १०० टक्के माफी द्या, अशी मागणी केली. दुसरीकडे थकबाकीदारांना १०० टक्के व्याजमाफी म्हणजे बड्या करबुडव्यांच्या फायद्यासाठी असल्याचा आरोप झाला. प्रशासनाने मात्र करात २० ते २५ टक्के सवलत देण्याची तयारी दाखवली असता ती सत्ताधाऱ्यांनी अमान्य केल्याने आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी तो ठरावच रद्द करण्यासाठी सरकारकडे पाठविला. माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी आयुक्तांना पूर्ण कर घेण्याचा आज अधिकार नाही. म्हणून सरकारचा निर्णय येत नाही, तोपर्यंत कर भरू नका, असे आवाहन नागरिकांना केले होते. मेहता यांच्यापाठोपाठ भाजपच्या काही पालिका पदाधिकाऱ्यांनीही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून पालिकेचा करसवलतीचा ठराव सरकारने मंजूर करावा, असे साकडे घातले. त्यावर आमदार प्रताप सरनाईक यांनी टीका केली होती. कर भरण्यासाठी जाणाऱ्यां नागरिकांना पूर्ण कर भरावा लागत आहे.सवलत मागितल्यास तसा आदेश आला नसल्याचे सांगितले जाते.

... तर पक्षाची कोंडी झाली नसती -सरकारवर खापर फोडण्याच्या राजकारणात भाजपतील एका नेत्यासह त्याच्या समर्थकांनी नागरिकांचे नुकसान केले आहे. पालिका आयुक्त २० ते २५ टक्के सवलत देण्यास तयार झाले होते. त्यातही निवासी मालमत्तांना ५० टक्के सवलत देण्यासाठी वाणिज्य मालमत्तांची सवलत २० ते २५ टक्के केली असती आणि थकबाकीवरील १०० टक्के व्याजमाफी वगळली असती, तर नागरिकांना दिलासा देता आला असता आणि पक्षाची कोंडी झाली नसती, असे भाजपमधील काही जाणकारांनी बोलून दाखवले.  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकBJPभाजपा